शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईस विलंब का?

By admin | Updated: October 9, 2015 01:35 IST

बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटवण्यासंदर्भात निव्वळ अधिसूचना काढलीत, पण त्यावर अंमलबजावणी केव्हा करणार? असे खडे बोल सुनावत, उच्च न्यायालयाने एका आठवड्यात अधिसूचनेवर

मुंबई : बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटवण्यासंदर्भात निव्वळ अधिसूचना काढलीत, पण त्यावर अंमलबजावणी केव्हा करणार? असे खडे बोल सुनावत, उच्च न्यायालयाने एका आठवड्यात अधिसूचनेवर कशाप्रकारे अंमलबजावणी करणार, याची संपूर्ण माहिती सादर करण्याचा आदेश राज्य सरकारला गुरुवारी दिला.‘५ मे २०११ रोजी अधिसूचना काढूनही अद्याप त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. आम्ही वारंवार आदेश देऊनही तुमची (सरकार) समिती केवळ बैठकावर बैठका घेत आहे, निर्णय घेत नाही. तुम्ही अधिसूचनेवर किती कालावधीत अंमलबजावणी करणार, त्याचे नियोजन आमच्यापुढे सादर करा,’ असा आदेश न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिला. त्यावर सरकारी वकील धैर्यशील नलावडे यांनी हा विषय संवेदनशील असल्याने, निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागत असल्याचे खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने सरकारची खरडपट्टी काढली. अधिसूचनेवर अंमलबजावणी करायची नसेल, तर स्पष्ट सांगा. सरकारने भूमिका स्पष्ट करावी. सरकार काही करू शकत नसेल, तर आम्ही आदेश देऊ, असे खंडपीठाने राज्य सरकारला सुनावले.महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी शहरातील बेकायदेशीर धार्मिक स्थळांची मोजदाद महापालिकेने केली असल्याची माहिती खंडपीठाला दिली. महापालिकेने शहारातील बेकायदेशीर धार्मिक स्थळांसदर्भातील अहवाल तयार करून समितीपुढे सादर केला . पुढील कार्यवाही समिती करेल, असे अ‍ॅड. साखरे यांनी खंडपीठाला सांगितले. या आधीच्या सुनावणीवेळी, सरकारने सात महापालिकांनी सादर केलेल्या अहवालानुसार, १ फेब्रुवारी २०१५ पर्यंत असलेल्या ६,३३६ बेकायदेशीर धार्मिक स्थळांपैकी २०७ नियमित करण्यात आली. १७९ हटवली, तर तीन धार्मिंक स्थळे अन्य जागेवर हलविले. (प्रतिनिधी)सर्वोच्च न्यायालय २००९ सालचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २९ सप्टेंबर २००९ रोजी देशातील सर्व राज्यांना बेकायदेशीर धार्मिक स्थळे तोडण्याचा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशानंतर अस्तित्त्वात आलेली बेकायदेशीर धार्मिक स्थळे तोडण्याबाबत, तर काही धार्मिक स्थळे नियमित करण्याबाबत, तर काही धार्मिक स्थळांना अन्य जागेवर हलवण्यासंदर्भात राज्य सरकारने ५ मे २०११ रोजी अधिसूचना काढली. या अधिसूचनेत धार्मिंक स्थळांची श्रेणी ठरवण्यासाठी राज्य, जिल्हा आणि महापालिका पातळीवर समिती नेमण्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या अधिसूचनेवर अंमलबजावणी न करण्यात आल्याने, ‘सोसायटी फॉर फास्ट जस्टिस’ या एनजीओने उच्च न्यायालायात सिव्हिल अर्ज दाखल केला. या अर्जावर गुरुवारी सुनावणी होती.