शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला काय चुलीत घालायचे का?

By admin | Updated: June 19, 2015 00:49 IST

राजू शेट्टी : शेतकरी हितासाठी शासनविरोधात रस्त्यावर; पुणे आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या

कोल्हापूर : शेतकरी हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला काय चुलीत घालायचे का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी करून सत्ताधाऱ्यांना गुरुवारी घरचा आहेर दिला. शेतकऱ्यांसाठी शासनविरोधात रस्त्यावर येण्याचाही इशारा दिला. ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे २२ जूनला पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाच्या तयारीसाठी शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांची बैठक आयोजिली होती. बैठकीत खासदार शेट्टी बोलत होते. खासदार शेट्टी म्हणाले, साखर उद्योगाबाबत निर्णय घेणाऱ्यांना काही कळत नाही. विरोधकांना अधिक कळते. आम्हाला विचारले जात नाही, अशी परिस्थिती आहे. उसाच्या संबंधित शासनाने काही निर्णय उशिरा घेतले आहे. ऊस तोडल्यापासून १४ दिवसांच्या आत नियमानुसार एफआरपी देणे बंधनकारक आहे. न दिल्यास संबंधित कारखान्यांची मालमत्ता व साखर जप्त करावे. संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. ती शासनाने पूर्ण करावी. गेल्या पंधरा वर्षांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे एफआरपीची रक्कम परवडेल इतकी झाली आहे. पुढील वर्षी पुन्हा १०० रुपये वाढणार आहे. त्यामुळे यापुढील काळातही दरासाठी संघर्ष करावाच लागणार आहे. आमच्याशिवाय कोणीही संघर्ष करणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले, सरकार व आमच्यात भांडणे लावून राष्ट्रवादी मजा बघत आहे. जिल्हा बँकेने कर्जातून पाच टक्के कपात करून घेण्याचे पत्रक काढले आहे. याबद्दल बँकेचे संचालक, प्रशासनाचा निषेध आहे. हे पत्रक मागे न घेतल्यास बँकेच्या शाखांना टाळे लावण्याचे आंदोलन करू. जालिंदर पाटील म्हणाले, शासनाने छगन भुजबळांसारख्या आणखी काही घोटाळेबाजांच्या मालमत्ता जप्त केल्यास राज्यातील सर्व शेतकरी कर्जमुक्त होतील.राजेंद्र गड्यान्नावर, विठ्ठल मोरे, जनार्दन पाटील, आदी कार्यकर्त्यांची भाषणे झाली. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सीमा पाटील, अनिल मादनाईक उपस्थित होते. नामोल्लेख टाळून मुश्रीफांचा समाचारशेतकऱ्यांचे पैसे बुडविणारेच ‘एफआरपी’साठी केवळ पेपरमध्ये फोटो छापून यावा, यासाठी मोर्चा काढीत आहेत. मोर्चावेळी काय झाले, कोणावर गुन्हा दाखल झाला, डोकी कुणाची फुटली, अशी उपरोधिक टीका आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर त्यांनी नामोल्लेख टाळून केली. भुजबळांनंतर जिल्ह्यातील बोक्याची वेळ कधी येते, याची प्रतीक्षा करीत आहे. भुजबळांसारखी वेळ येईल म्हणूनच अजित पवार शांत आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.