शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

बोटाला शाई लावून काय साधणार?

By admin | Updated: November 16, 2016 06:14 IST

रद्द झालेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी येणाऱ्यांच्या बोटाला, मतदानाच्या वेळी लावतात तशी, शाई लावण्याचा निर्णय सरकारने

अजित गोगटे / मुंबई रद्द झालेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी येणाऱ्यांच्या बोटाला, मतदानाच्या वेळी लावतात तशी, शाई लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय प्रामुख्याने तीन उद्देशांनी घेण्यात आला आहे. १) रोजंदारीवर लोकांना कामाला ठेवून प्रत्येकी ४,५०० रुपये याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर नोटा बदलून घेण्याच्या काळा पैसेवाल्यांनी शोधलेली पळवाट बंद करणे. २) लोकांनी पुन्हा-पुन्हा बँकांमध्ये येऊन पैसे काढण्यास आळा घालणे आणि ३) बँकांच्या बाहेर लागणाऱ्या रांगा कमी करणे, परंतु या उपायाने ही उद्दिष्टे कशी काय साध्य होणार, हा प्रश्न असून, उलट याचा प्रामाणिकपणे व्यवहार करायला जाणाऱ्यांनाच जास्त त्रास होईल, असे दिसते.पहिली गोष्ट अशी की, पैसे बदलून घेण्यासाठी बँकेत खाते असलेच पाहिजे, असे बंधन नाही. विशेषत: देशभरातील दीड लाखांहून अधिक पोस्ट आॅफिसांबाहेर लागणाऱ्या रांगा, या बहुतांश बँकांमध्ये खाते नसलेल्या लोकांच्याच आहेत. अनेकांनी दिवसाला ३०० रुपये रोजंदार देऊन, पैसे बदलून घेण्यासाठी माणसे कामाला लावल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ३०० रुपयांमध्ये चार हजार रुपये काळ््याचे पांढरे करून घेण्याचा हा रासरोस धंदा आहे. बोटाला शाई लावल्याने, या प्रकारास फारसा आळा बसेल, असे दिसत नाही. दिवसभर मोलमजुरी करून ३०० रुपये न मिळणारे लाखो बेरोजगार या देशात उपलब्ध आहेत. एकाच शहरातील १०-२० बँकांमध्ये रांगा लावण्यासाठी पाठविलेल्या भाडोत्री लोकांच्या बोटाला शई लागल्यावर त्यांच्याजागी, दुसऱ्या दिवशी पुन्हा रांग लावण्यासाठी नवे रोजंदार सहज मिळू शकतात.ज्यांचे बँकेत खाते आहे त्यांच्यादृष्टीने बोटाला शाई लावणे निरर्थक आहे. कारण अशा लोकांनी आधी पैसे बदलून घेतले असतील तर त्याची नोंद खात्यात लगेच दिसेल व त्यांचे पुन्हा पैसे बदलून घेणे, शाई न लावताही रोखता येऊ शकेल.लोकांनी पुन्हा पुन्हा पैसे काढण्यासाठी बँकेत येऊ नये यासाठी शाई लावणे हे जखमेवर मीठ चोळणे ठरेल. कारण मुळात खातेदारांना त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम असूनही बँकेतून किंवा एटीएमने हवे तेवढे पैसे काढू न देणे हेच मुळात अन्यायकारक आहे. त्यातून आठवड्याला मिळू शकणारे २४ हजार रुपये, गरज असो वा नसो, एकदाच घेऊन जा; पुन्हा पुन्हा येऊ नका, असे सांगणे हे गरजवंतांच्या अडचणींचा गैरफायदा घेणे आहे.बँकांच्या बाहेर लागणाऱ्या रांगा कमी करण्यावर बोटाला शाई लावणे हा नव्हे तर नव्या, पर्यायी नोटा मुबलक प्रमाणावर उपलब्ध करून देणे आणि मुख्य म्हणजे एटीएममधून त्या मिळतील याची व्यवस्था करणे हा त्यावर उपाय आहे. बँकवाल्यांनी ज्यांच्या बोटाला शाई आहे अशांना रांगांमधून बाहेर काढण्यास सुरुवात केली तर कदाचित त्याचा परिणाम लोकांचा संयमाचा बांध फुटण्यात होऊ शकेल.