शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

साहसी क्रीडा प्रकार म्हणजे नेमके काय? न्यायालयाने फटकारले

By admin | Updated: July 17, 2017 21:33 IST

आपली नेमकी भूमिका स्पष्ट करा असा आदेशच राज्य सरकारला देण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - दहीहंडीचा समावेश क्रीडा प्रकारात करण्यात येईल असं आश्वासन राज्य सरकार वारंवार देत असतं. मात्र सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलंच फटकारलं. साहसी क्रीडा प्रकार म्हणजे नेमकं काय ? अशी विचारणाच न्यायालयाने राज्य सरकारकडे केली. इतकंच नाही तर पाच वर्षांच्या मुलाला उंचीवर चढवण्यात कोणतं साहसं आहे? असा सवालही विचारला. आपली नेमकी भूमिका स्पष्ट करा असा आदेशच राज्य सरकारला देण्यात आला आहे. 
 
संबंधित बातम्या 
 
न्यायालयाने दहीहंडी उत्सवावर काही निर्बंध लावले आहेत, ज्याचा गोविेदा पथकांकडून विरोध होत आहे. काही दिवसांपुर्वी  मुंबईचे भाजपाध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी दहीहंडीपर्यंत न्यायालयाने घातलेल्या नियमांमध्ये बदल न झाल्यास राज्य सरकारकडून विशेष अध्यादेश काढला जाईल असं आश्वासन देणार ट्विट केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रशासकीय अधिकारी, आयुक्त आणि अधिवक्ता यांची गणेशोत्सव, दहीहंडी संदर्भात बैठक पार पडली होती. त्यानंतर आशिष शेलार यांनी ही माहिती दिली होती. 
 
विशेष म्हणजे सुनावणीदरम्यान न्यायालयाने आशिष शेलार यांना सल्ला दिला आहे. आशिष शेलारांनी यापुढे दहिहंडीच्या कार्यक्रमाला जाताना विशेष काळजी घ्यावी असा सल्लाच न्यायालयाकडून देण्यात आला. या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर अनेक गोविंदा पथके सरावाला सुरुवात करणार आहेत. गोविंदांच्या सुरक्षेसाठी काय ठोस उपाययोजना केलेल्या आहेत, त्याचं लेखी स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून मागवलं आहे.
 
दहीहंडीच्या उंचीची मर्यादा २० फूट ठेवावी आणि १८ वर्षांखालील गोविंदांना मानवी मनोऱ्यात सहभागी करून घेऊ नयेत, असे स्पष्ट आदेश असतानाही २०१५ मध्ये दहीहंडी उत्सवात ठिकठिकाणी गोविंदा पथकं व आयोजकांकडून आदेश भंग झाला. म्हणून त्याविरोधात स्वाती पाटील यांनी न्यायालयीन अवमानाची याचिका दाखल केली आहे. 
 
ठाण्यात दहीहंडी सरावाचा गुरुपौर्णिमेचा मुहूर्त कोर्टाच्या दाव्याने हुकला
दहीहंडी उत्सवाचा सराव अनेक गोविंदा पथक हे परंपरेनुसार गुरूपौर्णिमेच्या दिवशीच सुरू करतात. ठाणे शहरात छोटी मोठी अशी ५००च्या आसपास गोविंदा पथक आहेत. परंतु दोन वर्षांपूर्वी न्यायालयाने आणलेल्या बंधनामुळे काही गोविंदा पथकांनी उत्सवात सहभागी होणे बंद केले. यंदा शहरात अंदाजे ३५०च्या आसपास गोविंदा पथके उतरणार असली तरी बहुतांश गोविंदा पथके सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. त्यानंतरच सरावाला सुरुवात करणार आहेत.