शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

आचारसंहिता लागणार केव्हा ?

By admin | Updated: September 11, 2014 00:55 IST

गणेश विसर्जनानंतर लगेचच अपेक्षित असणारी निवडणुकीची घोषणा दोन दिवस झाले तरी न झाल्याने सर्वांचे लक्ष आयोगाच्या घोषणेकडे लागले आहे. विशेष म्हणजे आचारसंहिता केव्हापासून लागणार

तारखेबाबत उत्सुकता : आयोगाच्या घोषणेकडे लक्षनागपूर: गणेश विसर्जनानंतर लगेचच अपेक्षित असणारी निवडणुकीची घोषणा दोन दिवस झाले तरी न झाल्याने सर्वांचे लक्ष आयोगाच्या घोषणेकडे लागले आहे. विशेष म्हणजे आचारसंहिता केव्हापासून लागणार याबाबत विचारणा होत आहे.९ तारखेला आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होईल आणि त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू होईल, असा अंदाज होता. मात्र हा दिवस चुकल्याने बुधवारी तरी निवडणुकीची घोषणा होईल, अशी चर्चा होती. मात्र हा दिवसही चुकला. त्यामुळे आता निवडणुकीच्या घोषणेबाबत राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. निवडणुका दिवाळीपूर्वी होणार की नंतर, मतमोजणी के व्हा होणार, पितृपक्षाचा मुद्दा आणि इतरही काही मुद्दे चर्चिले जात आहेत. गत विधानसभा निवडणुकीत (२००९) १५ सप्टेबर २००९ ला अधिसूचना जारी करण्यात आली होती. १८ ते २५ सप्टेबर दररम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. १३ आॅक्टोबरला मतदान झाले होते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ८ नोव्हेबर २०१४ पर्यंत आहे. त्यापूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगानेच निवडणुकीचे वेळापत्रक निश्चित करावे लागणार आहे. त्यामुळे जितके दिवस निवडणूक लांबेल तितके कमी दिवस प्रचारासाठी राजकीय पक्षांना मिळतील. पण प्रशासकीय यंत्रणेवर कामाचा दाब वाढेल.दरम्यान एकीकडे निवडणुकीची घोषणा लांबत असली तरी ती केव्हाही होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाची निवडणूक कामाची गती कायम आहे. निवडणूक शाखेत आज याच संदर्भात बैठका झाल्या. मतदार नोंदणीचे काम सुरू आहे. ज्या गतीने या घडामोडी होत आहे, त्यावरून निवडणुकांची घोषणा लगेच होण्याचे संकेत प्राप्त होतात. मात्र नेमकी तारीख केव्हा जाहीर होते याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)