शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

२० वर्षांत आम्हाला सरकारने काय दिले?

By admin | Updated: November 23, 2014 00:41 IST

११४ गोवारींच्या बलिदानाला आज २० वर्षे पूर्ण झाली. या काळात सरकारने आम्हाला काय दिले? आदिवासींच्या सवलती मिळाव्यात, हीच आमची मागणी आहे. सर्व शासकीय दस्तावेज असतानाही

संतप्त गोवारी बांधवांचा सवाल : कधी संपणार वनवास?नागपूर : ११४ गोवारींच्या बलिदानाला आज २० वर्षे पूर्ण झाली. या काळात सरकारने आम्हाला काय दिले? आदिवासींच्या सवलती मिळाव्यात, हीच आमची मागणी आहे. सर्व शासकीय दस्तावेज असतानाही सरकारकडून मागण्यांना डावलले जात आहे. हा वनवास कधी संपणार, असा सवाल संतप्त गोवारींनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. ‘गोंडगोवारी’ यात कॉमा द्यावा व आदिवासींच्या सवलती गोवारी समाजाला मिळाव्यात या मागणीसाठी २३ नोव्हेंबर १९९४ विधिमंडळावर गोवारी समाजाचा भव्य मोर्चा निघाला होता. या मोर्चात झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधव शहीद झाले. घटनेची दखल घेत एक स्मारक, उड्डाणपुलाला शहिदांचे नाव व २ टक्के विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण दिले. ३९ उच्च जाती समाविष्ट केल्या. दरवर्षी एक नवीन जात त्यात समाविष्ट करीत आहे. सरकारने २०१३ ला परिपत्रक काढून १९९५ नंतर गोंडगोवारी जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरीस लागलेल्या गोवारी बांधवांना नोकरीतून काढण्याचा धडाका सुरू केला. स्मारकाची अवस्थाही बिकटशासनाने शहीद गोवारींच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र नोकऱ्या दिल्या नाहीत. आज स्मारकाची अवस्था अतिशय बिकट आहे. उड्डाणपुलावर लिहिलेले नाव तुटलेले आहे. दिलेले आरक्षणही तुटपुंजे आहे. गोवारींच्या बलिदानानंतरही सरकारने त्यांच्या मूळ मागणीला बगल दिली आहे. गोंडगोवारी ही बोली भाषा आहे. गोंड वेगळी व गोवारी वेगळी जमात आहे. २००२ पर्यंत गोंडराजगोंड अशी अनुसूचीमध्ये नोंद होती. मात्र लोकसभेत दुरुस्ती विधेयक येऊन गोंड राजगोंडमध्ये जसा कॉमा टाकला, तसा गोंडगोवारीमध्ये टाकावा. इंग्रजांच्या काळात या गोवारी समाजाला आदिवासींच्या सवलती मिळत होत्या. माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीतही ‘गोंडगवारी’ ही जमातच अस्तित्वात नसल्याचे दस्तावेज आहेत. असे असतानाही, सरकारकडून वारंवार अन्याय होत आहे. समाजाचे मंत्री, आमदार निवडणुकीपुरती आश्वासन देऊन मोकळे होतात. फडणवीस, गडकरी वाहणार श्रद्धांजलीशहीद गोवारी स्मारक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी रविवारी, सकाळी ११ वाजता श्रद्धांजली वाहतील.