शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

डबलचा मोह कशासाठी ?

By admin | Updated: July 31, 2014 01:11 IST

जास्त परतावा आणि जोखीम या दोन्ही बाबी एकत्र असतात. जास्त जोखिमेच्या योजना फसव्या असतात. उद्या रडत बसण्याऐवजी आजच आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आयुष्याची पुंजी सांभाळा,

जास्त व्याजदरात नेहमीच जोखीम : आयुष्याची पुंजी सांभाळामोरेश्वर मानापुरे - नागपूरजास्त परतावा आणि जोखीम या दोन्ही बाबी एकत्र असतात. जास्त जोखिमेच्या योजना फसव्या असतात. उद्या रडत बसण्याऐवजी आजच आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आयुष्याची पुंजी सांभाळा, असा मोलाचा सल्ला विविध क्षेत्रातील नामवंत अर्थतज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला.शेअर बाजार आणि राष्ट्रीयकृत बँका जास्त परतावा देत नाहीत, मग फसव्या कंपन्या वार्षिक ६० टक्क्यांपर्यंत व्याज कसे देतात, त्या कुठे गुंतवणूक करतात, कंपनीची माहिती याचा इत्थंभूत विचार लोकांनी करावा. गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे व्याजदर, ‘माऊथ पब्लिसिटी’चा आधार आणि त्याला मिळणारी कमिशन एजंटांची साथ, त्यामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक होते. श्रीसूर्यानंतर आता प्रशांत वासनकरचा आर्थिक घोटाळा सध्या चर्चेचा विषय आहे. सुरक्षित रकमेतून जास्त व्याजाची अपेक्षा आणि झटपट श्रीमंत होण्याची मानसिकता, याचा फायदा फसव्या कंपन्या घेतात. काही सहकारी बँका, संस्था, पतसंस्था, गैरबँकिंग कंपन्या नियमाची पायमल्ली करून जास्त व्याज देतात. तिथेच गुंतवणूकदार फसतात. अखेर पोलीस तक्रार आणि न्यायालयीन लढाईशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नसतो. आयुष्याची कमाई कुठे गुंतवावी, यावर तज्ज्ञांनी लोकमतशी बोलताना गुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला दिला.गुंतवणूकदारांनी धडा घ्यावानागपुरात गेल्या काही वर्षांत फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. राष्ट्रीयकृत बँका दामदुप्पट ८ ते ९ वर्षात देतात, मग या फसव्या कंपन्या दोन वर्षात दुप्पट आणि तीन वर्षात तिप्पट रक्कम कशी देतात, हे एक कोडे आहे. कंपनीचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न गुंतवणूकदार करीत नाहीत. लोक भूलथापांना बळी पडतात. आर्थिक अज्ञानाचा फायदा कंपन्या घेतात. सर्वप्रथम लोकांनी आर्थिक व्यवहाराची माहिती घ्यावी. फसव्या कंपन्यांचे जाळे वाढण्यास कायद्यातील त्रुटी कारणीभूत आहे. महाराष्ट्र गुंतवणूकदार (वित्त) हितसंबंध अधिनियम-१९९९ या कायद्यात केवळ सहा वर्षांची शिक्षेची तरतूद आहे. शिक्षा झाल्याचे उदाहारण नाही. युरोपियन देशांत अशा गुन्ह्यांमध्ये ५० वर्षांपर्यंतची शिक्षा होते. गुन्हेगाराला जन्मठेप झाल्यास अशा फसव्या कंपन्या बंद होतील. अशा गुन्ह्याच्या सुनावणीसाठी स्वतंत्र न्यायालय आणि सरकारी वकील असावा. अशा कोट्यवधींच्या घोटाळ्यातून गुंतवणूकदारांनी धडा घ्यावा.विजय कोल्हे, मुख्य सरकारी वकील, जिल्हा सत्र न्यायालय.गुंतवणूकदारांनी काय करावेआयुष्यांची पुंजी गुंतविताना आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या.कंपन्यांची माहिती व पत पाहून गुंतवणूक करा.कंपन्यांचा मागील इतिहास व प्रमोटरची माहिती घ्या.रिझर्व्ह बँक व सहकार खात्याची परवानगी असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा.कंपनीचा वार्षिक प्रगतीचा लेखाजोखा पाहा. गुंतवणूकदारांनी काय करू नयेमहिनेवारी जास्त व्याज देणाऱ्या कंपनीत गुंतवणूक टाळा.कमिशन एजंटच्या माहितीनुसार गुंतवणूक करू नका.दुसऱ्या गुंतवणूकदाराच्या माहितीवर विश्वास ठेवू नका.कंपनीच्या आदरातिथ्यावर भाळून गुंतवणूक टाळा.एकत्रित रक्कम कंपनी वा बँकांमध्ये ठेवू नका