शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

सरकारला काय चुलीत घालायचे का?

By admin | Updated: June 19, 2015 00:49 IST

राजू शेट्टी : शेतकरी हितासाठी शासनविरोधात रस्त्यावर; पुणे आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या

कोल्हापूर : शेतकरी हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला काय चुलीत घालायचे का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी करून सत्ताधाऱ्यांना गुरुवारी घरचा आहेर दिला. शेतकऱ्यांसाठी शासनविरोधात रस्त्यावर येण्याचाही इशारा दिला. ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे २२ जूनला पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाच्या तयारीसाठी शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांची बैठक आयोजिली होती. बैठकीत खासदार शेट्टी बोलत होते. खासदार शेट्टी म्हणाले, साखर उद्योगाबाबत निर्णय घेणाऱ्यांना काही कळत नाही. विरोधकांना अधिक कळते. आम्हाला विचारले जात नाही, अशी परिस्थिती आहे. उसाच्या संबंधित शासनाने काही निर्णय उशिरा घेतले आहे. ऊस तोडल्यापासून १४ दिवसांच्या आत नियमानुसार एफआरपी देणे बंधनकारक आहे. न दिल्यास संबंधित कारखान्यांची मालमत्ता व साखर जप्त करावे. संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. ती शासनाने पूर्ण करावी. गेल्या पंधरा वर्षांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे एफआरपीची रक्कम परवडेल इतकी झाली आहे. पुढील वर्षी पुन्हा १०० रुपये वाढणार आहे. त्यामुळे यापुढील काळातही दरासाठी संघर्ष करावाच लागणार आहे. आमच्याशिवाय कोणीही संघर्ष करणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले, सरकार व आमच्यात भांडणे लावून राष्ट्रवादी मजा बघत आहे. जिल्हा बँकेने कर्जातून पाच टक्के कपात करून घेण्याचे पत्रक काढले आहे. याबद्दल बँकेचे संचालक, प्रशासनाचा निषेध आहे. हे पत्रक मागे न घेतल्यास बँकेच्या शाखांना टाळे लावण्याचे आंदोलन करू. जालिंदर पाटील म्हणाले, शासनाने छगन भुजबळांसारख्या आणखी काही घोटाळेबाजांच्या मालमत्ता जप्त केल्यास राज्यातील सर्व शेतकरी कर्जमुक्त होतील.राजेंद्र गड्यान्नावर, विठ्ठल मोरे, जनार्दन पाटील, आदी कार्यकर्त्यांची भाषणे झाली. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सीमा पाटील, अनिल मादनाईक उपस्थित होते. नामोल्लेख टाळून मुश्रीफांचा समाचारशेतकऱ्यांचे पैसे बुडविणारेच ‘एफआरपी’साठी केवळ पेपरमध्ये फोटो छापून यावा, यासाठी मोर्चा काढीत आहेत. मोर्चावेळी काय झाले, कोणावर गुन्हा दाखल झाला, डोकी कुणाची फुटली, अशी उपरोधिक टीका आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर त्यांनी नामोल्लेख टाळून केली. भुजबळांनंतर जिल्ह्यातील बोक्याची वेळ कधी येते, याची प्रतीक्षा करीत आहे. भुजबळांसारखी वेळ येईल म्हणूनच अजित पवार शांत आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.