शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

विशेष परीक्षेसाठी नेमके विद्यार्थी किती?

By admin | Updated: August 20, 2014 01:02 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या विद्यार्थ्यांच्या नामांकन नोंदणीसाठी विद्यापीठाने

नामांकन नोंदणीचा आकडा गुलदस्त्यात : विद्यापीठाचे मौन संशयास्पदनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या विद्यार्थ्यांच्या नामांकन नोंदणीसाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना १४ आॅगस्टची मुदत दिली होती. परंतु ही मुदत उलटून ५ दिवस उलटून गेल्यानंतर अद्याप विशेष परीक्षेला बसणारे नेमके विद्यार्थी किती याचा आकडा नसल्याची सबब विद्यापीठाकडून समोर करण्यात येत आहे. महाविद्यालयांनी दावा केल्यापेक्षा कमी विद्यार्थी असण्याची दाट शक्यता असून यासाठीच हा आकडा लपविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यापीठाने यासंदर्भात मौन धारण केले आहे.एकही नियमित शिक्षक नसल्याच्या कारणावरून विद्यापीठाने २५० महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावली होती. असे असताना यातील ६३ महाविद्यालयांनी ६,६१६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचा दावा केला. या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेला राज्यपाल कार्यालयाकडून हिरवी झेंडी मिळाल्यानंतर प्रशासन तयारीला लागले आहे. विशेष परीक्षेकरिता ६३ महाविद्यालयांतील ६,६१६ विद्यार्थी पात्र असल्याचा दावा करण्यात येत असला तरी नेमके किती विद्यार्थी परीक्षेला बसतील ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या नामांकन नोंदणीसाठी माहिती १४ आॅगस्टपर्यंत तर परीक्षा अर्ज २१ तारखेपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. नामांकन करण्यासाठीची अंतिम मुदत टळून ५ दिवस झाले असताना अद्याप नेमके विद्यार्थी किती याची आकडेमोड झाली नसल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. विद्यापीठाचे प्रसिद्धी समन्वयक श्याम धोंड यांना यासंदर्भात वारंवार विचारणा केल्यानंतर त्यांनीदेखील माहिती देण्यास असमर्थता व्यक्त केली. प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांच्याकडे नेमकी माहिती उपलब्ध नाही, असे उत्तर धोंड यांनी दिले.जर विद्यापीठाला २८ तारखेपासून परीक्षा घ्यायची आहे तर नेमक्या किती विद्यार्थ्यांची नामांकन नोंदणी होणार आहे याची माहिती लपविण्याचे नेमके कारण काय याबद्दल निरनिराळ्या शंका उपस्थित करण्यात येत आहे.महाविद्यालयांनी दावा केल्याप्रमाणे ६,६१६ इतके विद्यार्थीच नसून वास्तविक आकडा हा फारच कमी आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून माहिती देण्यात चालढकल करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.