शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

मराठा सर्वेक्षणावरील खर्चाचे काय ?

By admin | Updated: November 16, 2014 01:00 IST

मराठा आरक्षणासाठी प्रदीर्घ काळापासून होत असलेली मागणी निवडणुकीच्या वर्षात गत आघाडी सरकारने मान्य केली खरी, पण न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे. मात्र आरक्षण लागू करण्यापूर्वी मराठा

देयके ५५ लाखांची : शासनाने दिले १० लाखचंद्रशेखर बोबडे - नागपूरमराठा आरक्षणासाठी प्रदीर्घ काळापासून होत असलेली मागणी निवडणुकीच्या वर्षात गत आघाडी सरकारने मान्य केली खरी, पण न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे. मात्र आरक्षण लागू करण्यापूर्वी मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती अद्यापही पूर्णपणे करण्यात आली नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी गत आघाडी सरकारवर पक्षांतर्गतच दबाव असल्याने व निवडणुकीचे वर्ष असल्याने तत्काळ पावले उचलण्यात आली. राणे समिती गठित करून तातडीने मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी फेब्रुवारी २०१४ मध्ये एक बैठक झाली व प्रत्येक जिल्ह्यात तत्काळ सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातही यंत्रणा राबली. सर्वेक्षणासाठी एका दिवसात लाखो फॉर्मची छपाई करण्यात आली. इतर स्टेशनरीवरही खर्च करण्यात आला. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रगणक व सर्वेक्षकांच्या नियुक्त्या करून कामकाजाला सुरुवात करण्यात आली होती. या सर्वेक्षणाच्या आधारावरच मराठ्यांना १६ टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्याला स्थगिती मिळाली असली तरी या सर्वेक्षणावर झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती जिल्हा प्रशासनाला झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जाची छपाई, छायांकित प्रती काढण्यासाठी झालेला खर्च, प्रगणक व सर्वेक्षकांचा खर्च आदीपोटी जिल्हा प्रशासनाने ५५ लाखाची देयके शासनाकडे पाठविली होती. त्यापैकी अलीकडेच फक्त १० लाख रुपये प्राप्त झाले आहेत. या तुटपुंज्या रकमेतून कोणाचे देयक अदा करायचे आणि कोणाला थांबवायचे असा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. प्राप्त माहितीनुसार अर्जांच्या छपाईचेच देयक ५ लाख ५० हजार रुपयांवर आहे तर तेवढेच देयक छायांकित प्रतीसाठी झालेल्या खर्चाचे आहे. प्रगणक व सर्वेक्षकांच्या मानधनाचा यात समावेश नाही. त्यांनाही त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. आता तर आरक्षणाला न्यायालयानेच स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुढच्या काळात शिल्लक रक्कम शासन केव्हा अदा करेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दीड हजारावर प्रमाणपत्रांचे वाटपगत आघाडी सरकारने मराठा आणि मुस्लिमांना आरक्षण लागू करण्याची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत सेतू केंद्राकडे जात प्रमाणपत्रासाठी आलेल्या सरासरी १२०० ते १५०० अर्जाचा निपटारा करण्यात आल्याची माहिती आहे. नेमका आकडा कळू शकला नाही. पण यात मराठा समाजातील अर्जाचा समावेश अधिक होता. मुंबई उच्च न्यायालयाने शासनाच्या आदेशाला स्थगिती दिली असली तरी आतापर्यंत जारी केलेल्या प्रमाणपत्रांवर याचा परिणाम होणार नाही हे येथे उल्लेखनीय.