शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

तर स्फोट झाल्यास काय ?

By admin | Updated: October 23, 2014 00:29 IST

दिवाळीच्या पर्वावर शहरात फटाक्यांच्या दुकानांना ज्या निकषावर परवाने मिळालेले असतात त्या निकषाचे पालन अनेक दुकानदारांकडून होत नसल्याने वर्दळीच्या मार्गावरील दुकाने स्फोटकांचे अड्डे बनले आहेत.

गांधीबागेत फटाका दुकानांकडून निकषाचे पालन नाही : मोठ्या धोक्याची शक्यतानागपूर : दिवाळीच्या पर्वावर शहरात फटाक्यांच्या दुकानांना ज्या निकषावर परवाने मिळालेले असतात त्या निकषाचे पालन अनेक दुकानदारांकडून होत नसल्याने वर्दळीच्या मार्गावरील दुकाने स्फोटकांचे अड्डे बनले आहेत. विशेषत: अग्रसेन चौक ते महात्मा गांधी पुतळा या मार्गावर पन्नासवर फटाक्यांच्या दुकानांची स्थिती पाहता मोठा धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिवाळी म्हटले की फटाके आलेच. दिवाळीच्या या दहा दिवसात शहरात २०० कोटीच्यावर फटाक्यांचा व्यवसाय होतो. मागील वर्षी किरकोळ फटाका विक्रेत्यांची सुमारे पाचशेच्यावर दुकाने लागली होती. या वर्षी खुल्या मैदानातील व पक्के बांधकामातील फटाक्यांच्या दुकानांची संख्या याच्या दुप्पट गेली आहे. तात्पुरत्या फटाक्याचे दुकान लावण्यासाठी दुकानदाराला पोलीस प्रशासनाला एक प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागते. यात दुकानात पुरेशा प्रमाणात दोन बादल्या रेती, पाण्याचा ड्रम व आगीपासून सुरक्षेच्या उपकरणाची व्यवस्था करण्यात येईल, दुकानाच्या आजूबाजूस ज्वालाग्रही, ज्वलनशील पदार्थ किंवा पेट्रोल, रॉकेल व इतर पदार्थ बाळगणार नाही व कोणालाही बाळगू देणार नाही, फटाका दुकानापर्यंत अग्निशमन दलाची गाडी येण्याकरिता मोकळा मार्ग राहील, आदी लिहून द्यावे लागते. परंतु मैदानातील फटाक्यांच्या दुकाने सोडल्यास, वर्दळीच्या मार्गावरील किंवा वसाहतीत असलेल्या दुकानांकडे पाहिल्यास हे सर्व नियम कागदोपत्री असल्याचेच दिसून येते. विशेषत गांधीबाग परिसरातील अनेक दुकानदारांनी तर आपले फटाके ठेवण्यासाठी सर्रास फुटपाथचा वापर केला आहे. सूत्रानुसार याच परिसरात काही मोठ्या दुकानदारांनी गांधीबाग परिसरात रिकाम्या खोल्या भाड्याने घेऊन त्याचा वापर फटाक्यांच्या गोडावूनसाठी केला आहे. काही फटाक्यांची दुकाने तर पानठेले, चहाटपऱ्या आणि मंदिराच्या बाजूला आहेत. त्यामुळे कधीही धोका होण्याची शक्यता आहे. अनेक दुकानांमध्ये दर्शनी भागात ठेवण्यात आलेले अग्निशमन यंत्र निकामी असल्याचे तर अनेकांकडे आग विझविण्यासाठी पाणी किंवा रेतीही नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)