शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मराठा सर्वेक्षणावरील खर्चाचे काय ?

By admin | Updated: November 16, 2014 01:00 IST

मराठा आरक्षणासाठी प्रदीर्घ काळापासून होत असलेली मागणी निवडणुकीच्या वर्षात गत आघाडी सरकारने मान्य केली खरी, पण न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे. मात्र आरक्षण लागू करण्यापूर्वी मराठा

देयके ५५ लाखांची : शासनाने दिले १० लाखचंद्रशेखर बोबडे - नागपूरमराठा आरक्षणासाठी प्रदीर्घ काळापासून होत असलेली मागणी निवडणुकीच्या वर्षात गत आघाडी सरकारने मान्य केली खरी, पण न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे. मात्र आरक्षण लागू करण्यापूर्वी मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती अद्यापही पूर्णपणे करण्यात आली नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी गत आघाडी सरकारवर पक्षांतर्गतच दबाव असल्याने व निवडणुकीचे वर्ष असल्याने तत्काळ पावले उचलण्यात आली. राणे समिती गठित करून तातडीने मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी फेब्रुवारी २०१४ मध्ये एक बैठक झाली व प्रत्येक जिल्ह्यात तत्काळ सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातही यंत्रणा राबली. सर्वेक्षणासाठी एका दिवसात लाखो फॉर्मची छपाई करण्यात आली. इतर स्टेशनरीवरही खर्च करण्यात आला. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रगणक व सर्वेक्षकांच्या नियुक्त्या करून कामकाजाला सुरुवात करण्यात आली होती. या सर्वेक्षणाच्या आधारावरच मराठ्यांना १६ टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्याला स्थगिती मिळाली असली तरी या सर्वेक्षणावर झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती जिल्हा प्रशासनाला झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जाची छपाई, छायांकित प्रती काढण्यासाठी झालेला खर्च, प्रगणक व सर्वेक्षकांचा खर्च आदीपोटी जिल्हा प्रशासनाने ५५ लाखाची देयके शासनाकडे पाठविली होती. त्यापैकी अलीकडेच फक्त १० लाख रुपये प्राप्त झाले आहेत. या तुटपुंज्या रकमेतून कोणाचे देयक अदा करायचे आणि कोणाला थांबवायचे असा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. प्राप्त माहितीनुसार अर्जांच्या छपाईचेच देयक ५ लाख ५० हजार रुपयांवर आहे तर तेवढेच देयक छायांकित प्रतीसाठी झालेल्या खर्चाचे आहे. प्रगणक व सर्वेक्षकांच्या मानधनाचा यात समावेश नाही. त्यांनाही त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. आता तर आरक्षणाला न्यायालयानेच स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुढच्या काळात शिल्लक रक्कम शासन केव्हा अदा करेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दीड हजारावर प्रमाणपत्रांचे वाटपगत आघाडी सरकारने मराठा आणि मुस्लिमांना आरक्षण लागू करण्याची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत सेतू केंद्राकडे जात प्रमाणपत्रासाठी आलेल्या सरासरी १२०० ते १५०० अर्जाचा निपटारा करण्यात आल्याची माहिती आहे. नेमका आकडा कळू शकला नाही. पण यात मराठा समाजातील अर्जाचा समावेश अधिक होता. मुंबई उच्च न्यायालयाने शासनाच्या आदेशाला स्थगिती दिली असली तरी आतापर्यंत जारी केलेल्या प्रमाणपत्रांवर याचा परिणाम होणार नाही हे येथे उल्लेखनीय.