शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमाला घरघर

By admin | Updated: September 19, 2016 02:36 IST

शेतकरी चिंतेत; १ लाख २७ हजार ५५0 शेतक-यांचे अनुदान प्रलंबित.

सिद्धार्थ आराख मेहकर (जि. बुलडाणा), दि. १८: विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत २0१२-१३ ते २0१६-१७ या कालावधीसाठी विदर्भात राबविण्यात आलेल्या सूक्ष्म सिंचनाचे सुमारे १ लाख २७ हजार ५५0 शेतकर्‍यांचे २५३ कोटी ४६ लाख ३१ हजार रुपयांचे अनुदान अद्यापही प्रलंबित आहे. यंदा विदर्भात पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येणार असल्यामुळे ही योजना बंद करण्याचा शासनाचा विचार असल्याने विदर्भ सधन सिंचन योजनेला घरघर लागली आहे. विदर्भातील कोरडवाहू जमिनीची उत्पादनक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत पाच वर्षांसाठी विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत सूक्ष्म सिंचनाची उपयोजना राबविण्यात आली. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना किमान दोन हेक्टरपर्यंत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना खर्चाच्या ७५ टक्के, तर सर्वसाधारण शेतकर्‍यांना ५0 टक्के अनुदान दिले जाते. गेल्या चार वर्षांत या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी ३ लाख ७९ हजार २७६ शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज केले होते, त्यापैकी ३ लाख ३६ हजार ८८४ शेतकर्‍यांचे अर्ज पात्र ठरविण्यात आले. त्यासाठी ६५४ कोटी ६३ लाख ७५ हजार एवढा निधी आवश्यक होता. त्यापैकी ३२0 कोटी ५४ लाख ५0 हजार रुपये म्हणजेच ५0 टक्के निधी उपलब्ध झाला. परंतु कृषी विभागाने पात्र अर्जापैकी १ लाख ४९ हजार ३२५ अर्जधारक शेतकर्‍यांना पूर्वसंमती दिली होती. पैकी १ लाख ४७ हजार ८७७ अर्ज निकाली काढून, त्यांना ३२२ कोटी ५९ लाख रुपये एवढा निधी अनुदानापोटी दिला. यात जिल्हा नियोजन समितीतून २ कोटी ४ लाख ५ हजार रुपयांचा समावेश आहे. पूर्वसंमती दिलेल्या ८६७ अर्जधारक शेतकर्‍यांना २ कोटी ६0 लाख २४ हजार रुपये, पूर्वसंमती न दिलेल्या १ लाख २६ हजार ६८३ अर्जधारक शेतकर्‍यांना २५0 कोटी ८६ लाख ७ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. २0१२-१३ मध्ये आलेल्या सर्व अर्जधारक शेतकर्‍यांना सूक्ष्म सिंचनाचे अनुदान देण्यात आले. परंतु यंदा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येणार आहे. शासनाकडून विदर्भ सधन सिंचन योजनेला मंजुरी नसल्याने ही योजना बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे समजते.जिल्हानिहाय प्रलंबित अर्ज व रक्कमबुलडाणा ४४,५७५ (१११ कोटी ९१ लाख ३ हजार रुपये), अकोला १६,0२२ (३१ कोटी १७ लाख ५२ हजार), वाशिम १९,३३४ (२८ कोटी १४ लाख ७ हजार), अमरावती १९,0३७ (३७ कोटी १७ लाख ५२ हजार), यवतमाळ १२,९७९ (१८ कोटी ६ लाख ८२ हजार), वर्धा ८0१७ (१२ कोटी ३२ लाख २९ हजार), नागपूर ३४७६ (७ कोटी ७0 लाख १४ हजार), भंडारा ५४३ (७७ लाख ८४ हजार), गोंदिया २0६ (४९ लाख १८ हजार), गडचिरोली १९ (८२ हजार रुपये).वर्ष                      शेतकरी संख्या            प्रलंबित असलेली अनुदानाची रक्कम२0१३-१४            १११८८                      ३२ कोटी ७0 लाख ६७ हजार रुपये२0१४-१५            ३८६0५                      १0६ कोटी ४0 लाख १७ हजार रुपये२0१५-१६             ७७७५७                      ११४ कोटी ३५ लाख ४७ हजार रुपये