शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

महामार्ग चौपदरीकरण कधी?

By admin | Updated: May 6, 2015 01:03 IST

कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आणि कोकण रेल्वे दुपदरीकरणाचे काम म्हणजे निव्वळ घोषणांचा सुकाळ आणि नियोजनाचा दुष्काळ अशी परिस्थिती दिसून येत आहे.

घोषणांचा सुकाळ : कोकणवासीयांच्या महामार्ग स्वप्नपूर्तीस विलंबरोहा : महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरणाचे काम वेगाने पूर्ण होऊन त्यावरुन वाहतूक चालू झाली आहे. परंतु कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आणि कोकण रेल्वे दुपदरीकरणाचे काम म्हणजे निव्वळ घोषणांचा सुकाळ आणि नियोजनाचा दुष्काळ अशी परिस्थिती दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करुन रस्त्यावर उतरुन देखील संघर्ष केला. अखेर पनवेल ते इंदापूर या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास सुरुवात झाली. हे काम अत्यंत धिम्या गतीने होत आहे. काही महिन्यांपूर्वी युती शासनामधील मंत्रिमहोदयांनी या कामाची पाहणी करुन ३० मार्च, ३० एप्रिल व ३१ मेपर्यंत कोणकोणती कामे पूर्ण होणे गरजेचे आहे, याबाबत सूचना दिल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र या पाहणी दौऱ्यानंतर कोणत्याही प्रकारे चौपदरीकरणाच्या कामास गती मिळालेली नाही. चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गावर डायव्हेशन देण्यात आले आहे. ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. कोकणामध्ये १५ मे पासून वळवाचा पाऊस व जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात होते. हाती असलेल्या कालावधीत रस्त्याच्या दुरुस्तीची कामे होणे शक्य नाही. तरीदेखील युती शासनामधील जबाबदार मंत्र्यांकडून चौपदरीकरणाच्या कामाबाबत सवंग घोषणा करणे चालूच आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण याबाबत देखील केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी घोषणा केली आहे. कोकण रेल्वेची सुरुवात रोहा येथून होत असली तरी पनवेल ते रोहा या मार्गांच्या दुपदरीकरणाचे काम अत्यंत धिम्या गतीने चालू आहे. सदरचे काम पूर्ण होण्यासाठी अजून एक ते दीड वर्षाचा कालावधी निश्चित लागेल. याबाबतची वस्तुस्थिती जाणून न घेता केवळ घोषणा करणे आणि कोकणवासीयांना स्वप्न दाखविणे असा प्रकार चालू असल्याचे चित्र या मार्गावरुन प्रवास करताना दिसून येत आहे. मंत्रीमहोदय आणि आमदार यांच्या ताफ्यात उच्च बनावटीच्या गाड्या असल्याने त्यांना जनतेला कोणत्या त्रासातून सामोरे जावे लागत आहे, याची कल्पना नाही. येणाऱ्या पावसाळ्यात पुन्हा एकदा कोकणवासीयांना महामार्ग व रेल्वे या दोन्ही मार्गांवरुन जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे. यामुळे कोकणवासीयांसाठी महामार्ग चौपदरीकरण व रेल्वे दुपदरीकरण म्हणजे घोषणांचा सुकाळ आणि नियोजनाचा दुष्काळ अशीच परिस्थिती आहे. यंदाच्या वर्षी महामार्गावरुन तसेच रेल्वेमार्गे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांकडे संपर्क साधला असता त्यांनी जुना महामार्ग चांगला होता. आता नवाही नाही जुनाच तर नाहीच, अशी अवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)