शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

माझ्या वाट्याचे शिल्लक पैसे केव्हा देणार?

By admin | Updated: December 23, 2016 05:29 IST

नोटाबंदीचा घोळ संपेपर्यंत खातेदारांना त्यांच्या बँक खात्यातून आठवड्याला २४ हजार रुपये काढता येतील, असे आश्वासन सरकारने

मुंबई : नोटाबंदीचा घोळ संपेपर्यंत खातेदारांना त्यांच्या बँक खात्यातून आठवड्याला २४ हजार रुपये काढता येतील, असे आश्वासन सरकारने देऊनही बहुतांश खातेदारांना बँकांनी एवढे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे अशा ग्राहकांना त्यांच्या वाट्याची उरलेली रक्कम ३१ डिसेंबरपूर्वी काढू देणार का, असा प्रातिनिधिक आणि मार्मिक सवाल एका खातेदाराने केंद्राला पत्र पाठवून केला आहे.‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय निमंत्रक सर्वजित रॉय यांनी केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिवांना लिहिलेल्या पत्रात हा सवाल केला असून, त्याची प्रत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि कॅबिनेट सचिवांनाही पाठविण्यात आली आहे. रॉय हे आंध्र बँकेचे खातेदार असून, गेल्या १५ दिवसांत वारंवार रांगा लावूनही आपल्याला फक्त दोन वेळा प्रत्येकी २ हजार रुपये खात्यातून काढता आल्याचे त्यांनी नमूद केले आहेत.रॉय यांनी सरकारला विचारले की, तुम्ही दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गेल्या दोन आठवड्यांचा आणखी ४४ हजार रुपये खात्यातून काढण्याचा माझा हक्क शाबूत आहे. हा हक्क यापुढील आठवड्यांमध्ये ‘कॅरी फॉरवर्ड’ होऊन मला ३१ डिसेंबरपूर्वी माझ्या हक्काचे सर्व पैसे काढता येतील का? (विशेष प्रतिनिधी)नोटांचे वाटप समन्यायी हवे‘इंटक’ प्रणीत ‘इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन’चे सरचिटणीस सुभाष सावंत यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहून सर्व बँकांना त्यांच्या शाखा आणि खातेदारांची संख्या विचारात घेऊन नोटांचे समन्यायी वाटप करण्याची मागणी केली आहे. रिझर्व्ह बँक नव्या नोटांचे वितरण करताना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बाबतीत पक्षपात करीत असल्याचे फेडरेशनने याआधीही निदर्शनास आणले होते. सावंत लिहितात की, नोटांची टंचाई आणि सरकार व रिझर्व्ह बँकेकडून प्रत्यही रोज काढले जाणारे उलटसुलट फतवे यामुळे ग्राहकांच्या रोषाला बँक कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी सरकारने सर्वांगीण विचार करून निर्णय घ्यावेत आणि निदान नव्या वर्षापासून तरी खातेदारांना त्यांच्या खात्यातून पुरेसे पैसे काढता येतील, अशी व्यवस्था करावी.