शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

त्रिसदस्यीय समितीला मुहूर्त कधी?

By admin | Updated: August 23, 2016 06:05 IST

दहीहंडीत उच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन होते की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी सरकारने अद्याप त्रिसदस्यीय समिती स्थापन केलेली नाही.

मुंबई : दहीहंडीत उच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन होते की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी सरकारने अद्याप त्रिसदस्यीय समिती स्थापन केलेली नाही. त्यामुळे सरकार उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत असल्याचा आरोप याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी केला आहे. सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.पाटील म्हणाल्या की, राज्य सरकार आणि गोविंदा पथकांमध्ये केवळ गोविंदांचे वय १८ वर्षे आणि थरांची उंची २० फुटांहून अधिक नसावी, या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. मात्र याशिवाय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात गोविंदाच्या सुरक्षेसाठी जमिनीवर गाद्या अंथरणे, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट आणि आयोजनस्थळी मोबाइल रुग्णवाहिकेची सक्ती करण्यात आली आहे. मात्र या गोष्टींकडे सरकार आणि आयोजक सररास दुर्लक्ष करीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व नियमांची अंमलबजावणी होतेय की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी त्रीसदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवून न्यायालयाचा अवमान करण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार केवळ मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण राज्यात या नियमांची अंमलबजावणी होण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली. पाटील म्हणाल्या की, गोविंदांचे वय आणि थरांची उंची तपासण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. या समितीमध्ये स्थानिक पोलीस ठाण्याचा अधिकारी, नगरसेवक किंवा समकक्ष लोकप्रतिनिधी आणि सहायक पालिका अधिकारी यांचा समावेश करायला हवा. ही समिती नियमांचे कितपत पालन होत आहे, याचा अहवाल सरकारला सादर करेल. मात्र कुठल्याही नियमाचे पालन झालेले नाही. त्यामुळे गोविंदांच्या सुरक्षेसाठी सरकारने तत्काळ पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)बक्षिसांच्या रकमेची चौकशीलाखो रुपयांच्या हंड्यांचे आयोजन करत कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या आयोजकांजवळील निधीची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांना दिले आहेत. मात्र त्याबाबत चौकशी झाली का, यासंदर्भातही सरकारने भूमिका स्पष्ट केली नसल्याचा आरोप पाटील यांनी केला.गोविंदांसाठीच भांडतेय : चार आणि पाच थर लावणाऱ्या गोविंदांनाही बक्षिसे मिळावीत, म्हणून भांडत असल्याचे पाटील यांनी सांगितले. सध्या केवळ ८ ते १० थर रचणाऱ्या पथकांना रोख बक्षिसे मिळत आहेत, तर ३, ४ आणि ५ थर रचणाऱ्या पथकांना केवळ हारतुरे दिले जात आहेत. त्यामुळे हा लढा ‘कमी थर रचून संस्कृती जपणाऱ्या गोविंदां’साठी असून, सणांचे इव्हेंट करणाऱ्यांविरोधात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.