शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विशेष परीक्षेसाठी नेमके विद्यार्थी किती?

By admin | Updated: August 20, 2014 01:02 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या विद्यार्थ्यांच्या नामांकन नोंदणीसाठी विद्यापीठाने

नामांकन नोंदणीचा आकडा गुलदस्त्यात : विद्यापीठाचे मौन संशयास्पदनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या विद्यार्थ्यांच्या नामांकन नोंदणीसाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना १४ आॅगस्टची मुदत दिली होती. परंतु ही मुदत उलटून ५ दिवस उलटून गेल्यानंतर अद्याप विशेष परीक्षेला बसणारे नेमके विद्यार्थी किती याचा आकडा नसल्याची सबब विद्यापीठाकडून समोर करण्यात येत आहे. महाविद्यालयांनी दावा केल्यापेक्षा कमी विद्यार्थी असण्याची दाट शक्यता असून यासाठीच हा आकडा लपविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यापीठाने यासंदर्भात मौन धारण केले आहे.एकही नियमित शिक्षक नसल्याच्या कारणावरून विद्यापीठाने २५० महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावली होती. असे असताना यातील ६३ महाविद्यालयांनी ६,६१६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचा दावा केला. या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेला राज्यपाल कार्यालयाकडून हिरवी झेंडी मिळाल्यानंतर प्रशासन तयारीला लागले आहे. विशेष परीक्षेकरिता ६३ महाविद्यालयांतील ६,६१६ विद्यार्थी पात्र असल्याचा दावा करण्यात येत असला तरी नेमके किती विद्यार्थी परीक्षेला बसतील ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या नामांकन नोंदणीसाठी माहिती १४ आॅगस्टपर्यंत तर परीक्षा अर्ज २१ तारखेपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. नामांकन करण्यासाठीची अंतिम मुदत टळून ५ दिवस झाले असताना अद्याप नेमके विद्यार्थी किती याची आकडेमोड झाली नसल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. विद्यापीठाचे प्रसिद्धी समन्वयक श्याम धोंड यांना यासंदर्भात वारंवार विचारणा केल्यानंतर त्यांनीदेखील माहिती देण्यास असमर्थता व्यक्त केली. प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांच्याकडे नेमकी माहिती उपलब्ध नाही, असे उत्तर धोंड यांनी दिले.जर विद्यापीठाला २८ तारखेपासून परीक्षा घ्यायची आहे तर नेमक्या किती विद्यार्थ्यांची नामांकन नोंदणी होणार आहे याची माहिती लपविण्याचे नेमके कारण काय याबद्दल निरनिराळ्या शंका उपस्थित करण्यात येत आहे.महाविद्यालयांनी दावा केल्याप्रमाणे ६,६१६ इतके विद्यार्थीच नसून वास्तविक आकडा हा फारच कमी आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून माहिती देण्यात चालढकल करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.