शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
2
आजचे राशीभविष्य : शनिवार 07 जून 2025; आजचा दिवस शुभ फलदायी, गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल
3
पाकिस्तानसाठी ६ मे ची रात्र ठरली ‘कयामत की रात’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
4
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
5
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
6
विशेष लेख: महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली? अशी निवडणूक विषसमान
7
बँकांना २.५ लाख कोटींची संजीवनी; कर्जांची सोय; अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी निर्णय
8
मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड
9
एलॉन मस्क यांचे वडीलही भारताच्या प्रेमात! अयोध्येतील राम मंदिरात येत रामललाचे घेतले दर्शन
10
RBIचे गिफ्ट, स्वस्तात काढा कर्ज! रेपोदरात अर्धा टक्का जम्बो कपात, कमी होणार EMI
11
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
12
अग्रलेख: अर्थव्यवस्थेत सुखद झुळूक! निर्णय अकस्मात; पण त्यामागे स्पष्ट आर्थिक कारणे
13
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
14
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
15
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
16
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
17
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
18
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
19
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
20
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन

मलालाला दिलेल्या ‘नोबेल’ची किंमत ती काय?

By admin | Updated: May 1, 2016 01:13 IST

अवघ्या १६ वर्षांच्या मलाला या मुलीला शांततेचा नोबेल पुरस्कार दिला. त्याची किंमत काय आहे ? असा कुणालाही दिला गेलेला पुरस्कार जर मला दिला तर मी घेणार नाही, अशी टीका

लातूर : अवघ्या १६ वर्षांच्या मलाला या मुलीला शांततेचा नोबेल पुरस्कार दिला. त्याची किंमत काय आहे ? असा कुणालाही दिला गेलेला पुरस्कार जर मला दिला तर मी घेणार नाही, अशी टीका ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी शनिवारी येथे केली. लातुरमधील विविध संस्थांच्या वतीने मांजरा नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामाला भेट देण्यासाठी ते आले होते. यावेळी ‘एमबीएफ’च्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मलाला या १६ वर्षाच्या मुलीचे कर्तृत्वच काय? अशा मुलीला नोबेल देऊन पुरस्काराची पत गेली. त्यामुळे आता हा पुरस्कार जरी मला मिळाला तरी मी तो घेणार नाही. मी कोणत्याही पुरस्कारासाठी काम करीत नाही. तो पुरस्कार राजकीय झाला आहे. काम करुनही पुरस्कार मिळेल याची खात्री नाही. माझ्याकडे काही लोक आले होते. परंतु मी या पुरस्काराच्या राजकारणात पडू इच्छित नाही. सिंचनासाठी खूप प्रकल्प झाले, त्या पाण्यावर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार. मात्र तसे होत नाही, असे सांगून रवीशंकर म्हणाले की, नद्याचे पुनरुज्जीवन आणि नद्याजोड हे दोन मुख्य कामे सरकारने हाती घ्यायला हवीत. नद्या या देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या नाड्या आहेत. त्या जोडल्या तर हरितक्रांती दूर नाही. हीच बाब ओळखून आम्ही नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष काम करीत आहोत. महाराष्ट्रात यापूर्वी १६ नद्यांचे पुनरुज्जीवन केले आहे. लातूर जिल्ह्यातील मांजरा नदी १७ वी आहे. यापूर्वी या जिल्ह्यात ‘आर्ट आॅफ लिव्हींग’ने घरणी आणि तावरजा नदीवर काम केले. शासनाने हे काम केले असते तर किमान दहा वर्षे लागले असते. परंतु लोकसहभागामुळे हे लवकर होत आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या चिंतेची बाब असल्याचे सांगून ते म्हणाले, देवावरचा आणि समाजावरचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे शेतकरी खचून आत्महत्या करीत आहे. यासाठी शेतकऱ्यांना बळ देणे आवश्यक आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे समाजाने त्यांना सांगितले पाहीजे. आर्ट आॅफ लिव्हींगच्या वतीने आम्ही हे करीत असून तन, मन आणि धन यासाठी देत आहोत. (प्रतिनिधी)फक्त मने प्रदूषित झाली!आम्ही यमुनेच्या पात्रात कार्यक्रमात घेतला. अनेकांनी आरोप केले की नदीचे प्रदूषण झाले. आमचे आव्हान आहे की, शास्त्रीय पध्दतीनेकुणीही आम्हाला सिध्द करुन दाखवावे की हवा, पाणी आणि मातीचे प्रदूषण झाले? आम्ही कोणत्याही कारवाईला सामोरे जाऊ. पणआमच्या कार्यक्रमामुळे मात्र काहींची मने प्रदूषित झाल्याचेश्री श्री रविशंकर यांनी सांगितले.