शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
4
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
5
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
6
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
7
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
8
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
9
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता
10
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
11
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
12
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
13
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
14
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
15
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
16
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
17
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
18
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
19
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
20
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली

१० वर्षे जुने रेकॉर्ड शोधताना

By admin | Updated: November 19, 2014 00:57 IST

आदिवासी खात्यातील योजनांच्या अंमलबजावणीची न्यायालयीन चौकशी केली जात आहे. त्यासाठी १० वर्ष जुने रेकॉर्ड शोधताना आणि नियमित काम सांभाळताना या खात्याच्या राज्यभरातील

आदिवासी खात्याची दमछाक - न्यायालयीन चौकशी : आदिवासींपर्यंत पोहोचलेल्या योजनांचा शोध यवतमाळ : आदिवासी खात्यातील योजनांच्या अंमलबजावणीची न्यायालयीन चौकशी केली जात आहे. त्यासाठी १० वर्ष जुने रेकॉर्ड शोधताना आणि नियमित काम सांभाळताना या खात्याच्या राज्यभरातील यंत्रणेची प्रचंड दमछाक होताना दिसत आहे. २००३-०४ ते २००९-१० या काळात राज्याच्या आदिवासी विकास मंत्रालयाची धुरा विजयकुमार गावित यांच्याकडे होती. या काळात आदिवासींसाठी राबविलेल्या योजनांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. याच अनुषंगाने बजरंग पोपट यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरून निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड यांच्या नेतृत्वात लवाद स्थापन करून चौकशी केली जात आहे. या चौकशी आयोगाचे मुख्यालय नाशिक आहे. या चौकशीच्या अनुषंगाने राज्यातील आदिवासी आयुक्तालय, अमरावती, नागपूर, ठाणे व नाशिक येथील आदिवासी अपर आयुक्तालय तसेच राज्यभरातील २९ आदिवासी प्रकल्प कार्यालयातील यंत्रणा कामी लागली आहे. परंतु दहा वर्ष जुने आणि २००३-०४ ते २००९-१० या तब्बल पाच वर्षांचे रेकॉर्ड शोधताना यंत्रणेच्या नाकी नऊ आले आहेत. कारण त्या काळातील संबंधित काही लिपिक सेवानिवृत्त झाले आहेत, कुणी बदलून गेले आहे. बदलून गेलेल्यांना कार्यालयात बोलविले असता आता त्यांनाही ते रेकॉर्ड सापडत नाही. नव्याने त्या जागांवर आलेल्या कर्मचाऱ्यांना तर जुने काहीच माहीत नाही. अशा स्थितीत दहा वर्ष जुन्या आदिवासी विकासाच्या योजनांची कागदपत्रे शोधणे या यंत्रणेसाठी जणू दिव्य ठरले ंआहे. अशाही परिस्थितीत आदिवासी विकास खात्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपलब्ध रेकॉर्ड आयोगाकडे सादर केले. आयोगातर्फे या खात्यातील भ्रष्टाचाराची माहिती देण्याबाबत जाहीर आवाहनही करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या तारखांना समक्ष बोलावून रेकॉर्ड समजून घेण्यात आले. आता आयोगाची रेकॉर्डच्या अनुषंगाने प्रत्यक्ष चौकशी सुरू झाली आहे. गावित यांच्या आदिवासी विकास मंत्री पदाच्या कार्यकाळात विविध योजना राबविल्या गेल्या. त्यावर पैसाही खर्च झाला. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीच झाली नसल्याचा आरोप आहे. न्या.गायकवाड आयोगाचा अहवाल केव्हा सादर होतो आणि त्यात काय वास्तव पुढे येते याकडे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)