शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
4
अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले सिवानचे जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
5
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
6
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
7
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
8
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
9
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
10
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
11
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
12
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
13
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
14
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
15
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
16
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
17
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
18
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
19
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
20
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...

‘बालकुमार’ला सापत्न वागणूक का?

By admin | Updated: February 12, 2015 03:23 IST

अखिल भारतीय साहित्य तसेच नाट्यसंमेलनाला राज्य शासनाकडून अर्थसाह्य दिले जाते. मात्र मराठी बालकुमार साहित्य संमेलन भरविताना

पुणे : अखिल भारतीय साहित्य तसेच नाट्यसंमेलनाला राज्य शासनाकडून अर्थसाह्य दिले जाते. मात्र मराठी बालकुमार साहित्य संमेलन भरविताना आयोजकांना पदरमोड करावी लागत आहे. त्यामुळे या संमेलनालाच सापत्न वागणूक का दिली जाते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. बालकुमार साहित्य संमेलनाचे यंदाचे २६वे वर्ष असून, केवळ कोकणमधील ओणी गावात मधुमंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संमेलनाव्यतिरिक्त इतर वेळी शासनाकडून कोणताही निधी मिळालेला नाही. किमान ५ लाख रुपयांचा निधी मिळावा यासाठी बालकुमार साहित्य संस्थेकडून गेल्या वर्षी साहित्य संस्कृती मंडळासह शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र त्याला उत्तर मिळाले नसल्याची खंत संस्थेचे प्रमुख कार्यवाह सुनील महाजन यांनी व्यक्त केली.कोणतेही संमेलन आयोजित करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. मात्र दरवर्षी बालकुमार साहित्य संस्थेचे पदाधिकारी आणि निमंत्रित संस्था निम्मा निम्मा खर्च उचलून संमेलनाचा गाडा पुढे नेत आहेत. आम्ही काम करणे थांबवले तर बालकुमार साहित्य संमेलन बंद होईल, ते बंद झाले तर ग्रामीण भागात जिथे संमेलन भरविले जाते तेथील मुले दर्जेदार बालसाहित्यापासून वंचित राहातील. मुलांमध्ये साहित्याची गोडी लागावी हा मुख्य उद्देश आहे, असे ते सांगतात. संमेलनाला थोडातरी निधी मिळावा ही अपेक्षा करणे चुकीचे आहे का? असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)