शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

त्रिसदस्यीय समितीला मुहूर्त कधी?

By admin | Updated: August 23, 2016 06:05 IST

दहीहंडीत उच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन होते की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी सरकारने अद्याप त्रिसदस्यीय समिती स्थापन केलेली नाही.

मुंबई : दहीहंडीत उच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन होते की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी सरकारने अद्याप त्रिसदस्यीय समिती स्थापन केलेली नाही. त्यामुळे सरकार उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत असल्याचा आरोप याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी केला आहे. सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.पाटील म्हणाल्या की, राज्य सरकार आणि गोविंदा पथकांमध्ये केवळ गोविंदांचे वय १८ वर्षे आणि थरांची उंची २० फुटांहून अधिक नसावी, या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. मात्र याशिवाय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात गोविंदाच्या सुरक्षेसाठी जमिनीवर गाद्या अंथरणे, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट आणि आयोजनस्थळी मोबाइल रुग्णवाहिकेची सक्ती करण्यात आली आहे. मात्र या गोष्टींकडे सरकार आणि आयोजक सररास दुर्लक्ष करीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व नियमांची अंमलबजावणी होतेय की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी त्रीसदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवून न्यायालयाचा अवमान करण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार केवळ मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण राज्यात या नियमांची अंमलबजावणी होण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली. पाटील म्हणाल्या की, गोविंदांचे वय आणि थरांची उंची तपासण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. या समितीमध्ये स्थानिक पोलीस ठाण्याचा अधिकारी, नगरसेवक किंवा समकक्ष लोकप्रतिनिधी आणि सहायक पालिका अधिकारी यांचा समावेश करायला हवा. ही समिती नियमांचे कितपत पालन होत आहे, याचा अहवाल सरकारला सादर करेल. मात्र कुठल्याही नियमाचे पालन झालेले नाही. त्यामुळे गोविंदांच्या सुरक्षेसाठी सरकारने तत्काळ पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)बक्षिसांच्या रकमेची चौकशीलाखो रुपयांच्या हंड्यांचे आयोजन करत कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या आयोजकांजवळील निधीची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांना दिले आहेत. मात्र त्याबाबत चौकशी झाली का, यासंदर्भातही सरकारने भूमिका स्पष्ट केली नसल्याचा आरोप पाटील यांनी केला.गोविंदांसाठीच भांडतेय : चार आणि पाच थर लावणाऱ्या गोविंदांनाही बक्षिसे मिळावीत, म्हणून भांडत असल्याचे पाटील यांनी सांगितले. सध्या केवळ ८ ते १० थर रचणाऱ्या पथकांना रोख बक्षिसे मिळत आहेत, तर ३, ४ आणि ५ थर रचणाऱ्या पथकांना केवळ हारतुरे दिले जात आहेत. त्यामुळे हा लढा ‘कमी थर रचून संस्कृती जपणाऱ्या गोविंदां’साठी असून, सणांचे इव्हेंट करणाऱ्यांविरोधात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.