शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कधी काय घडेल, कोणी सांगावे या धरतीवर!

By admin | Updated: July 5, 2015 02:41 IST

बारामती, खंडाळा तालुक्यात काश्मीरसारखी बर्फाची चादर, दर महिन्याला अवकाळी पाऊस, चक्रीवादळसदृश वादळी वारे हे चित्र गेल्या सहा महिन्यांत दक्षिण महाराष्ट्राने कमी-अधिक प्रमाणात अनुभवले आहे.

- चंद्रकांत कित्तुरे

बारामती, खंडाळा तालुक्यात काश्मीरसारखी बर्फाची चादर, दर महिन्याला अवकाळी पाऊस, चक्रीवादळसदृश वादळी वारे हे चित्र गेल्या सहा महिन्यांत दक्षिण महाराष्ट्राने कमी-अधिक प्रमाणात अनुभवले आहे. यात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. निसर्गाचे संतुलन बिघडल्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांचा हा परिणाम टाळता न येणारा आणि कधी काय घडेल याचा अंदाजही न देणारा. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर हे पाच जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातले. प्रचंड नैसर्गिक, भौगोलिक विविधता असलेला हा प्रदेश. यातील कोल्हापूर जिल्हा दुष्काळापासून कोसो दूर. सांगलीतील खानापूर, आटपाडी हे तालुके कायमचे दुष्काळी छायेतले. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण आणि खंडाळा तालुक्यांतील परिस्थितीही जवळपास अशीच. हे तालुके वगळता हे दोन्ही जिल्हे निसर्गसंपन्न; पण या निसर्गसंपन्नतेवर मानवाचे होत असलेले अतिक्रमण त्याचा समतोल ढळण्यास कारणीभूत ठरत आहे. मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड, जागतिक तापमानात होणारी वाढ याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. हवामानात अचानक बदल होत आहेत. त्यांचा मानवी जीवनावर परिणाम होत आहे.पश्चिम महाराष्ट्रात यंदा दर महिन्याला पाऊस झाला आहे. बारमाही पाऊस होण्याचे हे इतिहासातील पहिलेच वर्ष असावे. निसर्गाच्या असमतोलामुळे हवामानात होणाऱ्या बदलाचा परिणाम म्हणून असे घडले असल्याचे सांगितले जाते. यंदा उन्हाळ्यात देशाच्या अन्य भागात उष्णतेची लाट असताना या जिल्ह्यात मात्र तापमानाची सरासरीही गाठली गेली नाही. वार्षिक सरासरीपेक्षा ते सुमारे दोन अंशानी कमीच राहिले. याला कारण दर महिन्याला हवामानात बदल होऊन झालेला पाऊसच आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तर यंदाच्या अवकाळी पावसाची सरासरी ही पावसाळ्यातील सरासरीपेक्षा जास्त आहे. कोल्हापूरचे तापमान कमाल ४२, तर किमान ७ अंश सेंटिग्रेड इतके, तर सरासरी ३८ अंश सेंटिग्रेड असते. यंदा मात्र जिल्ह्यातील तापमानाने पस्तिशी ओलांडलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात असणारी वनराई आणि वर्षभराचा पाऊस यामुळे येथील लोकांना उन्हाळा सुसह्य झाला. हीच परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात सातारा, सांगली जिल्ह्यांतीलही आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि बारामती तालुके वगळता तापमानाची वार्षिक सरासरी कमीच राहिलेली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, इंदापूर हे तालुके आणि बारामती तालुक्याचा काही भाग दुष्काळी पट्ट्यात मोडतो. यंदा गारपीट अनेक ठिकाणी झाली असली, तरी बारामती, पुरंदर, दौंड आणि खेड तालुके तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील गारपीट काश्मीरचा अनुभव देणारी होती. सर्वत्र बर्फाची चादर पसरल्यासारख्या गारा पडल्या होत्या. गारांचा आकारही मोठा होता. या गारपिटीचा शेतातील उभ्या पिकांना मोठा फटका बसून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.बदलते पाऊसमान आणि हवामानाचा परिणाम शेतीवर खूप मोठा झाला आहे. कोणती पिके घ्यावीत याचा फेरविचार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि त्याचे परिणाम १९९२मध्ये रिओ येथे झालेल्या वसुंधरा परिषदेत तज्ज्ञांनी सांगितले होते. मात्र, ते हसण्यावारी नेण्यात आले. आज त्याची सत्यता अनुभवास येत आहे. सरकारने दूरगामी विचार करून आपली धोरणे ठरविली पाहिजेत. त्यात समाजाबरोबरच पर्यावरण संतुलनाचाही विचार झाला पाहिजे, अन्यथा भविष्यात याहून गंभीर नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागेल.- डॉ. जय सामंत, पर्यावरण तज्ज्ञ, कोल्हापूर