शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

हाच तो व्हिडिओ! ज्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी करतेय दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 14:45 IST

पद व जवाबदाऱ्या ज्या संभाळण्यात येतील त्याही समान पद्धतीने असतील असे मुख्यमंत्री म्हणाले होते

मुंबई : भाजपकडून मुख्यमंत्री आमचाच असं म्हटलं जात असताना, शिवसेना मात्र सत्ता आणि मुख्यमंत्रीपदाबाबत 50-50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम आहेत. तर लोकसभा निवडणुकीच्यावेळी सर्व काही ठरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषेदेत याबाबतीत माहिती दिली होती, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून वेळोवेळी करण्यात येत आहे.

भाजप-शिवसेनेतील सत्तासंघर्ष थांबायला तयार नाही. दोन्ही पक्षाकडून मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला जात आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्यावेळी 50-50 च्या फॉर्म्युला ठरला होता. त्याचप्रमाणे आम्ही मागणी करत असल्याचा दावा शिवसेना करत आहे. तर युती झाल्यावर या फॉर्म्युल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याचे संजय राऊत म्हणाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी 18 फेब्रुवारीला भाजप-शिवसेनेकडून युती झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी भाजप-शिवसेनेकडून सयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीत ठरलेल्या फॉर्म्युल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदारऱ्या यांची समानता राखण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. त्याप्रमाणे पद व जवाबदाऱ्या ज्या संभाळण्यात येतील त्याही समान पद्धतीने असतील असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावेळी झालेल्या या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ समोर आला आहे.