शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

सरकारला काय चुलीत घालायचे का?

By admin | Updated: June 19, 2015 00:49 IST

राजू शेट्टी : शेतकरी हितासाठी शासनविरोधात रस्त्यावर; पुणे आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या

कोल्हापूर : शेतकरी हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला काय चुलीत घालायचे का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी करून सत्ताधाऱ्यांना गुरुवारी घरचा आहेर दिला. शेतकऱ्यांसाठी शासनविरोधात रस्त्यावर येण्याचाही इशारा दिला. ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे २२ जूनला पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाच्या तयारीसाठी शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांची बैठक आयोजिली होती. बैठकीत खासदार शेट्टी बोलत होते. खासदार शेट्टी म्हणाले, साखर उद्योगाबाबत निर्णय घेणाऱ्यांना काही कळत नाही. विरोधकांना अधिक कळते. आम्हाला विचारले जात नाही, अशी परिस्थिती आहे. उसाच्या संबंधित शासनाने काही निर्णय उशिरा घेतले आहे. ऊस तोडल्यापासून १४ दिवसांच्या आत नियमानुसार एफआरपी देणे बंधनकारक आहे. न दिल्यास संबंधित कारखान्यांची मालमत्ता व साखर जप्त करावे. संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. ती शासनाने पूर्ण करावी. गेल्या पंधरा वर्षांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे एफआरपीची रक्कम परवडेल इतकी झाली आहे. पुढील वर्षी पुन्हा १०० रुपये वाढणार आहे. त्यामुळे यापुढील काळातही दरासाठी संघर्ष करावाच लागणार आहे. आमच्याशिवाय कोणीही संघर्ष करणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले, सरकार व आमच्यात भांडणे लावून राष्ट्रवादी मजा बघत आहे. जिल्हा बँकेने कर्जातून पाच टक्के कपात करून घेण्याचे पत्रक काढले आहे. याबद्दल बँकेचे संचालक, प्रशासनाचा निषेध आहे. हे पत्रक मागे न घेतल्यास बँकेच्या शाखांना टाळे लावण्याचे आंदोलन करू. जालिंदर पाटील म्हणाले, शासनाने छगन भुजबळांसारख्या आणखी काही घोटाळेबाजांच्या मालमत्ता जप्त केल्यास राज्यातील सर्व शेतकरी कर्जमुक्त होतील.राजेंद्र गड्यान्नावर, विठ्ठल मोरे, जनार्दन पाटील, आदी कार्यकर्त्यांची भाषणे झाली. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सीमा पाटील, अनिल मादनाईक उपस्थित होते. नामोल्लेख टाळून मुश्रीफांचा समाचारशेतकऱ्यांचे पैसे बुडविणारेच ‘एफआरपी’साठी केवळ पेपरमध्ये फोटो छापून यावा, यासाठी मोर्चा काढीत आहेत. मोर्चावेळी काय झाले, कोणावर गुन्हा दाखल झाला, डोकी कुणाची फुटली, अशी उपरोधिक टीका आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर त्यांनी नामोल्लेख टाळून केली. भुजबळांनंतर जिल्ह्यातील बोक्याची वेळ कधी येते, याची प्रतीक्षा करीत आहे. भुजबळांसारखी वेळ येईल म्हणूनच अजित पवार शांत आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.