शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

सुरक्षा देण्यासाठी कोणते निकष लावता?-हायकोर्ट

By admin | Updated: January 21, 2017 05:51 IST

राजकारण्यांना कोणत्या निकषांवर सुरक्षा देता? अशी विचारणा राज्य सरकारकडे करत माजी मंत्र्यांना सुरक्षा देण्याची आवश्यकता आहे का

मुंबई : राजकारण्यांना कोणत्या निकषांवर सुरक्षा देता? अशी विचारणा राज्य सरकारकडे करत माजी मंत्र्यांना सुरक्षा देण्याची आवश्यकता आहे का, असा सवालही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारच्या सुनावणीत केला.व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी सामान्यांच्या खिशाला कात्री लागते. त्यामुळे राज्य सरकारला सुरक्षेची थकीत रक्कम वसूल करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सनी पुनामिया यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. मुख्य सरकारी वकिलांनी सरकारचे पैसे थकवण्यामध्ये विकासक आघाडीवर असल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘मुंबई वगळून उर्वरित महाराष्ट्रातून ५ कोटी ९२ लाख ३७ हजार रुपये थकीत आहेत. ज्यांनी रक्कम भरली नाही त्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे,’ अशी माहिती मुख्य सरकारी वकिलांनी दिली. त्यावर न्यायालयाने कोणत्या निकषांवर सुरक्षा देण्यात येते? अशी विचारणा सरकारकडे केली. ‘माजी नेत्यांना सुरक्षा देणे आवश्यक आहे का? तुम्ही (सरकार) काय करताय? दान करत आहात का? कोणत्या निकषामवर सुरक्षा देता? ते आम्हाला सांगा,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले. (प्रतिनिधी)