शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

माझ्या वाट्याचे शिल्लक पैसे केव्हा देणार?

By admin | Updated: December 23, 2016 05:29 IST

नोटाबंदीचा घोळ संपेपर्यंत खातेदारांना त्यांच्या बँक खात्यातून आठवड्याला २४ हजार रुपये काढता येतील, असे आश्वासन सरकारने

मुंबई : नोटाबंदीचा घोळ संपेपर्यंत खातेदारांना त्यांच्या बँक खात्यातून आठवड्याला २४ हजार रुपये काढता येतील, असे आश्वासन सरकारने देऊनही बहुतांश खातेदारांना बँकांनी एवढे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे अशा ग्राहकांना त्यांच्या वाट्याची उरलेली रक्कम ३१ डिसेंबरपूर्वी काढू देणार का, असा प्रातिनिधिक आणि मार्मिक सवाल एका खातेदाराने केंद्राला पत्र पाठवून केला आहे.‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय निमंत्रक सर्वजित रॉय यांनी केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिवांना लिहिलेल्या पत्रात हा सवाल केला असून, त्याची प्रत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि कॅबिनेट सचिवांनाही पाठविण्यात आली आहे. रॉय हे आंध्र बँकेचे खातेदार असून, गेल्या १५ दिवसांत वारंवार रांगा लावूनही आपल्याला फक्त दोन वेळा प्रत्येकी २ हजार रुपये खात्यातून काढता आल्याचे त्यांनी नमूद केले आहेत.रॉय यांनी सरकारला विचारले की, तुम्ही दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गेल्या दोन आठवड्यांचा आणखी ४४ हजार रुपये खात्यातून काढण्याचा माझा हक्क शाबूत आहे. हा हक्क यापुढील आठवड्यांमध्ये ‘कॅरी फॉरवर्ड’ होऊन मला ३१ डिसेंबरपूर्वी माझ्या हक्काचे सर्व पैसे काढता येतील का? (विशेष प्रतिनिधी)नोटांचे वाटप समन्यायी हवे‘इंटक’ प्रणीत ‘इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन’चे सरचिटणीस सुभाष सावंत यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहून सर्व बँकांना त्यांच्या शाखा आणि खातेदारांची संख्या विचारात घेऊन नोटांचे समन्यायी वाटप करण्याची मागणी केली आहे. रिझर्व्ह बँक नव्या नोटांचे वितरण करताना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बाबतीत पक्षपात करीत असल्याचे फेडरेशनने याआधीही निदर्शनास आणले होते. सावंत लिहितात की, नोटांची टंचाई आणि सरकार व रिझर्व्ह बँकेकडून प्रत्यही रोज काढले जाणारे उलटसुलट फतवे यामुळे ग्राहकांच्या रोषाला बँक कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी सरकारने सर्वांगीण विचार करून निर्णय घ्यावेत आणि निदान नव्या वर्षापासून तरी खातेदारांना त्यांच्या खात्यातून पुरेसे पैसे काढता येतील, अशी व्यवस्था करावी.