शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कधी मिळणार गिरणी कामगारांना घरकूल

By admin | Updated: November 19, 2014 00:44 IST

महाराष्ट्रात २००२-०३ मध्ये गिरण्या बंद झाल्या. गिरण्या बंद झाल्याने मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्रातील २० हजारावर कामगार बेरोजगार झाले. या गिरणी कामगारांनी घरकुलाची मागणी सरकारकडे केली होती.

२० हजार कामगारांवर अन्याय : कामगारांच्या वसाहतीकडेही दुर्लक्षमंगेश व्यवहारे - नागपूर महाराष्ट्रात २००२-०३ मध्ये गिरण्या बंद झाल्या. गिरण्या बंद झाल्याने मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्रातील २० हजारावर कामगार बेरोजगार झाले. या गिरणी कामगारांनी घरकुलाची मागणी सरकारकडे केली होती. सरकारने गिरण्यांच्या जागा बिल्डरांना विकल्या, मात्र कामगारांना घरकुल काही उपलब्ध केले नाही. नागपुरातही १०० वर्षे जुन्या गणेशपेठ येथील मॉडेल मिल वसाहतीतील घरकुलाच्या निर्मितीसाठी उच्च न्यायालयाने आदेश देऊनही सात वर्षे लोटली आहे. मात्र अद्यापही घरकुलाची स्वप्नपूर्ती झालेली नाही. महाराष्ट्र व केंद्र सरकारने राज्यातील २५ पेक्षा अधिक कापडगिरण्या कामगारांना नुकसानभरपाई देऊन बंद केल्या. यातील १५ गिरण्या नागपूर, अकोला, हिंगणघाट, पुलगाव, कळमेश्वर, बडनेरा, अचलपूर, जळगाव, अमळनेर, नांदेड, औरंगाबाद, धुळे, सोलापूर, कोल्हापूर शहरात होत्या. यात जवळपास २० हजारावर कामगार काम करीत होते. महाराष्ट्रात कापड गिरण्या बंद झाल्यानंतर मुंबईतील गिरणी कामगारांनी आंदोलन करून, गिरणीच्या जागेवर घरे बांधून देण्याची मागणी केली. महाराष्ट्र सरकारने ही मागणी मान्य करून, मुंबईच्या गिरणी कामगारांना ६० हजारावर घरकुल उपलब्ध केले. मुंबईच्या धर्तीवर उर्वरित महाराष्ट्रातील गिरणी कामगारांना घरे मिळावी, यासाठी डझनभर निवेदन देऊनही, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. कामगारांना घरकुल उपलब्ध करून न देता सरकार गिरणीच्या जागा बिल्डरांना विकत आहे. नागपुरात गिरणीची जागा ८० एकराच्या वर होती. यापैकी केवळ १३ एकर जागा राहिली आहे. उर्वरित जागा बिल्डर्सला विकण्यात आली आहे. महाराष्ट्र मोफीसिल टेक्सटाईल्स अ‍ॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज वर्कर्स फेडरेशनच्या माध्यमातून मुंबईच्या धर्तीवर इतरत्रही कामगारांना घरे बांधून देण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहराज्यमंत्री सचिन अहिर यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र त्यांनी निव्वळ आश्वासन देऊन, कामगारांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले.नवीन सरकार सोडविणार का समस्या?कामगारांच्या प्रश्नासंदर्भात देवेंद्र फडणवीस आमदार असताना त्यांनी या समस्येवर विधानसभेत आवाज उचलला होता. त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री व गृहनिर्माण राज्यमंत्र्यांनी आश्वासनही दिले होते. आता आवाज उचलणारे आमदार मुख्यमंत्री झाले आहे. त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या असल्याचे मत माजी मंत्री व महाराष्ट्र मोफीसील टेक्सटाईल्स अ‍ॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष हरिभाऊ नाईक यांनी व्यक्त केले.