शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

प्रशासनाला पाझर कधी फुटणार?

By admin | Updated: June 11, 2016 03:32 IST

मोरबे धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी तसेच कोकण आयुक्तांकडे वेळोवेळी दाद मागितली होती

आविष्कार देसाई,

अलिबाग- मोरबे धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी तसेच कोकण आयुक्तांकडे वेळोवेळी दाद मागितली होती. मात्र त्यांच्या मागण्यांना सातत्याने केराची टोपली दाखविल्याची धारणा धरणग्रस्तांची झाली आहे. आता त्यांनी कोकण आयुक्तांना पुन्हा पत्र लिहून त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. एवढे करूनही प्रशासनाला पाझर फुटत नसल्याने धरणग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे.खालापूर तालुक्यातील मोरबे धरणासाठी तेथील आदिवासी समाजाच्या जमिनी घेतल्या आहेत. बरीच वर्षे उलटूनही त्यांचे अद्याप पुनर्वसन करण्यात आलेले नाही. पिरकडवाडी, आरकसवाडी, उंबरणेवाडी, नम्राचीवाडी, वरोसे कातकरवाडी, नानीवली ठाकूरवाडी या आदिवासी वाड्यातील कुटुंब उध्वस्त झाले आहेत. त्यांना नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे ज्या आदिवासी समाजाच्या जमिनी गेल्या आहेत त्यांच्या रोजगाराचाही प्रश्न प्रलंबित आहे. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मोरबे धरणग्रस्त विकास संस्थेच्या माध्यमातून जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, मात्र प्रश्नांची कोणीच दखल घेतलेली नाही. समाजातील लोकांचे होणारे हाल थांबविण्यासाठी मोरबे धरणग्रस्त विकास संस्थेने पुन्हा कोकण आयुक्तांकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे. धरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवून न्याय द्यावा, अशी मागणी मोरबे धरणग्रस्त विकास संस्थेचे अध्यक्ष अंकुश वाघ यांनी केली आहे.प्रश्न सोडविण्याची मागणीधरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवून न्याय द्यावा, अशी मागणी मोरबे धरणग्रस्त विकास संस्थेचे अध्यक्ष अंकुश वाघ यांनी केली आहे. सातत्याने पाठपुरावा करुनही सरकारला जाग येत नसल्याने आता करायचे तरी काय, असा प्रश्न वामन पिरकड, राजू उघडे, संदीप निरगुडा या धरणग्रस्तांनी उपस्थित केला आहे.