शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोयाबीनचे करायचे काय? बारदान्याअभावी ३० टक्केच खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण, आज मुदत संपणार

By सुनील चरपे | Updated: January 12, 2025 10:03 IST

केंद्र सरकारने चालू हंगामासाठी साेयाबीनची एमएसपी ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली.

नागपूर : राज्य सरकारने नाफेड व एनसीसीएफच्या मदतीने राज्यात ५६२ साेयाबीन खरेदी केंद्र सुरू केले. या दाेन्ही संस्थांना १४ लाख १३ हजार मेट्रिक टन साेयाबीन खरेदीचे उद्दिष्ट दिले. या संस्थांनी तीन महिन्यांत केवळ ३० टक्केच उद्दिष्ट पूर्ण केले. १२ जानेवारीला या खरेदीची मुदत संपणार असून, आठवडाभरापासून बारदान्याअभावी बहुतांश केंद्रांवरील साेयाबीन खरेदी बंद आहे. 

केंद्र सरकारने चालू हंगामासाठी साेयाबीनची एमएसपी ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली. खरेदी हंगाम सुरू हाेताच खुल्या बाजारात साेयाबीनचे दर प्रतिक्विंटल २,९०० रुपयांपर्यंत खाली आले हाेते. त्यानंतर हेच दर ३,७०० ते ४,००० रुपयांच्या आसपास स्थिरावले. विधानसभा निवडणुकीमुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर २०२४ च्या पहिल्या आठवड्यात नाफेड व एनसीसीएफच्या मदतीने एमएसपी दरात १४ लाख १३ हजार मेट्रिक टन साेयाबीन खरेदीचा निर्णय घेतला.

बैठक व टेंडरचे वरातीमागून घाेडेहा तिढा साेडविण्यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी (दि. ८) मंत्रालयात विशेष बैठक बाेलावली. बैठकीत त्यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांना बारदान्याची तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यावर चार दिवसांत बारदाना उपलब्ध करून देण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली आणि गुरुवारी (दि. ९) नवीन बारदान्याचे टेंडर मागविले. रविवारी (दि. १२) साेयाबीन खरेदीची मुदत संपणार असल्याने बैठक व टेंडरला अर्थ काय? असा प्रश्न आहे. 

जुजबी उपाययाेजनासाेयाबीन भरण्यासाठी ५० किलाे क्षमतेच्या पाेत्यांचा वापर केला जाताे. या पाेत्यांवर नाफेडचा लाेगाे, स्टॅम्प व इतर माहिती प्रिंट केलेली असते. एकूण उद्दिष्टाच्या किमान ७० टक्के साेयाबीन नाफेडला खरेदी करावयाची हाेती. आता शेतकऱ्यांचा राेष कमी करण्यासाठी नाफेडने सुस्थितीत व प्रिंट असलेली जुनी पाेती वापरण्याचा फतवा नाफेडने काढला. 

टॅग्स :Soybeanसोयाबीन