कजर्त (जि. अहमदनगर) : लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांनी देशाच्या तिजोरीत काँग्रेस आघाडीने खडखडाट करून ठेवला असल्याची बोंब ठोकली. मात्र, तेच मोदी आता नेपाळ आणि भूतानला आर्थिक मदत करत आहेत. भविष्यात त्यांनी पाकिस्तानला मदत केल्यास वावगे वाटू नये, अशी खोचक टीका ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केली. विकासकामांच्या बाबतीत देशात आजही महाराष्ट्र नंबर वन असल्याचा दावा त्यांनी कजर्त पंचायत समितीच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी केला. नियोजित वेळेपेक्षा 5 तास हा कार्यक्रम उशिरा सुरू झाला. देशात महाराष्ट्र सर्व क्षेत्रंत आघाडीवर आहे. मात्र, विनाकारण गुजरातच्या विकासाचे चित्र रंगविले जात आहे. केंद्रात काँग्रेस आघाडी सत्तेत असताना पंतप्रधान मनमोहन सिंग बोलत नसल्याची टीका करण्यात येत होती. मात्र, आताचे पंतप्रधानदेखील ‘मौनी’ असल्याचे पाटील म्हणाले.