शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राणेंनी सत्तेत असताना काय केले?

By admin | Updated: January 12, 2016 00:35 IST

राजन तेली : मच्छिमारांचा प्रश्न समजायला आठ वर्षे लागली का?

सावंतवाडी : नारायण राणे यांनी सरकारवर टीका करण्यापेक्षा आपण सत्तेत असताना काय केले, हे जनतेला सांगावे. नुसती टीका करून जनतेची दिशाभूल करू नये. राणेंना मच्छिमारांचा प्रश्न समजायला आठ वर्षे लागली का, असा सवाल माजी आमदार राजन तेली यांनी केला आहे. जिल्ह्यातील समस्यांबाबत १२ जानेवारीला मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत त्यांना माहिती देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.ते येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष मनोज नाईक, माजी तालुकाध्यक्ष मंदार कल्याणकर, शहरअध्यक्ष आनंद नेवगी आदी उपस्थित होते.माजी आमदार राजन तेली म्हणाले, जिल्ह्यात काँगेस आघाडीच्या काळात सी-वर्ल्ड प्रकल्प आला, पण तो सुरू झाला नाही. खडी, वाळू, चिरे यावर पूर्णत: बंदी होती. जिल्ह्यात विकासाचा एकही प्रकल्प आला नाही. असे असताना युतीचे सरकार आल्यावर वाळू, चिरे व खडी यावरची बंदी आम्ही पूर्णत: उठवली. सी-वर्ल्ड प्रकल्प सुरू होण्यासाठी सरकारने बैठका घेतल्या आहेत. विमानतळाचे काम या वर्षअखेर पूर्ण होईल. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम भाजप सरकारनेच हाती घेतले आहे. त्यामुळे सरकारवर नाहक टीका नको. जर सत्य असेल, तर ते विरोधी पक्षाने मांडले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.जिल्ह्यात गेली अनेक वर्षे मच्छिमारांचा प्रश्न असून, तो काँग्रेसला कधी दिसला नाही. मात्र, युती सरकारने हा प्रश्न सोडवताच राणे यांना हा प्रश्न आठवला, असे सांगत सरकारने सोडवलेल्या प्रश्नांचे श्रेय कोणी घेऊ नये. मत्स्यमंत्री एकनाथ खडसे यांनीच हा प्रश्न सोडवला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यात खडी, वाळू व चिरे उपसा अधिस्थगन उठल्यानंतर सुरू झाले. मात्र, प्रशासन चुकीची भूमिका घेऊन डंपरचालकांना त्रास देत आहे, हे योग्य नाही.पोलिसांकडे सर्व खात्याचा कारभार दिला आहे का? जिकडे तिकडे डंपर अडवण्याचे काम पोलीस करीत आहेत. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सर्व घटनांची माहिती दिली आहे. यावर त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा आम्हाला वेगळ्या पध्दतीने बंदोबस्त करावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.१२ जानेवारीला भाजपचे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, या भेटीत त्यांनी जिल्ह्यातील प्रशासनाची सर्व माहिती देणार आहेत. प्रशासन जनतेला कशा प्रकारे त्रास देत आहे, याची माहिती त्यांना देण्यात येणार आहे. विशेषत: जनतेचा पोलिसांबाबत विशेष राग असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणारपालकमंत्री दीपक केसरकर यांचा प्रशासनावर वचक नाही. त्यामुळेच अधिकारी कोणाचे ऐकत नाहीत. मनाला वाटेल तसा कारभार करतात. सध्या ‘नियोजन’चा निधी पडून आहे. तो खर्च केव्हा होणार, याची कोणालाच माहिती नाही. याबाबत आम्ही पालकमंत्र्यांसह प्रशासनाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.