शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

कारवाईस विलंब का?

By admin | Updated: October 9, 2015 01:35 IST

बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटवण्यासंदर्भात निव्वळ अधिसूचना काढलीत, पण त्यावर अंमलबजावणी केव्हा करणार? असे खडे बोल सुनावत, उच्च न्यायालयाने एका आठवड्यात अधिसूचनेवर

मुंबई : बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटवण्यासंदर्भात निव्वळ अधिसूचना काढलीत, पण त्यावर अंमलबजावणी केव्हा करणार? असे खडे बोल सुनावत, उच्च न्यायालयाने एका आठवड्यात अधिसूचनेवर कशाप्रकारे अंमलबजावणी करणार, याची संपूर्ण माहिती सादर करण्याचा आदेश राज्य सरकारला गुरुवारी दिला.‘५ मे २०११ रोजी अधिसूचना काढूनही अद्याप त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. आम्ही वारंवार आदेश देऊनही तुमची (सरकार) समिती केवळ बैठकावर बैठका घेत आहे, निर्णय घेत नाही. तुम्ही अधिसूचनेवर किती कालावधीत अंमलबजावणी करणार, त्याचे नियोजन आमच्यापुढे सादर करा,’ असा आदेश न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिला. त्यावर सरकारी वकील धैर्यशील नलावडे यांनी हा विषय संवेदनशील असल्याने, निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागत असल्याचे खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने सरकारची खरडपट्टी काढली. अधिसूचनेवर अंमलबजावणी करायची नसेल, तर स्पष्ट सांगा. सरकारने भूमिका स्पष्ट करावी. सरकार काही करू शकत नसेल, तर आम्ही आदेश देऊ, असे खंडपीठाने राज्य सरकारला सुनावले.महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी शहरातील बेकायदेशीर धार्मिक स्थळांची मोजदाद महापालिकेने केली असल्याची माहिती खंडपीठाला दिली. महापालिकेने शहारातील बेकायदेशीर धार्मिक स्थळांसदर्भातील अहवाल तयार करून समितीपुढे सादर केला . पुढील कार्यवाही समिती करेल, असे अ‍ॅड. साखरे यांनी खंडपीठाला सांगितले. या आधीच्या सुनावणीवेळी, सरकारने सात महापालिकांनी सादर केलेल्या अहवालानुसार, १ फेब्रुवारी २०१५ पर्यंत असलेल्या ६,३३६ बेकायदेशीर धार्मिक स्थळांपैकी २०७ नियमित करण्यात आली. १७९ हटवली, तर तीन धार्मिंक स्थळे अन्य जागेवर हलविले. (प्रतिनिधी)सर्वोच्च न्यायालय २००९ सालचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २९ सप्टेंबर २००९ रोजी देशातील सर्व राज्यांना बेकायदेशीर धार्मिक स्थळे तोडण्याचा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशानंतर अस्तित्त्वात आलेली बेकायदेशीर धार्मिक स्थळे तोडण्याबाबत, तर काही धार्मिक स्थळे नियमित करण्याबाबत, तर काही धार्मिक स्थळांना अन्य जागेवर हलवण्यासंदर्भात राज्य सरकारने ५ मे २०११ रोजी अधिसूचना काढली. या अधिसूचनेत धार्मिंक स्थळांची श्रेणी ठरवण्यासाठी राज्य, जिल्हा आणि महापालिका पातळीवर समिती नेमण्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या अधिसूचनेवर अंमलबजावणी न करण्यात आल्याने, ‘सोसायटी फॉर फास्ट जस्टिस’ या एनजीओने उच्च न्यायालायात सिव्हिल अर्ज दाखल केला. या अर्जावर गुरुवारी सुनावणी होती.