शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कधी?

By admin | Updated: June 13, 2014 03:06 IST

या निर्णयामुळे महाराष्ट्राला काही प्रमाणात विजेचा लाभ मिळणार असला तरी एक हजार कुटुंबांचे पुनर्वसन कधी होणार? या प्रश्नाचे उत्तर मात्र आज तरी कोणाकडे नाही.

रमाकांत पाटील, नंदुरबारसरदार सरोवर प्रकल्पाची १७ मीटर उंची वाढविण्यास नर्मदा प्राधिकरण नियंत्रणाने मंजुरी दिल्याने एकीकडे गुजरातमध्ये आनंदोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील बुडीत कुटुंबांवर जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राला काही प्रमाणात विजेचा लाभ मिळणार असला तरी एक हजार कुटुंबांचे पुनर्वसन कधी होणार? या प्रश्नाचे उत्तर मात्र आज तरी कोणाकडे नाही.वादविवादाचे अडथळे पार करून १९७९ मध्ये या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली, पण प्रत्यक्षात १९८८ मध्ये कामाला सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या उंचीबाबत प्रश्न-प्रतिप्रश्न उपस्थित झाल्यानंतर १३८ मीटर त्याची उंची निश्चित करण्यात आली. तथापि, पुनर्वसनाचा प्रश्न तसेच पर्यावरणाची हानी याबाबत नर्मदा बचाव आंदोलनाने आपली भूमिका सातत्याने लावून धरली. हा प्रश्न थेट सर्वोच्च न्यायालयात गेला. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार प्रकल्पाचे काम टप्प्या-टप्प्याने सुरू राहिले. आता अंतिम मंजुरी अर्थात धरणाचे दरवाजे बसविण्यास मंजुरी मिळाली आहे.सरदार सरोवर प्रकल्पामुळे १४५० मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. ही वीज निर्मिती प्रकल्पाचे ११० मीटर उंचीनंतर अर्थात २००१ पासून सुरू झाली असली तरी ती पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती होत नाही. लवादाच्या निर्णयानुसार या वीज निर्मितीपैकी २७ टक्के म्हणजे ३९२ मेगावॅट वीज महाराष्ट्राला मिळणार आहे. सध्या सरासरी क्षमतेच्या जेमतेम ४० टक्के वीज निर्मिती होते. सध्या महाराष्ट्राला सरदार सरोवर प्रकल्पाची सरासरी ४० ते ११० मेगावॅट वीज मिळते. उंची पूर्ण झाल्यानंतर ती ३५० ते ३९२ मेगावॅटपर्यंत मिळेल, असा नर्मदा विकास विभागाचा दावा आहे.