शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाला पाझर कधी फुटणार?

By admin | Updated: June 11, 2016 03:32 IST

मोरबे धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी तसेच कोकण आयुक्तांकडे वेळोवेळी दाद मागितली होती

आविष्कार देसाई,

अलिबाग- मोरबे धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी तसेच कोकण आयुक्तांकडे वेळोवेळी दाद मागितली होती. मात्र त्यांच्या मागण्यांना सातत्याने केराची टोपली दाखविल्याची धारणा धरणग्रस्तांची झाली आहे. आता त्यांनी कोकण आयुक्तांना पुन्हा पत्र लिहून त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. एवढे करूनही प्रशासनाला पाझर फुटत नसल्याने धरणग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे.खालापूर तालुक्यातील मोरबे धरणासाठी तेथील आदिवासी समाजाच्या जमिनी घेतल्या आहेत. बरीच वर्षे उलटूनही त्यांचे अद्याप पुनर्वसन करण्यात आलेले नाही. पिरकडवाडी, आरकसवाडी, उंबरणेवाडी, नम्राचीवाडी, वरोसे कातकरवाडी, नानीवली ठाकूरवाडी या आदिवासी वाड्यातील कुटुंब उध्वस्त झाले आहेत. त्यांना नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे ज्या आदिवासी समाजाच्या जमिनी गेल्या आहेत त्यांच्या रोजगाराचाही प्रश्न प्रलंबित आहे. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मोरबे धरणग्रस्त विकास संस्थेच्या माध्यमातून जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, मात्र प्रश्नांची कोणीच दखल घेतलेली नाही. समाजातील लोकांचे होणारे हाल थांबविण्यासाठी मोरबे धरणग्रस्त विकास संस्थेने पुन्हा कोकण आयुक्तांकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे. धरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवून न्याय द्यावा, अशी मागणी मोरबे धरणग्रस्त विकास संस्थेचे अध्यक्ष अंकुश वाघ यांनी केली आहे.प्रश्न सोडविण्याची मागणीधरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवून न्याय द्यावा, अशी मागणी मोरबे धरणग्रस्त विकास संस्थेचे अध्यक्ष अंकुश वाघ यांनी केली आहे. सातत्याने पाठपुरावा करुनही सरकारला जाग येत नसल्याने आता करायचे तरी काय, असा प्रश्न वामन पिरकड, राजू उघडे, संदीप निरगुडा या धरणग्रस्तांनी उपस्थित केला आहे.