शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

पुढचे पाऊल काय असेल ?

By admin | Updated: October 20, 2014 06:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रात सोडलेला अश्वमेध घोडा बहुमताच्या जादूई आकड्यापर्यंत जाण्यापासून शिवसेनेने रोखला खरा; परंतु सरकारमध्ये सहभागी व्हायचे

महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होईल. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी होणार नाही. त्यांनी सरकार स्थापनेकरिता बिनशर्त पाठिंबा दिला आहे. शिवसेनेबरोबरचे नातेही भाजपाने तोडलेले नाही. - अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजपासरकारमध्ये की विरोधी बाकावर ?पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रात सोडलेला अश्वमेध घोडा बहुमताच्या जादूई आकड्यापर्यंत जाण्यापासून शिवसेनेने रोखला खरा; परंतु सरकारमध्ये सहभागी व्हायचे की विरोधी बाकावर बसायचे, असा पेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे आहे. निवडणूक प्रचार काळात मोदी व शहांवर केलेल्या टीकेमुळे भाजपा नेत्यांची मने दुखावली गेली आहेत. त्यामुळे शिवसेनेला सोबत घेण्यास अनेकांचा विरोध आहे. तर दुसरीकडे ज्यांच्यावर टीका केली त्यांच्यासोबत कसे जायचे, असा पेच उद्धव यांच्यापुढे आहे. एकसंघ महाराष्ट्र आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद अशा अटींवर ते भाजपा सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात.पॉवरगेम यशस्वी होईल का ?स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी काँग्रेससोबतची आघाडी तोडली खरी, पण मतदारांनी राष्ट्रवादीचा पर्याय साफ धुडकावून लावला. ६२ जागांवरून त्यांना ४१ जागांवर आणले़ त्यामुळे विरोधी बाकावर बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसताना भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवून शरद पवार यांनी आपला खरा ‘चेहरा’ उघड केला. राष्ट्रवादीने देऊ केलेला पाठिंबा घेऊ नये, असा सल्ला रा. स्व. संघाने भाजपाला दिला आहे. त्यामुळे पवारांनी टाकलेला डाव कितपत यशस्वी होतो, यावरच पवारांची आगामी वाटचाल अवलंबून असेल. सत्तेशिवाय पवार राहू शकत नाहीत, या मान्यतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.प्रतिमा जपली, पण पक्ष संपविला !

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे स्वत: दक्षिण कऱ्हाडमधून विजयी झाले असले, तरी त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या काँग्रेस पक्षाची या निवडणुकीत पुरती वाताहात झाली. स्वत:च्या प्रतिमाप्रेमात असलेल्या चव्हाण यांनी राष्ट्रवादीसाठी टाकलेल्या जाळ्यात ते स्वत:च अडकले. ऐन निवडणुकीच्या पूर्वसंध्येला एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करून त्यांनी काँग्रेस पक्षाला अडचणीत टाकले. त्यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज असून, यापुढे कोणतीही मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकली जाण्याची शक्यता दिसत नाही. एक साधे आमदार म्हणून त्यांना विधानसभेत विरोधी बाकावर बसावे लागेल.