शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

आषाढीसाठी काय तयारी?

By admin | Updated: June 11, 2015 01:22 IST

पुढच्या महिन्यातील आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी नेमकी काय तयारी केली आहे,

मुंबई : पुढच्या महिन्यातील आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी नेमकी काय तयारी केली आहे, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायायलाने बुधवारी राज्य शासनाला दिले.विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सुमारे १५ लाख भाविक पंढरपुरात दाखल होतात. पुढच्या महिन्यात २७ जुलैला आषाढी आहे. तेव्हा संपूर्ण राज्यातून १५ लाखांहून अधिक वारकारी पंढरपुरात येतील. मात्र त्यांची राहण्याची व शौचालयाची सोय शासन योग्य प्रकारे करीत नाही. यामुळे भाविकांना स्वत:लाच राहण्याची व्यवस्था करावी लागते. अजूनही पंढरपूरमध्ये मानवाकडून मानवी विष्ठा उचलली जाते, असा आरोप करीत वारकरी संघटनेने उच्च न्यायालयात अर्ज केला. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी न्यायालयानेच शासनाला आदेश द्यावेत, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. याचे प्रत्युत्तर सादर करताना मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी पंढरपूरमधील तयारीचा तपशील न्यायालयासमोर ठेवला. पंढरपुरात चार हजार मोबाइल शौचालये दिली आहेत. अजून सहा हजार दिली जाणार आहेत. वारकऱ्यांना राहण्यासाठी मंदिरापासून अंदाजे दीड किमी अंतरावर १५ एकरांचा भूखंड शासन ताब्यात घेणार आहे, असे अ‍ॅड. वग्यानी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. (प्रतिनिधी)