शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कधी?

By admin | Updated: June 13, 2014 03:06 IST

या निर्णयामुळे महाराष्ट्राला काही प्रमाणात विजेचा लाभ मिळणार असला तरी एक हजार कुटुंबांचे पुनर्वसन कधी होणार? या प्रश्नाचे उत्तर मात्र आज तरी कोणाकडे नाही.

रमाकांत पाटील, नंदुरबारसरदार सरोवर प्रकल्पाची १७ मीटर उंची वाढविण्यास नर्मदा प्राधिकरण नियंत्रणाने मंजुरी दिल्याने एकीकडे गुजरातमध्ये आनंदोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील बुडीत कुटुंबांवर जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राला काही प्रमाणात विजेचा लाभ मिळणार असला तरी एक हजार कुटुंबांचे पुनर्वसन कधी होणार? या प्रश्नाचे उत्तर मात्र आज तरी कोणाकडे नाही.वादविवादाचे अडथळे पार करून १९७९ मध्ये या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली, पण प्रत्यक्षात १९८८ मध्ये कामाला सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या उंचीबाबत प्रश्न-प्रतिप्रश्न उपस्थित झाल्यानंतर १३८ मीटर त्याची उंची निश्चित करण्यात आली. तथापि, पुनर्वसनाचा प्रश्न तसेच पर्यावरणाची हानी याबाबत नर्मदा बचाव आंदोलनाने आपली भूमिका सातत्याने लावून धरली. हा प्रश्न थेट सर्वोच्च न्यायालयात गेला. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार प्रकल्पाचे काम टप्प्या-टप्प्याने सुरू राहिले. आता अंतिम मंजुरी अर्थात धरणाचे दरवाजे बसविण्यास मंजुरी मिळाली आहे.सरदार सरोवर प्रकल्पामुळे १४५० मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. ही वीज निर्मिती प्रकल्पाचे ११० मीटर उंचीनंतर अर्थात २००१ पासून सुरू झाली असली तरी ती पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती होत नाही. लवादाच्या निर्णयानुसार या वीज निर्मितीपैकी २७ टक्के म्हणजे ३९२ मेगावॅट वीज महाराष्ट्राला मिळणार आहे. सध्या सरासरी क्षमतेच्या जेमतेम ४० टक्के वीज निर्मिती होते. सध्या महाराष्ट्राला सरदार सरोवर प्रकल्पाची सरासरी ४० ते ११० मेगावॅट वीज मिळते. उंची पूर्ण झाल्यानंतर ती ३५० ते ३९२ मेगावॅटपर्यंत मिळेल, असा नर्मदा विकास विभागाचा दावा आहे.