शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2016 02:43 IST

महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या २५ हजार विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश, वह्या, रेनकोट व इतर साहित्य मिळालेले नाही.

नवी मुंबई : महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या २५ हजार विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश, वह्या, रेनकोट व इतर साहित्य मिळालेले नाही. निविदा प्रक्रिया रखडल्याने ही दिरंगाई झाली आहे. वह्या व गणवेशासाठी पुन्हा निविदा मागविण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना किमान दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका सर्व विद्यार्थ्यांना वह्या, रेनकोट, बूट, गणवेश व इतर साहित्य मोफत देत असते. प्रत्येक वर्षी पावसाळा संपत आल्यानंतर रेनकोट व दिवाळीच्या दरम्यान गणवेश दिला जायचा. याविषयी पालकांसह लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केल्यानंतर तीन वर्षांपासून मे महिन्यामध्येच निविदा प्रक्रिया पूर्ण केली जात होती. परंतु यावेळी शैक्षणिक साहित्याच्या टेंडरवरून आरोप - प्रत्यारोप झाल्याने ते रद्द करून पुन्हा निविदा मागविण्यात आल्या. निविदेची प्रक्रिया करण्यासाठी विलंब झाल्याने शाळा सुरू होवून दीड महिना झाल्यानंतरही शैक्षणिक साहित्य उपलब्ध झालेले नाही. विद्यार्थ्यांना वह्याही मिळाल्या नसल्याने दुकानांमधून खरेदी कराव्या लागल्या आहेत. मुसळधार पाऊस सुरू असून रेनकोट न दिल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येताना व शाळा सुटल्यावर पुन्हा घरी जाताना भिजावे लागत आहे. शैक्षणिक साहित्य कधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे. जुने गणवेश घालून विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागत आहे. पुस्तके ठेवण्यासाठी बॅगही नाही. स्वातंत्र्य दिन जवळ आला असून तोपर्यंततरी नवीन गणवेश मिळणार का, असा प्रश्न विद्यार्थी विचारू लागले आहेत. याविषयी माहिती घेण्यासाठी पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वह्या व गणवेश पुरविण्यासाठी फेरनिविदा मागविण्यात आली आहे. यामुळे किमान दोन महिने ते मिळणार नाही. रेनकोट व इतर साहित्य खरेदीसाठी कार्यादेश दिला असून एक महिन्यात साहित्य विद्यार्थ्यांना मिळू शकेल, असे सांगितले. विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याबद्दल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांना पत्र देवून लवकरात लवकर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे. >आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुले महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. रेनकोट न दिल्याने विद्यार्थ्यांना भिजावे लागत आहे. वह्या, गणवेश, बॅग काहीच मिळालेले नाही. विद्यार्थ्यांना तत्काळ साहित्य मिळावे यासाठी आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. लवकरात लवकर शैक्षणिक साहित्य मिळावे, अशी मागणी केली आहे. - महेश कोठीवाले, शाखा प्रमुख शिवसेना