शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रिक्षा स्टॅण्डवर कारवाई कधी?

By admin | Updated: June 8, 2017 03:57 IST

शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाच्या ठाण्यातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली

अनिकेत घमंडी । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाच्या ठाण्यातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. या समितीने डोंबिवलीतील ४० अवैध रिक्षा स्टॅण्डवर कारवाई केली जावी, या मुख्य नोंदीसह अवजड वाहनांना बंदी, यासह अन्य पर्याय सुचवत अहवाल दिला होता. मात्र, त्यास दोन महिने उलटूनही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे तो अहवाल कागदावरच असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी रामनगर आणि राजाजी पथ येथील रहिवासी आणि नगरसेवक मंदार हळबेंनी साखळी उपोषणाचा पवित्रा घेतला होता. त्याची दखल घेत ही समिती गठीत केली होती. शाळांना सुटी असल्याने दोन महिने शहरांतर्गत कोंडीचा फटका विद्यार्थ्यांना बसला नव्हता. पण, आता शाळा सुरू झाल्या आहेत, काही होणार आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न आणखी तीव्र होणार आहे. शहरात अवजड वाहनांना बंदी असावी, असेही अहवालात म्हटले होते. अनेक ठिकाणी नो पार्किंग बोर्डचा अभाव, झेब्रा क्रॉसिंग नसणे, सिग्नल यंत्रणा नाही, दुभाजक नाहीत, अशा अनेक मुद्यांवर त्या समितीने आक्षेप घेतले होते. त्यासह ठिकठिकाणी रिक्षा स्टॅण्डलाही आक्षेप घेतला होता. समितीच्या मुद्यांवर ठाण्यातील वरिष्ठांनी नागरिकांच्या सूचना-हरकती मागवल्या होत्या, पण त्यालाही आता महिना झाला असून त्याची पुन्हा सुनावणीही झालेली नाही. त्यामुळे तो अहवाल कागदावरच राहिल्याची चर्चा आहे. शहरांतर्गत मानपाडा रोड, टिळक पथ, इंदिरा गांधी चौक, उड्डाणपूल, नेहरू रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, स्थानक परिसर, ठाकुर्लीत पूर्वेला स्थानक परिसर आदी ठिकाणी वाहतूककोंडी होते. त्यामुळे वाहनचालक, नागरिक हैराण आहेत. ज्या सुनावण्या घ्यायच्या आहेत, त्या घ्याव्यात आणि अहवालाची तत्काळ अंमलबजावणी करावी. केवळ कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तातडीने कार्यवाही करा, अशी अपेक्षा डोंबिवलीकर व्यक्त करत आहेत. अहवालाची प्रत पालिकेलाही दिला होती, पण पालिकेनेही कार्यवाहीच्या दृष्टीने पावले उचललेली नाहीत. ठाण्यातील वरिष्ठांनी समिती गठीत केल्यानंतर आम्ही तातडीने प्रत्यक्ष पाहणी करत अहवाल बनवला. तो लगेचच वरिष्ठांकडे दोन महिन्यांपूर्वीच दिला. त्यावर सूचना-हरकती मागवण्यात आल्या होत्या, त्यानंतर पुढे काय झाले, याची कल्पना नाही.- बाळासाहेब आव्हाड, सहायक पोलीस आयुक्त, कल्याण वाहतूक विभाग