शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2016 02:43 IST

महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या २५ हजार विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश, वह्या, रेनकोट व इतर साहित्य मिळालेले नाही.

नवी मुंबई : महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या २५ हजार विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश, वह्या, रेनकोट व इतर साहित्य मिळालेले नाही. निविदा प्रक्रिया रखडल्याने ही दिरंगाई झाली आहे. वह्या व गणवेशासाठी पुन्हा निविदा मागविण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना किमान दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका सर्व विद्यार्थ्यांना वह्या, रेनकोट, बूट, गणवेश व इतर साहित्य मोफत देत असते. प्रत्येक वर्षी पावसाळा संपत आल्यानंतर रेनकोट व दिवाळीच्या दरम्यान गणवेश दिला जायचा. याविषयी पालकांसह लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केल्यानंतर तीन वर्षांपासून मे महिन्यामध्येच निविदा प्रक्रिया पूर्ण केली जात होती. परंतु यावेळी शैक्षणिक साहित्याच्या टेंडरवरून आरोप - प्रत्यारोप झाल्याने ते रद्द करून पुन्हा निविदा मागविण्यात आल्या. निविदेची प्रक्रिया करण्यासाठी विलंब झाल्याने शाळा सुरू होवून दीड महिना झाल्यानंतरही शैक्षणिक साहित्य उपलब्ध झालेले नाही. विद्यार्थ्यांना वह्याही मिळाल्या नसल्याने दुकानांमधून खरेदी कराव्या लागल्या आहेत. मुसळधार पाऊस सुरू असून रेनकोट न दिल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येताना व शाळा सुटल्यावर पुन्हा घरी जाताना भिजावे लागत आहे. शैक्षणिक साहित्य कधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे. जुने गणवेश घालून विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागत आहे. पुस्तके ठेवण्यासाठी बॅगही नाही. स्वातंत्र्य दिन जवळ आला असून तोपर्यंततरी नवीन गणवेश मिळणार का, असा प्रश्न विद्यार्थी विचारू लागले आहेत. याविषयी माहिती घेण्यासाठी पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वह्या व गणवेश पुरविण्यासाठी फेरनिविदा मागविण्यात आली आहे. यामुळे किमान दोन महिने ते मिळणार नाही. रेनकोट व इतर साहित्य खरेदीसाठी कार्यादेश दिला असून एक महिन्यात साहित्य विद्यार्थ्यांना मिळू शकेल, असे सांगितले. विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याबद्दल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांना पत्र देवून लवकरात लवकर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे. >आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुले महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. रेनकोट न दिल्याने विद्यार्थ्यांना भिजावे लागत आहे. वह्या, गणवेश, बॅग काहीच मिळालेले नाही. विद्यार्थ्यांना तत्काळ साहित्य मिळावे यासाठी आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. लवकरात लवकर शैक्षणिक साहित्य मिळावे, अशी मागणी केली आहे. - महेश कोठीवाले, शाखा प्रमुख शिवसेना