शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
2
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
3
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
4
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
5
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
6
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
7
'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
8
Maharashtra CET: सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, कुठल्या दिवशी कोणता पेपर? वाचा
9
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
10
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
11
विनायक चतुर्थी २०२५: मार्गशीर्ष विनायक चतुर्थी ठरणार खास, गणेशकृपेने ९ राशींची पूर्ण होणार आस!
12
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
13
Tarot Card: लोभाला बळी पडू नका, मनाचा कौल घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
14
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
15
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
16
Mumbai: देवदर्शनाहून परत येताना मुलाचा ट्रेनमधून पडून मृत्यू; तब्बल १७ वर्षांनी पालकांना नुकसानभरपाई!
17
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
18
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
19
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
20
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
Daily Top 2Weekly Top 5

तटकरेंचा तपास संथगतीने का?

By admin | Updated: July 2, 2015 01:14 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या विरोधातील याचिकेवरील सुनावणीत बुधवारी उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते खासदार किरीट सोमैया

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या विरोधातील याचिकेवरील सुनावणीत बुधवारी उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते खासदार किरीट सोमैया व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच े(एसीबी) कान उपटले. दोन वर्षांपासून फक्त तपासच करताय, अद्याप ठोस निर्णयापर्यंत का पोहोचला नाहीत, अशा शब्दांत न्यायालयाने एसीबीला फटकारले. त्याचप्रमाणे संबंधित यंत्रणांकडे तक्रार करण्याची मुभा असताना न्यायालयात याचिका करण्याची गरजच काय, अशा शब्दांत सोमैयांनाही खडे बोल सुनावले.तटकरेंविरोधातील याचिकेवर सुनावणी का घ्यावी, याचा खुलासा करण्याचे आदेश न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने सोमैया व एसीबीला दिले. या प्रकरणी पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे. तटकरे यांनी स्वत:च्या व कुटुंबीयांच्या नावे ५१ कंपन्या काढून शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या़ याने शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाला. या व्यवहारांमध्ये मनी लाँड्रिगही झाले आहे़ त्यामुळे या भ्रष्टाचाराचा तपास करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सोमैया यांनी याचिकेद्वारे केली होती. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने एसीबीला चौकशीचे आदेश दिले होते. ही याचिका करण्या मागील तुमचा नेमका हेतू काय, असे न्यायालयाने सर्वप्रथम सोमय्या यांना विचारले. त्यावर तक्रार करूनही कारवाई न झाल्याने याचिका केल्याचे उत्तर सोमैयांकडून पुढे केले गेले. मात्र कायदा आपल्या पद्धतीने काम करणार. यासाठी थेट उच्च न्यायालयात येण्याची आवश्यकता काय आहे. कायद्याने तत्त्वाप्रमाणे काम करू नये, अशी तुमची इच्छा आहे का, असा सवाल न्यायालयाने केला. त्यावर एसीबीने चौकशी करून अंतरिम अहवाल न्यायालयात सादर केले. मात्र तटकरेंवर प्रत्यक्षात कारवाई होणार का हे एसीबी स्पष्टपणे सांगत नाही, असा मुद्दा सोमैयांनी मांडला. तसेच बंद पाकिटातील अहवालात नेमके काय आहे, हे जाणून व ही याचिका प्रलंबित ठेवण्यात तुमचा हेतू काय, तुमचा कोणता हेतू साध्य होणार आहे, असा सवालही खंडपीठाने सोमैयांना केला.तटकरेंचा मूलभूत आक्षेपया याचिकेवर सुनावणी होऊच शकत नाही, असा दावा तटकरेंच्या वतीने करण्यात आला. याचिकेवर प्रतिवादीचा आक्षेप असल्यास सर्व प्रथम त्या मुद्द्यावर निर्णय द्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पण या मुद्द्यावर सुनावणीच घेतली जात नाही. केवळ बंद पाकिटात अहवाल सादर होत आहेत, पुढे काहीच होत नाही. तेव्हा या याचिकेवर सुनावणी होऊ शकते की नाही, या मुद्द्यावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी तटकरे यांच्यावतीने करण्यात आली. ती ग्राह्य धरीत न्यायालयाने वरील आदेश देऊन ही सुनावणी तहकूब केली. (प्रतिनिधी)तीन महिन्यांचा वादाएसीबी येत्या तीन महिन्यांत तपास पूर्ण करेल, असे हंगामी अ‍ॅडव्होकेट जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. या उत्तरावर खंडपीठ संतापले. ही याचिका २०१२ साली दाखल झाली. तेव्हापासून एसीबी केवळ बंद लिफाफ्यात तपास अहवाल सादर करते आहे. ठोस निर्णयापर्यंत अजून एसीबी पोहोचलेली नाही. बंद पाकिटातले अहवाल दाखल करून वेळोवेळी सुनावणी तहकूब करायचे काम न्यायालयाने करावे का, असे खडे बोल खंडपीठाने सुनावले.