शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

अल्पमतातील सरकार म्हणजे काय?

By admin | Updated: November 13, 2014 01:32 IST

ज्या सरकारकडे स्वत:चे असे कायमस्वरूपी बहुमत नसते अशा सरकारला लोकशाहीत अल्पमतातील सरकार म्हटले जाते.

मुंबई : ज्या सरकारकडे स्वत:चे असे कायमस्वरूपी बहुमत नसते अशा सरकारला लोकशाहीत अल्पमतातील सरकार म्हटले जाते. निवडणुकीत सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या निम्म्या जागाही न जिंकलेला पक्ष किंवा आघाडी असे सरकार स्थापन करते. कागदावर गणित करून दाखविता येईल, एवढे बहुमत अशा सरकारकडे नसते. तरीही सभागृहात विश्वासदर्शक ठराव जिंकून किंवा अविश्वास ठराव फेटाळला जाऊन असे सरकार टिकून राहू शकते.
सभागृहात बहुमताने ठराव जिंकला म्हणून असे मुळातच अल्पमतात असलेले सरकार बहुमताचे सरकार होऊ शकत नाही. याचे कारण असे, की सभागृहातील विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी अथवा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यासाठी सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या निम्म्याहून सदस्यांच्या पाठिंब्याची गरज नसते. किंबहुना असे ठराव आवाजी मतदानानेही मंजूर केले जाऊ शकतात. प्रत्यक्ष मतदान झालेच, तरी त्या वेळी हजर असलेल्या व मतदान करणा:या सदस्यांपैकी बहुसंख्य सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करणो पुरेसे असते.
राजकीय जाणकारांच्या मते, अल्पमतातील सरकार चालविणारे फडणवीस हे काही पहिले नाहीत़ यापूर्वी केंद्रात आणि राज्यांत अल्पमतातील सरकारे आली आणि नांदलीत़ केंद्रात पहिले अल्पमतातील सरकार 1991 मध्ये पी़ व्ही़ नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली आल़े 1991 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकूण 244 जागा मिळाल्या होत्या़ भाजपाला 12क् आणि व्ही़ पी़ सिंह यांच्या जनता दलाच्या झोळीत 69 जागा पडल्या होत्या़ 
काही अपक्ष आणि डाव्या पक्षांच्या बाहेरून दिलेल्या पाठिंब्याच्या आधारे राव सरकार अस्तित्वात आल़े विशेष म्हणजे या सरकारने आपला पाच वर्षाचा कार्यकाळही पूर्ण केला़ यानंतरच्या काळात चौधरी अजितसिंह यांची जनता पार्टी, तेलगू देसम आणि झारखंड मुक्ती मोर्चा अशा काही पक्षांच्या खासदारांना आपल्याकडे वळवून राव सरकारने कामचलाऊ बहुमतही जमवले होत़े
राज्यातही अशाप्रकारची अनेक उदाहरणो मिळतील़ त्रिशंकू विधानसभेच्या स्थितीत अल्पमतातील सरकारे आलीत आणि चालली़ हरियाणात भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील गत काँग्रेस सरकार अल्पमताच्या कुबडय़ांवरच तरले होत़े अलीकडे दिल्लीत भाजपाने अल्पमतातील सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न चालवले होत़े मात्र नंतर बदनामीच्या भीतीने भाजपाने हे प्रयत्न थांबवले होत़े
 
हुड्डा सरकारचे उदाहरण
हरियाणात भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील गत काँग्रेस सरकार अल्पमताच्या कुबडय़ांवरच तरले होत़े काही अपक्ष आणि लहान पक्षांच्या आधारावर या सरकारने पाच वर्षाचा कार्यकाळही पूर्ण केला होता़ यापूर्वीही एकदा काँग्रेसने स्व़ भजनलाल यांच्या नेतृत्वाखाली हरियाणा अल्पमतातील सरकार चालवले आह़े