शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

इमारती पडतातच कशा? उच्च न्यायालयाने शीळफाटा दुर्घटनाप्रकरणी राज्य सरकारला घेतले फैलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 04:08 IST

मुंबईत नुकतीच घाटकोपर सिद्धिसाई इमारत दुर्घटना, तसेच मुंब्य्रातील लकी कंपाउंड इमारत कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने मुंबई व आजूबाजूच्या भागातील इमारती पडतातच कशा? असा सवाल राज्य सरकारला केला.

मुंबई : मुंबईत नुकतीच घाटकोपर सिद्धिसाई इमारत दुर्घटना, तसेच मुंब्य्रातील लकी कंपाउंड इमारत कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने मुंबई व आजूबाजूच्या भागातील इमारती पडतातच कशा? असा सवाल राज्य सरकारला केला. ४ एप्रिल २०१३ रोजी ठाण्यातील मुंब्रा येथील शीळफाटा भागात लकी कंपाउंड इमारत कोसळून, ७४ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, या प्रकरणात पुढील चौकशी न करण्यात आल्याबद्दल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फैलावर घेतले. संवेदनशीलता दाखवा, असेही न्यायालयाने म्हटले.लकी कंपाउंड बांधल्यानंतर चारच महिन्यांत कोसळली. या प्रकरणी अटकेत असलेल्यांना सबळ पुराव्याअभावी जामीन मंजूर झाल्याने, मुंब्रा येथील रहिवासी रईस शेख यांनी जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. आर. एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होती. गेली चार वर्षे तुम्ही काहीच केले नाही. अशा केसेसमध्ये संवदेनशीलता दाखवा. या घटनेतील सर्व आरोपी जामिनावर बाहेर आले आहेत. ते सर्व पुराव्यांची छेडछाड करत साक्षीदारांवर दबाव टाकतील, असे म्हणत न्यायालयाने, ठाणे क्राइम ब्रँचच्या सहायक पोलीस आयुक्तांनी यासंदर्भात दाखल अहवालावर नाराजी व्यक्त केली.अहवाल सादर करण्याचे निर्देश-अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाºयांची बदली कशी वेळेवर होते, हे आम्हाला माहीत आहे, अशा शब्दांत सरकारला टोला लगावत न्यायालयाने चार आठवड्यांत काय कारवाई केली, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश तापासयंत्रणेला दिले आहेत.