शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

डाळ दर नियंत्रक कायद्याचे काय झाले?

By admin | Updated: April 12, 2017 02:23 IST

राज्यातील डाळीच्या व्यवस्थापनात राज्य सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची, तसेच ग्राहकांची सरकारने घोर फसवणूक केल्याचे स्पष्ट झल्याची

मुंबई : राज्यातील डाळीच्या व्यवस्थापनात राज्य सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची, तसेच ग्राहकांची सरकारने घोर फसवणूक केल्याचे स्पष्ट झल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. गांधीभवन येथे पत्रकारपरिषदेत बोलताना सावंत म्हणाले की, डाळीचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने तुरीचे उत्पादन वाढल्यावर हमी भावाने तूर खरेदी करणे अपेक्षित होते, पण सरकारच्या आशीर्वादाने व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडले आणि सरकारनेही खरेदीसाठी हात आखडते घेतले. राज्यात बारदाना आणि गोदामे उपलब्ध नाहीत, अशी तकलादू कारणे दिली जात आहेत. आता पणनमंत्र्यांनी अगोदर खरेदी केलेल्या तुरीची मोजणी होत नाही, तोपर्यंत नवीन खरेदी करू नये, असे फर्मान काढल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे.सुमारे साडेचार हजार कोटींचा डाळ घोटाळा या सरकारने केला होता. असंतोष निर्माण झाल्यानंतर डाळ दर नियंत्रक कायदा आणू, अशी घोषणा सरकारने केली. केंद्राकडे राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी या कायद्याचे प्रारूप पाठविल्यावर त्यावर केंद्रातर्फे देशाच्या कृषी सहकार व शेतकरी कल्याण खात्यातर्फे या कायद्याचा तीव्र शब्दांत विरोध झाला, असे सावंत म्हणाले. डाळ दरनियंत्रक कायद्याबाबात सरकारने तत्काळ स्पष्टीकरण द्यावे. बंद तूर खरेदी तत्काळ सुरू करावी, गोदामे नसतील, तर तूर ही डाळीच्या रूपात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत स्वस्त दरात जनतेला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सावंत यांनी केली. (प्रतिनिधी)