शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वाराणशीत ‘आप’का क्या होगा?

By admin | Updated: May 11, 2014 00:37 IST

साधनसामुग्री नाही आणि महत्वाचे म्हणजे जाती धर्माच्या नावावर मिळणारा हक्काचा मतदार नाही. अशा वेळी केजरीवाल निवडून येतील तरी कसे ? हा प्रश्न आहे.

गजानन जानभोर - वाराणशी
परिश्रम, प्रामाणिक कार्यकर्त्यांची सोबत, सामान्यांतून सामान्य माणसापर्यंत पोहचण्याचे प्रयत्न, मतदारांच्या थेट हृदयात हात घालणारा संवाद एवढय़ा जमेच्या बाजू असुनही अरविंद केजरीवाल वाराणशीच्या रणांगणात बाजी मारतीलच, याची शाश्‍वती देता येत नाही.  कारण, फारसा निधी नाही, संघटित कार्यकर्त्यांची फळी नाही, साधनसामुग्री नाही आणि महत्वाचे म्हणजे जाती धर्माच्या नावावर मिळणारा हक्काचा मतदार नाही. अशा वेळी केजरीवाल निवडून येतील तरी कसे ? हा प्रश्न आहे. 
नरेंद्र मोदी यांनाच निवडून द्यायचे या निष्कर्षाप्रत वाराणशीची जनता येऊन पोहोचली आहे, असा दावा भाजपा करत आहे. सुरुवातीला मोदींपुढे अडथळ्यांचे अनेक घाट होते. पण हळुहळू ते पूर्ण करण्यात मोदींना यश आले. वाराणशीची हवा आता त्यांच्यासाठी अनुकूल झाली आहे, असे मोदी सर्मथकांचे म्हणणे आहे. अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणशीच्या लढाईत उतरून ही निवडणूक देशभरात चर्चेला आणली. केजरीवाल मोदींच्या विरोधात येथून उभे राहिले नसते तर या निवडणुकीची एवढी चर्चाही झाली नसती ही वस्तुस्थिती आहे. 
नेत्यांच्या सभांना, रोड शो ला उसळणार्‍या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होत नाही. हा निवडणुकांमधील सार्वत्रिक अनुभव आहे. केजरीवालांच्या सभांना, रोड शो ला लोक गर्दी करतात. त्यात उत्सुकता असते, शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याची भावनाही असते.  ‘यावेळी आपल्याला बदल हवा आहे, असे सार्‍यांना सांगणारा सामान्य माणूस आपली बांधिलकी सिद्ध करण्यासाठी, स्वत:च्या मनाला बजावून सांगण्यासाठी केजरीवालांच्या नुक्कड सभेला उपस्थिती लावतो, पांढरी टोपी घालून फिरण्यात त्याला कमालीचा आनंदही मिळतो. ‘मी प्रामाणिक आहे आणि चांगल्या माणसाच्या पाठीशी उभा आहे’ हे त्याला सुचवायचे असते. आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी पाच वर्षांतून एकदाच मिळणारी संधी तो सोडणार तरी कसा? पण मतदान करताना त्याची जात आणि धर्म आड येतो. आपले मत वाया तर जाणार नाही ना? असा नफ्या-तोट्याचा व्यवहार त्यात असतो. लाटेचा, अस्मितेचा, नातेसंबंधांचा त्याच्यावर एवढा दबाव असतो की, मतदान करताना तो व्यवहारच बघतो. केजरीवालांच्या बाबतीत वाराणशीत नेमके हेच होत आहे. 
या निवडणुकीत वाराणशीत ‘छतसभा’ हा एक आगळावेगळा प्रयोग पाहायला मिळाला. दाटीवाटीच्या मोहल्ल्यात नुक्कड सभाही घेता येत नाही. अशा ठिकाणी केजरीवालांच्या कार्यकर्त्यांनी घरावरच्या छतांवर सभा घेतल्या. हे काँग्रेस आणि भाजपवाल्यांनाही जमले नाही. वाराणशीच्या मुख्य रस्त्यांवर आणि चौकात हातात झाडू घेतलेले तरुण तासनतास उभे असल्याचे दिसतात. ते कुणाशी बोलत नाहीत. भाषणही देत नाहीत. ते फक्त शांत उभे असतात. रस्त्याने जाणार्‍या येणार्‍यांचे लक्ष गेले की, झाडूकडे लक्ष वेधून नमस्कार करतात. दरवेळी धार्मिक, जातीय अस्मितेभोवतीच गुरफटणार्‍या वाराणशीकरांना यावेळी प्रथमच त्यांच्या प्रश्नांची, समस्यांची जाणीव करून देण्यात आली. याचे श्रेय कुणाला आवडो न आवडो पण ते केजरीवालांनाच द्यावे लागेल. वाराणशीचे दुखणे, गार्‍हाणे प्रथमच या निमित्ताने सार्‍या जगासमोर आले. 
 
वाराणशीचा एक वेगळा स्वभाव आहे. ती आपला स्वभाव कधीच बदलत नाही. ‘परिवर्तन’ हवे पण ‘क्रांती’ नको, असे या स्वभावाचे वर्णन करता येईल. मोदींच्या रुपाने ते परिवर्तन होईल, पण केजरीवालांच्या रुपाने क्रांती करायला ही नगरी धजावणार नाही.
 
केजरीवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांना मिळालेला पाठिंबा आणि शुक्रवारच्या रोड शोमध्ये उसळलेला जनसमुदाय बघितल्यानंतर केजरीवाल शंभर टक्के निवडून यायला हवेत. पण तसे होणार नाही. याचे कारण असे की, वाराणशीच्या मतदारांनी कौल कुणाला द्यायचा हे ठरवून टाकले आहे. प्रेम, सहानुभूती केजरीवालांबद्दल परंतु मत मोदींनाच असा हा वाराणशीकरांचा हिशेब आहे.