शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

‘अंबाबाई’साठी निधी कधी ?

By admin | Updated: November 12, 2014 23:59 IST

नव्या सरकारकडून अपेक्षा : तीन वर्षांनंतरही मंदिरासाठी दहा कोटींचा निधी नाही

इंदुमती गणेश - कोल्हापूर -काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेच्या काळात कोल्हापूरच्या अंबाबाईचा आणि कोल्हापूरचा पर्यटनस्थळाचा विकास आराखड्याची अवस्था ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ अशी झाली. राज्य शासनाने मंदिरासाठी मंजूर केलेला दहा कोटींचा निधी तीन वर्षांनंतरही मिळालेला नाही. पुढच्यावर्षी मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेला तीनशे वर्षे पूर्ण होत आहेत, अशा परिस्थितीत आता केंद्र आणि राज्यात असलेल्या भाजप आश्वासनांनुसार अंबाबाई मंदिराचा विकास करेल का? याकडे कोल्हापूरकरांच्या नजरा लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंबाबाई मंदिराच्या विकासाचे आश्वासन दिले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे या सगळ््यांनी पक्षाला बहुमत मिळावे म्हणून अंबाबाईला साकडे घातले होते. ते साकडे पूर्णत्वास जाऊन राज्यात आणि केंद्रातही भाजपची सत्ता आहे. गेल्या पाच वर्षांपासून अंबाबाई मंदिराच्या विकासाला लागलेला अनास्थेचा दुर्दैवी फेरा संपवून या नव्या सरकारने तरी मंदिराच्या विकासासाठी ठोस पाऊल उचलावे, या आशेने त्यांच्याकडे पाहिले जात आगे. कोल्हापूरचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी गेल्या पाच वर्षांत आराखड्यांवर आराखडे बनविण्यात आले आहेत. त्यात अंबाबाई मंदिरासाठी स्वतंत्र १९० कोटींचा त्याचेच पोटआराखडे म्हणून ५० कोटी आणि दहा कोटींचा विकास आराखडा तयार आहे. दुर्दैवाने मंदिराचा विकास फक्त कागदावरच झाला. पालिकेने वारंवार पाठपुरावा करूनही राज्य शासनाने मंदिर विकासासाठी मंजूर झालेला निधी वर्ग केला नाही. त्यामुळे देवीच विकासापासून वंचित राहिली. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या आदिशक्ती स्वरूप करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला सप्टेंबर २०१५ मध्ये ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. या त्रिशताब्दी वर्षात तरी कोल्हापूरचे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून विकास होणे गरजेचे आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी अंबाबाईच्या मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेच्या वर्षात देवीसाठी सोन्याची पालखी बनविण्याचा संकल्प केला आहे. मात्र, त्याहीपेक्षा तिच्या दर्शनाची आस घेऊन आलेल्या भाविकांना सेवा मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. यंदा नवरात्रात एकूणच भाविकांची संख्या दोन लाखांनी वाढली आहे. नवरात्रौत्सवाच्या दहा दिवसांत तब्बल १५ लाख भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. वर्षाकाठी किमान २० ते २५ लाख भाविक व पर्यटक कोल्हापुरात येतात. मात्र, त्यांना सोयी-सुविधा मिळत नाहीत. देवस्थान समितीचा कोरम व्हावा पूर्ण मंदिराचे व्यवस्थापन बघणाऱ्या देवस्थान समितीचा कोरम पूर्ण झाल्याशिवाय अंबाबाई मंदिर विकासाला गती मिळणार नाही. समितीवर राष्ट्रवादीचे तीन आणि काँग्रेसचे दोन असे पाच सदस्य आहेत. आणखी एक सदस्य आणि अध्यक्षांची नियुक्ती झाली की, समितीचा कोरम पूर्ण होतो. आता सर्वाधिकार भाजपकडे असणार आहेत. सचिवपदी शुभांगी साठे यांची नियुक्ती होऊनही तांत्रिक अडचणीमुळे हा पदभार निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. निधीसाठी पाठपुरावा अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी शासनाने मंजूर केलेला दहा कोटींचा निधी अकार्यक्षम नेतृत्व आणि पाठपुराव्यांअभावी तीन वर्षांनंतरही कोल्हापूर महापालिकेकडे वर्ग झालेला नाही. नवीन सरकार स्थिरस्थावर झाले की, कोल्हापुरातील आमदार, खासदारांनी हा निधी तातडीने वर्ग व्हावा यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.