शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

...यामध्ये अपराधीपणा कसला?

By admin | Updated: June 19, 2016 02:15 IST

समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेतलेल्या मातेला ‘भारत माता की जय’ असे म्हणून वंदन करण्यात अपराधी वाटण्यासारखे काय आहे, असा सवाल केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या

पुणे : समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेतलेल्या मातेला ‘भारत माता की जय’ असे म्हणून वंदन करण्यात अपराधी वाटण्यासारखे काय आहे, असा सवाल केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला. स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावलेल्या महात्म्यांच्या जीवनचरित्रांचा शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश असायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच’ या लोकमान्य टिळकांच्या गर्जनेच्या शताब्दी वर्षानिमित्त डॉ. गिरीश दाबके संपादित ‘लोकमान्यांची सिंहगर्जना’ या पुस्तकाचे प्रकाशन नायडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय उर्जामंत्री पीयूष गोयल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, डॉ. दीपक टिळक, मुक्ता टिळक आदि उपस्थित होते.नायडू म्हणाले, ‘सध्याच्या पिढीला महात्म्यांच्या हौतात्म्याची फारशी माहिती नाही. तरुणाईची वाचनाची आवडही पूर्वीसारखी राहिलेली नाही. या पिढीला स्वातंत्र्यसमराचे आणि इतिहासाचे स्मरण करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये थोर व्यक्तींच्या जीवनचरित्रांचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे.टिळकांच्या सिंहगर्जनेच्या शताब्दीनिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबवण्यासाठी राज्य सरकारने १० कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (प्रतिनिधी)