शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
4
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
5
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
6
"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला अपळा अॅक्सीडेंट - बघघा VIDEO
7
हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ
8
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
9
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
10
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
11
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
12
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
13
गुन्हेगारांचे चेहरे स्केचमधून जिवंत करणारे आर्टिस्ट बनले ‘महाराज’, धमक्या, कुटुंबाच्या काळजीमुळे सोडली मुंबई 
14
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
15
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
16
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
17
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
18
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
19
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
20
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल

त्रिसदस्यीय समितीला मुहूर्त कधी?

By admin | Updated: August 23, 2016 06:05 IST

दहीहंडीत उच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन होते की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी सरकारने अद्याप त्रिसदस्यीय समिती स्थापन केलेली नाही.

मुंबई : दहीहंडीत उच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन होते की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी सरकारने अद्याप त्रिसदस्यीय समिती स्थापन केलेली नाही. त्यामुळे सरकार उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत असल्याचा आरोप याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी केला आहे. सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.पाटील म्हणाल्या की, राज्य सरकार आणि गोविंदा पथकांमध्ये केवळ गोविंदांचे वय १८ वर्षे आणि थरांची उंची २० फुटांहून अधिक नसावी, या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. मात्र याशिवाय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात गोविंदाच्या सुरक्षेसाठी जमिनीवर गाद्या अंथरणे, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट आणि आयोजनस्थळी मोबाइल रुग्णवाहिकेची सक्ती करण्यात आली आहे. मात्र या गोष्टींकडे सरकार आणि आयोजक सररास दुर्लक्ष करीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व नियमांची अंमलबजावणी होतेय की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी त्रीसदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवून न्यायालयाचा अवमान करण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार केवळ मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण राज्यात या नियमांची अंमलबजावणी होण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली. पाटील म्हणाल्या की, गोविंदांचे वय आणि थरांची उंची तपासण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. या समितीमध्ये स्थानिक पोलीस ठाण्याचा अधिकारी, नगरसेवक किंवा समकक्ष लोकप्रतिनिधी आणि सहायक पालिका अधिकारी यांचा समावेश करायला हवा. ही समिती नियमांचे कितपत पालन होत आहे, याचा अहवाल सरकारला सादर करेल. मात्र कुठल्याही नियमाचे पालन झालेले नाही. त्यामुळे गोविंदांच्या सुरक्षेसाठी सरकारने तत्काळ पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)बक्षिसांच्या रकमेची चौकशीलाखो रुपयांच्या हंड्यांचे आयोजन करत कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या आयोजकांजवळील निधीची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांना दिले आहेत. मात्र त्याबाबत चौकशी झाली का, यासंदर्भातही सरकारने भूमिका स्पष्ट केली नसल्याचा आरोप पाटील यांनी केला.गोविंदांसाठीच भांडतेय : चार आणि पाच थर लावणाऱ्या गोविंदांनाही बक्षिसे मिळावीत, म्हणून भांडत असल्याचे पाटील यांनी सांगितले. सध्या केवळ ८ ते १० थर रचणाऱ्या पथकांना रोख बक्षिसे मिळत आहेत, तर ३, ४ आणि ५ थर रचणाऱ्या पथकांना केवळ हारतुरे दिले जात आहेत. त्यामुळे हा लढा ‘कमी थर रचून संस्कृती जपणाऱ्या गोविंदां’साठी असून, सणांचे इव्हेंट करणाऱ्यांविरोधात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.