शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आघाडी सरकारने काय केले, मी गाळ काढतोय

By admin | Updated: May 30, 2017 03:57 IST

गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने काय केले ते सांगावे, आम्ही अडीच वर्षात काय केले, ते सांगायला

सांगली/कोल्हापूर/ सातारा : गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने काय केले ते सांगावे, आम्ही अडीच वर्षात काय केले, ते सांगायला तयार आहोत. त्यांनी एवढा गाळ केला आहे, की तो काढण्याचे काम मी करीत आहे. हाच गाळ शेतात गेला असता, तर खताची गरज न भासता शेतकऱ्यांनी तीन-तीन पिके घेतली असती, अशी तोफ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी इस्लामपूर येथे डागली.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत इस्लामपूर (जि.सांगली), मलकापूर (जि.सातारा) व गारगोटी (जि.कोल्हापूर) येथे शेतकरी मेळावे झाले. या तिन्ही मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.इस्लामपूर येथील मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सध्या राज्यात शेतकऱ्यांचा कैवार घेऊन अनेकजण आंदोलन करत आहेत. आमच्यावर शेतकरीविरोधी असल्याची टीका करतात. मात्र, राज्यातील जनतेने महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये इतर पक्षांचा सुफडासाफ करुन भाजपवर विश्वास दाखवला आहे. विधानसभेपाठोपाठ भाजप राज्यातील सर्वांत जास्त लोकप्रतिनिधी असणारा पक्ष बनला आहे. गेल्या अडीच वर्षांच्या काळात शेतकऱ्यांच्या समस्या मिटल्या, असा आमचा दावा नाही. मात्र आम्ही प्रामाणिक आहोत. राज्यातील शेती क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. १९९५ च्या युती शासनाने पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा खोरेची कामे सुरु केली. त्यानंतरच्या १५ वर्षात ही कामे का पूर्ण झाली नाहीत, याचे उत्तर तत्कालीन राज्यकर्त्यांनी द्यावे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून राज्याला २६ हजार कोटी मिळाले आहेत.गेल्या दोन वर्षात उसाच्या एफआरपीची ९९ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या हातात दिली़मला डिवचू नका: सदाभाऊ खोतचळवळीत अनेक वादळे पाहिली. त्या वादळांशी दोन हात केले. मला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला, तर अंगावर घेतल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा कृषी राज्यरांत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.खासदार शेट्टी आणि त्यांच्यातील दरी रुंदावत चालल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच आत्मक्लेश यात्रेच्या सांगतेनंतर मोठा धक्का देऊ, मला लेचापेचाही समजू नका, असेही ते म्हणाले.‘स्वाभिमानी’ने मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे !कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांनी ‘आत्मक्लेश’ यात्रा काढली आहे. मात्र, अद्यापपर्यंत सरकारचा एकही प्रतिनिधी राजू शेट्टी यांना भेटायला गेलेला नाही, याचा निषेध करीत कऱ्हाडमध्ये कृष्णा हॉस्पिटलसमोर दुपारी दीड वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले. कटाप्पा कोण माहीत नाही!मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर थेट टीका केली . सांगली जिल्ह्यात कटाप्पा कोण आणि बाहुबली कोण, हे मला माहीत नाही. मात्र आज निशिकांत पाटील आणि वैभव शिंदे या दोन बाहुबलींनी भाजपत प्रवेश केला आहे. वैभव यांचा प्रवेश अनेकांना हादरा देऊन गेला आहे. ज्यांना हादरे बसले, त्यांची स्पंदने आमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहेत.