शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

‘बालकुमार’ला सापत्न वागणूक का?

By admin | Updated: February 12, 2015 03:23 IST

अखिल भारतीय साहित्य तसेच नाट्यसंमेलनाला राज्य शासनाकडून अर्थसाह्य दिले जाते. मात्र मराठी बालकुमार साहित्य संमेलन भरविताना

पुणे : अखिल भारतीय साहित्य तसेच नाट्यसंमेलनाला राज्य शासनाकडून अर्थसाह्य दिले जाते. मात्र मराठी बालकुमार साहित्य संमेलन भरविताना आयोजकांना पदरमोड करावी लागत आहे. त्यामुळे या संमेलनालाच सापत्न वागणूक का दिली जाते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. बालकुमार साहित्य संमेलनाचे यंदाचे २६वे वर्ष असून, केवळ कोकणमधील ओणी गावात मधुमंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संमेलनाव्यतिरिक्त इतर वेळी शासनाकडून कोणताही निधी मिळालेला नाही. किमान ५ लाख रुपयांचा निधी मिळावा यासाठी बालकुमार साहित्य संस्थेकडून गेल्या वर्षी साहित्य संस्कृती मंडळासह शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र त्याला उत्तर मिळाले नसल्याची खंत संस्थेचे प्रमुख कार्यवाह सुनील महाजन यांनी व्यक्त केली.कोणतेही संमेलन आयोजित करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. मात्र दरवर्षी बालकुमार साहित्य संस्थेचे पदाधिकारी आणि निमंत्रित संस्था निम्मा निम्मा खर्च उचलून संमेलनाचा गाडा पुढे नेत आहेत. आम्ही काम करणे थांबवले तर बालकुमार साहित्य संमेलन बंद होईल, ते बंद झाले तर ग्रामीण भागात जिथे संमेलन भरविले जाते तेथील मुले दर्जेदार बालसाहित्यापासून वंचित राहातील. मुलांमध्ये साहित्याची गोडी लागावी हा मुख्य उद्देश आहे, असे ते सांगतात. संमेलनाला थोडातरी निधी मिळावा ही अपेक्षा करणे चुकीचे आहे का? असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)