शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

बोटाला शाई लावून काय साधणार?

By admin | Updated: November 16, 2016 06:14 IST

रद्द झालेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी येणाऱ्यांच्या बोटाला, मतदानाच्या वेळी लावतात तशी, शाई लावण्याचा निर्णय सरकारने

अजित गोगटे / मुंबई रद्द झालेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी येणाऱ्यांच्या बोटाला, मतदानाच्या वेळी लावतात तशी, शाई लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय प्रामुख्याने तीन उद्देशांनी घेण्यात आला आहे. १) रोजंदारीवर लोकांना कामाला ठेवून प्रत्येकी ४,५०० रुपये याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर नोटा बदलून घेण्याच्या काळा पैसेवाल्यांनी शोधलेली पळवाट बंद करणे. २) लोकांनी पुन्हा-पुन्हा बँकांमध्ये येऊन पैसे काढण्यास आळा घालणे आणि ३) बँकांच्या बाहेर लागणाऱ्या रांगा कमी करणे, परंतु या उपायाने ही उद्दिष्टे कशी काय साध्य होणार, हा प्रश्न असून, उलट याचा प्रामाणिकपणे व्यवहार करायला जाणाऱ्यांनाच जास्त त्रास होईल, असे दिसते.पहिली गोष्ट अशी की, पैसे बदलून घेण्यासाठी बँकेत खाते असलेच पाहिजे, असे बंधन नाही. विशेषत: देशभरातील दीड लाखांहून अधिक पोस्ट आॅफिसांबाहेर लागणाऱ्या रांगा, या बहुतांश बँकांमध्ये खाते नसलेल्या लोकांच्याच आहेत. अनेकांनी दिवसाला ३०० रुपये रोजंदार देऊन, पैसे बदलून घेण्यासाठी माणसे कामाला लावल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ३०० रुपयांमध्ये चार हजार रुपये काळ््याचे पांढरे करून घेण्याचा हा रासरोस धंदा आहे. बोटाला शाई लावल्याने, या प्रकारास फारसा आळा बसेल, असे दिसत नाही. दिवसभर मोलमजुरी करून ३०० रुपये न मिळणारे लाखो बेरोजगार या देशात उपलब्ध आहेत. एकाच शहरातील १०-२० बँकांमध्ये रांगा लावण्यासाठी पाठविलेल्या भाडोत्री लोकांच्या बोटाला शई लागल्यावर त्यांच्याजागी, दुसऱ्या दिवशी पुन्हा रांग लावण्यासाठी नवे रोजंदार सहज मिळू शकतात.ज्यांचे बँकेत खाते आहे त्यांच्यादृष्टीने बोटाला शाई लावणे निरर्थक आहे. कारण अशा लोकांनी आधी पैसे बदलून घेतले असतील तर त्याची नोंद खात्यात लगेच दिसेल व त्यांचे पुन्हा पैसे बदलून घेणे, शाई न लावताही रोखता येऊ शकेल.लोकांनी पुन्हा पुन्हा पैसे काढण्यासाठी बँकेत येऊ नये यासाठी शाई लावणे हे जखमेवर मीठ चोळणे ठरेल. कारण मुळात खातेदारांना त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम असूनही बँकेतून किंवा एटीएमने हवे तेवढे पैसे काढू न देणे हेच मुळात अन्यायकारक आहे. त्यातून आठवड्याला मिळू शकणारे २४ हजार रुपये, गरज असो वा नसो, एकदाच घेऊन जा; पुन्हा पुन्हा येऊ नका, असे सांगणे हे गरजवंतांच्या अडचणींचा गैरफायदा घेणे आहे.बँकांच्या बाहेर लागणाऱ्या रांगा कमी करण्यावर बोटाला शाई लावणे हा नव्हे तर नव्या, पर्यायी नोटा मुबलक प्रमाणावर उपलब्ध करून देणे आणि मुख्य म्हणजे एटीएममधून त्या मिळतील याची व्यवस्था करणे हा त्यावर उपाय आहे. बँकवाल्यांनी ज्यांच्या बोटाला शाई आहे अशांना रांगांमधून बाहेर काढण्यास सुरुवात केली तर कदाचित त्याचा परिणाम लोकांचा संयमाचा बांध फुटण्यात होऊ शकेल.