शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

साखर कारखान्यांच्या निवडणुका कधी घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 04:17 IST

दुष्काळाचे कारण पुढे करून सरकार साखर कारखान्यांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलू शकत नाही,

मुंबई : दुष्काळाचे कारण पुढे करून सरकार साखर कारखान्यांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलू शकत नाही, अशा शब्दांत राज्य सरकारला फटकारत उच्च न्यायालयाने सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका कधी व किती दिवसांत घेणार? याचे उत्तर दहा दिवसांत देण्याचा आदेश सरकारला दिला.यंदा पाऊस वेळत आणि चांगल्या प्रमाणात पडला आहे. तरीही राज्य सरकार दुष्काळाचे कारण देऊन सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका पुढे ढकलत आहे. राज्य सरकार घटनेविरुद्ध भूमिका घेऊ शकत नाही, अशा शब्दांत सरकारची कानउघडणी करत मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला साखर कारखान्यांच्या किती दिवसांत निवडणुका घेणार, हे दहा दिवसांत स्पष्ट करायला सांगितले आहे. सोलापूरच्या मकाई सहकार साखर कारखान्याची निवडणूक ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्याने साखर कारखान्याच्या सभासदांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.याचिकेनुसार, मकाई साखर कारखान्याची कार्यकारिणीची मुदत ११ सप्टेंबर २०१६ रोजी संपुष्टात आली. त्यापूर्वी सरकारने एप्रिलमध्ये साखर कारखान्याला निवडणूक प्रक्रिया सुरू करून मतदार यादी तयार करण्याचे निर्देश दिले. मे २०१६ मध्ये साखर कारखान्याने मतदार यादी तयार करून सरकारकडे सादरही केली. मात्र याच दरम्यान सरकारने दुष्काळाचे कारण पुढे करत महाराष्ट्र सहकार अधिनियम, कलम ७३ (सी सी) च्या तरतुदीनुसार निवडणूक ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या. ‘राज्य घटनेच्या अनुच्छेद २४३ (झेड) (के) नुसार अस्तित्वात असलेल्या कार्यकारिणीची मुदत संपण्यापूर्वी किमान दीडशे दिवस आधी निवडणूक कार्यक्रम सुरू करणे आवश्यक आहे. राज्य सरकाने निवडणूक पुढे ढकलण्यासंदर्भात काढलेली अधिसूचना घटनेविरुद्ध आहे,’ असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील गिरीश गोडबोले व अ‍ॅड. सारंग आराध्ये यांनी केला. खंडपीठाने त्यांचा युक्तिवाद मान्य केला. पश्चिम बंगाल सरकारनेही महाराष्ट्र सरकारप्रमाणे निर्णय घेतला होता.मात्र तो निर्णय घटनेविरुद्ध आहे म्हणून अयोग्य ठरवला होता. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रासाठी वेगळा निर्णय घेऊ शकत नाही, असे नमूद करत राज्यातील ‘अ’ वर्गातील साखर कारखान्यांच्या निवडणुका कधी व किती दिवसांत घेणार, हे दहा दिवसांत स्पष्ट करा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. (प्रतिनिधी)