शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

काय आहे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 13:03 IST

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नी नेमलेल्या समन्वय समितीची पुनर्रचना केली आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी वैद्यनाथन यांची नियुक्ती केेली आहे.

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक दरम्यानचा सीमाप्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सीमाभागातील सुमारे सात हजार किलोमीटर भूभागावर महाराष्ट्राने आपला दावा सांगितला आहे. यात गुलबर्गा, उत्तर कन्नड, बिदर, बेळगाव, कारवार व निपाणी या शहरांसह ८१४ मराठी भाषिक गावांचा समावेश आहे. या प्रकरणावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नी नेमलेल्या समन्वय समितीची पुनर्रचना केली आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी वैद्यनाथन यांची नियुक्ती केेली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गेल्या महिन्यात बेळगाव महाराष्ट्राला कदापी देणार नाही असे म्हटले होते. कोल्हापुरात मात्र त्यांनी हा प्रश्न दोन्ही सरकारच्या विचारानेच सोडवला जाईल असे सांगितले.

- १९५६ मध्ये बेळगावचा समावेश महाराष्ट्रात करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना करण्यात आली.- १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना कायद्यानुसार बेळगावचा समावेश महाराष्ट्राऐवजी म्हैसूर राज्यात करण्यात आला.

- १९५७ मध्ये महाराष्ट्राने नाराजी व्यक्त करत एकूण ८१४ खेड्यांची मागणी केली तर २६० खेडी म्हैसूरला देण्याचे मान्य केले. बेळगाव शहर मात्र महाराष्ट्रातच हवे अशी ठाम भूमिका घेतली. याच मागणीसाठी सेनापती बापट यांनी उपोषणही केले.

- १९६६ मध्ये केंद्रसरकारने सीमाप्रश्न सोडवण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती मेहरचंद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला.

१९६७ मध्ये महाजन आयोगाने आपला अहवाल सोपवला. या अहवालानुसार--    उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवारसह २६४ गावे व सुपा प्रांतातील ३०० गावे महाराष्ट्राला द्यावीत-    महाराष्ट्रातील सोलापूरसह २४७ गावे कर्नाटकला द्यावीत-    केरळमधील कासारगोड जिल्हा कर्नाटकात समाविष्ट करावा-    बेळगाव कर्नाटकमध्येच राहिल.

- १९७३ मध्ये म्हैसूर राज्याचे नाव बदलून कर्नाटक करण्यात आले.

- १९८३ मध्ये बेळगाव महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत मराठी भाषिकांनी सत्ता स्थापन केली.  या महापालिकेसह सुमारे २५० गावांनी  कर्नाटक सरकारला प्रस्ताव पाठवून महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली.

- २००५ मध्ये बेळगाव महापालिकेने महाराष्ट्रात सहभागी होण्यासंदर्भात ठराव केल्याने राज्य सरकारने महापालिका बरखास्त केली. महाराष्ट्र सरकारने हा वाद सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

- २००६ मध्ये बेळगाववरील आपला दावा मजबूत करण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने बेळवात पाच दिवसीय हिवाळी अधिवेशन बोलावले.

- २०१२ मध्ये कर्नाटकने बेळगाव येथे विधानसौध नावाची विधानपरिषदेची इमारत उभा केली. येथे दरवर्षी हिवाळी अधिवेशन बोलावले जाते.

- १९५६ पर्यंत बेळगाव, कारवार, धारवाड व विजापूर हे चार जिल्हे मुंबई राज्यात समाविष्ट होते. 

- स्वातंत्र्यानंतर बेळगाव या मराठीबहुल शहराचा समावेश महाराष्ट्रात करण्यात यावा, अशी मागणी होऊ लागली.

संकलन : संतोष मोरबाळे इन्फोग्राफिक : सचिन ओतारी 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकborder disputeसीमा वाद