शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा वृद्धाश्रमच निराधार बनतो.!

By admin | Updated: September 14, 2014 01:39 IST

परभणीनजीक आसोला परिसरातील मातोश्री वृद्धाश्रम स्वत:च विकलांग बनला असून, शेवटची घटिका मोजतो आहे. पूर्णत: मोडकळीस आलेल्या इमारतीभोवती जंगल वाढले

मल्हारीकांत देशमुख ल्ल परभणी
परभणीनजीक आसोला परिसरातील मातोश्री वृद्धाश्रम स्वत:च विकलांग बनला असून, शेवटची घटिका मोजतो आहे. पूर्णत: मोडकळीस आलेल्या इमारतीभोवती जंगल वाढले असून, अवघे तीन निराधार बापुडे कुठलाच सहारा नसल्यामुळे जीव मुठीत धरून वास्तव्यास असल्याचे विदारक चित्र आहे. कुठल्याही मनुष्यप्राण्याने राहावे, अशी ही वास्तू राहिलेली नाही. विद्याथ्र्याच्या शालेय पोषण आहारावर तिघांचीही गुजरान होत आहे.
युती शासनाच्या काळात आ. दिवाकर रावते यांच्या पुढाकारातून 1999मध्ये मातोश्री वृद्धाश्रम परभणी जिल्ह्यातील आसोला परिसरात उभारण्यात आला होता. पहिल्याच वर्षी या आश्रमात 65 वृद्धांना प्रवेश देण्यात आला होता. पुढे सत्तांतर झाले आणि 2क्क्1पासून या वृद्धाश्रमाचे अनुदान शासनाने बंद केले. मागील 13 वर्षात या ठिकाणच्या वृद्धांची गळती होत गेली. आता या आश्रमात केवळ तीन वृद्ध उरले आहेत. ग्यानोजी भरोसे, राम मोघे यांच्याबरोबर वासंती लवंदे या महिलेचा त्यात समावेश आहे. मातोश्रीचा शेवटचा आधार म्हणजे माजी खा. तुकाराम रेंगे पाटील. परंतु त्यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर हा आश्रम उघडय़ावर आला. नाही म्हणता आश्रमाशेजारीच माजी खा. रेंगे पाटील यांची शिक्षण संस्था आहे. संस्थेवरील कर्मचारी बांधिलकीच्या नात्यातून या वृद्धांना जेवण देतात. शालेय पोषण आहारातील खिचडी तेवढी या वृद्धांना मिळते. 1क् वर्षापासून आश्रमाकडे कोणीही फिरकले नसल्याची खंत येथे राहणा:या वृद्धांनी व्यक्त केली.
 
बांधिलकी ओसरली : शासनाने अनुदान बंद केल्यामुळे संस्था उद्ध्वस्त झाली. त्यापाठोपाठ समाजानेदेखील पाठ फिरविली. एकेकाळी सामाजिक कार्यकर्ते सणा-वाराला वृद्धाश्रमावर जाऊन वृद्धांना गोडधोड खाऊ घालायचे. त्यांची विचारपूस करायचे. आज घडीला तिकडे कोणी फिरकताना दिसत नाही.
 
माङो भावनिक
संबंध कायम - रेंगे
वृद्धाश्रमाचे तत्कालीन अध्यक्ष माजी खा. तुकाराम रेंगे यांच्याशी संपर्क साधला असता, मी पक्ष बदलला असला तरी या संस्थेशी माङो भावनिक संबंध आजही कायम आहेत. त्या ठिकाणच्या वृद्धांना मी माङया परीने मदत करीत आलो आहे. 
गतवर्षी ऐन दिवाळीत एका वृद्धाचा मृत्यू झाला. माङया सहका:यांसोबत मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होतो. आजघडीला माङयाकडे कुठलेही मोठे पद नाही. 
त्यात इमारतीची होत असलेली पडझड मी थोपवू शकत नाही. प्रशासनाने हा वृद्धाश्रम बंद करण्याची भूमिका घेतली होती. परंतु या ठिकाणच्या वृद्धांना निराधार करायला नको होते म्हणून मीच तो सुरू ठेवलेला 
आहे.
 
च्चौदा वर्षापूर्वी बांधलेल्या या वास्तूला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. सबंध इमारतीतील फरशी उखडली गेली आहे. खोल्यांची दयनीय अवस्था झाली असून, दारे-खिडक्या लोकांनी काढून नेल्या आहेत. बिल भरले नसल्याने महावितरणने वीजजोडणी तोडल्यामुळे सद्य:स्थितीला अंधारात राहण्याखेरीज पर्याय राहिलेला नाही.
च्पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने शेजारच्या शाळेतून पाणी आणावे लागते. आश्रम सुरू झाल्याच्या दिवसापासून वास्तव्याला असणा:या ग्यानोजी भरोसे यांनी सोबतची माणसं डोळ्यांदेखत बेहाल होऊन निघून गेली किंवा मरण पावली. आम्हीच तेवढे हाल भोगत आहोत, हे सांगताना तिन्ही वृद्धांना रडू कोसळले. तत्कालीन व्यवस्थापक गोविंद जावळे व संस्थेचे कर्मचारी बांधिलकीच्या नात्याने त्यांची व्यवस्था करतात.