शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

स्वातंत्र्य दिन म्हणजे काय रे मित्रा..?

By admin | Updated: August 15, 2016 03:13 IST

देशाच्या ६९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देणारे मेसेज, फोटोज आणि व्हीडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

देशाच्या ६९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देणारे मेसेज, फोटोज आणि व्हीडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेषत: तरूणाईकडून या पोस्ट शेअर होत असून हजारो लाईक्सही मिळत आहेत. मात्र एखादी पोस्ट कॉपी पेस्ट करताना त्यामागील इतिहास किंवा प्राथमिक माहिती तरूणाई घेते का? हे जाणून घेण्यासाठी ह्यलोकमतह्णने महाविद्यालयात शिकणाऱ्या युवा मंडळीला काही शालेय स्तरावरील प्रश्न विचारले. मात्र ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरेच देता आली नाही. बहुतेक विद्यार्थ्यांनी खूप धक्कादायक, आश्चर्यकारक आणि मजेशीर उत्तरे दिली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हे विद्यार्थी म्हणजे आजच्या तरूणाईचे प्रातिनिधीक स्वरूप आहे. त्यामुळे या चुकीच्या उत्तरांसाठी केवळ या तरूणाईला दोषी ठरवून चालणार नाही. तर त्यांच्या चुकीच्या उत्तरांमधून आपल्या शिक्षणव्यवस्थेचा उथळपणा स्पष्ट होतो. आणि विद्यार्थ्यांचे पालकही या परिस्थितीसाठी तितकेच जबाबदार आहेत, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. माध्यम म्हणून ह्यलोकमतह्णने हसत-खेळत तरूणाईला अंतर्मुख करायला लावणारा हा प्रयोग केला आहे. त्यामुळे ह्यआपल्या देशाचा इतिहास केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित न ठेवता, तो आपल्या मनात, रक्तात आणि श्वासात सदैव जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करूह्ण ही शपथ यंदाच्या स्वातंत्र्यदिनाला नक्कीच घेऊ....>विद्यार्थ्याचे नाव - हितेश आखाडेकॉलेज - महर्षी दयानंद महाविद्यालय वर्ष - टी. वाय. बी. एससीभारताचे पहिले पंतप्रधान कोण?- पंडीत जवाहरलाल नेहरु.भारताची राज्यघटना कोणी लिहिली? - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि १८ सदस्यांनी लिहिली. १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी यामध्ये काय फरक आहे?- १५ आॅगस्टला स्वतंत्र मिळाले, २६ जानेवारी १९४९ ला संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली.भारत स्वतंत्र कधी झाला?- १५ आॅगस्ट १९४७ >विद्यार्थीनीचे नाव - ऐश्वर्या शेडगेकॉलेज - महर्षी दयानंद महाविद्यालयवर्ष - टी. वाय. बी. एभारताचे पहिले पंतप्रधान कोण?-पंडीत जवाहरलाल नेहरु.भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?- नो आयडिया.... सरदार वल्लभ भाई पटेल.राज्यघटना कोणी लिहिली? - ड्राफ्टिंग कमिटी आणि बाबासाहेब यांचे आर्किटेक्चर होते.१५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी यामध्ये काय फरक आहे?- २६ जानेवारीला आपल्याला कॉन्स्टिट्युशन भेटले. १५ आॅगस्टला आपल्याला आझादी भेटली. >विद्यार्थिनीचे नाव -शिवानी मनवालकॉलेज - डहाणुकर महाविद्यालयवर्ष - एफ. वाय. बी. कॉम.भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?- अब्दुल कलाम.भारताचे पहिले पंतप्रधान कोण?उत्तर- माहित नाही.भारताची राज्यघटना कोणी लिहिली? - मला नाही माहिती.पहिली महिला राष्ट्रपती कोण?- प्रतिभाताई पाटिल.>विद्यार्थ्याचे नाव - यश बनेकॉलेज - अल्फा कनिष्ठ महाविद्यालयवर्ष - एस.वाय.जे.सी.भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?- माहित नाही.भारताचे पहिले पंतप्रधान कोण?- माहित नाही.भारताची राज्यघटना कोणी लिहिली? - माहित नाही.१५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी यामध्ये फरक काय आहे?- माहित नाही.भारत देश स्वतंत्र कधी झाला- माहित नाही.>विद्यार्थीनीचे नाव - मनाली रेवडेकरकॉलेज - महर्षी दयानंद महाविद्यालय वर्ष - एस. वाय. बी. कॉम.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? - अअअअ.... माहित नाही.पहिली भारतीय महिला अंतराळ कोण?- कल्पना चावला.भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?- माहिती नाही.भारताचे पहिले पंतप्रधान कोण?- माहित नाही.भारत स्वतंत्र कधी झाला?उत्तर- १५ आॅगस्ट १९४७.