शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

माझ्या वाट्याचे शिल्लक पैसे केव्हा देणार?

By admin | Updated: December 23, 2016 05:29 IST

नोटाबंदीचा घोळ संपेपर्यंत खातेदारांना त्यांच्या बँक खात्यातून आठवड्याला २४ हजार रुपये काढता येतील, असे आश्वासन सरकारने

मुंबई : नोटाबंदीचा घोळ संपेपर्यंत खातेदारांना त्यांच्या बँक खात्यातून आठवड्याला २४ हजार रुपये काढता येतील, असे आश्वासन सरकारने देऊनही बहुतांश खातेदारांना बँकांनी एवढे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे अशा ग्राहकांना त्यांच्या वाट्याची उरलेली रक्कम ३१ डिसेंबरपूर्वी काढू देणार का, असा प्रातिनिधिक आणि मार्मिक सवाल एका खातेदाराने केंद्राला पत्र पाठवून केला आहे.‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय निमंत्रक सर्वजित रॉय यांनी केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिवांना लिहिलेल्या पत्रात हा सवाल केला असून, त्याची प्रत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि कॅबिनेट सचिवांनाही पाठविण्यात आली आहे. रॉय हे आंध्र बँकेचे खातेदार असून, गेल्या १५ दिवसांत वारंवार रांगा लावूनही आपल्याला फक्त दोन वेळा प्रत्येकी २ हजार रुपये खात्यातून काढता आल्याचे त्यांनी नमूद केले आहेत.रॉय यांनी सरकारला विचारले की, तुम्ही दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गेल्या दोन आठवड्यांचा आणखी ४४ हजार रुपये खात्यातून काढण्याचा माझा हक्क शाबूत आहे. हा हक्क यापुढील आठवड्यांमध्ये ‘कॅरी फॉरवर्ड’ होऊन मला ३१ डिसेंबरपूर्वी माझ्या हक्काचे सर्व पैसे काढता येतील का? (विशेष प्रतिनिधी)नोटांचे वाटप समन्यायी हवे‘इंटक’ प्रणीत ‘इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन’चे सरचिटणीस सुभाष सावंत यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहून सर्व बँकांना त्यांच्या शाखा आणि खातेदारांची संख्या विचारात घेऊन नोटांचे समन्यायी वाटप करण्याची मागणी केली आहे. रिझर्व्ह बँक नव्या नोटांचे वितरण करताना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बाबतीत पक्षपात करीत असल्याचे फेडरेशनने याआधीही निदर्शनास आणले होते. सावंत लिहितात की, नोटांची टंचाई आणि सरकार व रिझर्व्ह बँकेकडून प्रत्यही रोज काढले जाणारे उलटसुलट फतवे यामुळे ग्राहकांच्या रोषाला बँक कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी सरकारने सर्वांगीण विचार करून निर्णय घ्यावेत आणि निदान नव्या वर्षापासून तरी खातेदारांना त्यांच्या खात्यातून पुरेसे पैसे काढता येतील, अशी व्यवस्था करावी.