शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
4
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
5
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
6
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
7
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
8
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
9
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
10
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
11
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
12
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
13
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
14
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
16
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
17
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
18
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
19
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
20
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?

शीळफाटा दुर्घटनेतील मृतांना न्याय कधी मिळणार?

By admin | Updated: April 4, 2015 04:39 IST

मुंब्रा-शीळफाटा येथील इमारत दुर्घटनेला आज दोन वर्षे होत आहेत. तरीसुद्धा, न्यायालयात या प्रकरणी खटला अजूनही उभा राहिलेला नाही.

पंकज रोडेकर, ठाणेमुंब्रा-शीळफाटा येथील इमारत दुर्घटनेला आज दोन वर्षे होत आहेत. तरीसुद्धा, न्यायालयात या प्रकरणी खटला अजूनही उभा राहिलेला नाही. तर जामिनावर बाहेर असलेल्या त्या कथित आरोपींचे जामीन रद्द व्हावे म्हणून ठाणे पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या दुर्घटनेचा निकाल तातडीने लागण्यासाठी विशेष न्यायालयाची निर्मिती करावी, अशी मागणी होऊनही त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने मयतांना न्याय कधी मिळणार? अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. मयतांमध्ये ५ जणांची ओळख पटली नाही. तसेच ७ जण हे परदेशांतील असून, ६२पैकी दोघांच्या वारसांचा शोध सुरू असल्याने सरकारने जाहीर केलेला निधी जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहे. अल्प कालावधीत मुंब्रा-शीळफाटा परिसरातील लकी कम्पाउंडमध्ये आदर्श ‘ए’ आणि ‘बी’ या दोन इमारती उभारण्यात आल्या होत्या. त्यापैकी ‘बी’ इमारत ४ एप्रिल २०१३ रोजी कोसळली. या दुर्घटनेत ७४ जणांचा मृत्यू झाला होता. ३६ जण जखमी झाले होते. त्या दुर्दैवी घटनेला शनिवारी दोन वर्षे होत आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी तपासात सापडलेल्या एका नोंदवहीवरून २७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत २५ जणांना बेड्या घातल्या आहेत. त्यामध्ये इमारतीच्या मुख्य बिल्डरांसह त्यांचे भागीदार, महापालिका अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा समावेश आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी दोषारोपपत्रासह पुरवणी दोषारोपपत्रही दाखल केले आहे. याचदरम्यान, अटकेतील आरोपींनी जामिनावर बाहेर येण्यासाठी ठाणे व मुंबई न्यायालयांत धाव घेतली आहे. ६ जण न्यायालयीन कोठडीत आहेत; तर १९ जण जामिनावर आहेत. तत्कालीन महापालिका उपायुक्त दीपक चव्हाण यांच्यासह स्थानिक नगरसेवक हिरा पाटील आदींचा समावेश आहे. जामिनावर असलेल्या १५ जणांचे जामीन रद्द करण्यासाठी शहर पोलिसांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.