शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

अवैध रिक्षा स्टॅण्डवर कारवाई कधी?

By admin | Updated: June 8, 2017 03:57 IST

शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाच्या ठाण्यातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली

अनिकेत घमंडी । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाच्या ठाण्यातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. या समितीने डोंबिवलीतील ४० अवैध रिक्षा स्टॅण्डवर कारवाई केली जावी, या मुख्य नोंदीसह अवजड वाहनांना बंदी, यासह अन्य पर्याय सुचवत अहवाल दिला होता. मात्र, त्यास दोन महिने उलटूनही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे तो अहवाल कागदावरच असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी रामनगर आणि राजाजी पथ येथील रहिवासी आणि नगरसेवक मंदार हळबेंनी साखळी उपोषणाचा पवित्रा घेतला होता. त्याची दखल घेत ही समिती गठीत केली होती. शाळांना सुटी असल्याने दोन महिने शहरांतर्गत कोंडीचा फटका विद्यार्थ्यांना बसला नव्हता. पण, आता शाळा सुरू झाल्या आहेत, काही होणार आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न आणखी तीव्र होणार आहे. शहरात अवजड वाहनांना बंदी असावी, असेही अहवालात म्हटले होते. अनेक ठिकाणी नो पार्किंग बोर्डचा अभाव, झेब्रा क्रॉसिंग नसणे, सिग्नल यंत्रणा नाही, दुभाजक नाहीत, अशा अनेक मुद्यांवर त्या समितीने आक्षेप घेतले होते. त्यासह ठिकठिकाणी रिक्षा स्टॅण्डलाही आक्षेप घेतला होता. समितीच्या मुद्यांवर ठाण्यातील वरिष्ठांनी नागरिकांच्या सूचना-हरकती मागवल्या होत्या, पण त्यालाही आता महिना झाला असून त्याची पुन्हा सुनावणीही झालेली नाही. त्यामुळे तो अहवाल कागदावरच राहिल्याची चर्चा आहे. शहरांतर्गत मानपाडा रोड, टिळक पथ, इंदिरा गांधी चौक, उड्डाणपूल, नेहरू रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, स्थानक परिसर, ठाकुर्लीत पूर्वेला स्थानक परिसर आदी ठिकाणी वाहतूककोंडी होते. त्यामुळे वाहनचालक, नागरिक हैराण आहेत. ज्या सुनावण्या घ्यायच्या आहेत, त्या घ्याव्यात आणि अहवालाची तत्काळ अंमलबजावणी करावी. केवळ कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तातडीने कार्यवाही करा, अशी अपेक्षा डोंबिवलीकर व्यक्त करत आहेत. अहवालाची प्रत पालिकेलाही दिला होती, पण पालिकेनेही कार्यवाहीच्या दृष्टीने पावले उचललेली नाहीत. ठाण्यातील वरिष्ठांनी समिती गठीत केल्यानंतर आम्ही तातडीने प्रत्यक्ष पाहणी करत अहवाल बनवला. तो लगेचच वरिष्ठांकडे दोन महिन्यांपूर्वीच दिला. त्यावर सूचना-हरकती मागवण्यात आल्या होत्या, त्यानंतर पुढे काय झाले, याची कल्पना नाही.- बाळासाहेब आव्हाड, सहायक पोलीस आयुक्त, कल्याण वाहतूक विभाग