शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बुलेट ट्रेनचा राज्याला काय फायदा?,तिजोरीवर विनाकारण बोजा - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 03:14 IST

मुंबई ते अहमदाबाद या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काय फायदा? उलट राज्याच्या तिजोरीवर खर्चाचा बोजा पडणार आहे.

अहमदनगर : मुंबई ते अहमदाबाद या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काय फायदा? उलट राज्याच्या तिजोरीवर खर्चाचा बोजा पडणार आहे. मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प स्वीकारायच्या आधी विचार करायला हवा होता, अशा शब्दांत राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, मोठा गाजावाजा करून मुंबई ते अहमदाबाद या बुलेटट्रेनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. बुलेट ट्रेनला आमचा विरोध नाही; परंतु या ट्रेनचा मुंबईसह महाराष्ट्राला काहीच फायदा होणार नाही. सुमारे १ लाख कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्राच्या तिजोरीतून ३५ हजार कोटी जाणार आहेत.शिवसेना शेतकºयांसाठी रस्त्यावर उतरायचे म्हणतेय. त्याचे आम्ही स्वागत करतो; परंतु सत्तेत बसून रस्त्यावर उतरता येत नाही. त्यासाठी आधी सत्तेतून बाहेर पडा. मग आमच्यासारखे रस्त्यावर या, असे म्हणत पवार यांनी शिवसेनेलाही पट्ट्यात घेतले. राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकºयांची कर्जमाफी म्हणजे लबाडा घरचं आवतन आहे, ते जेवल्याशिवाय खरं नाही. आता पाहू कधी जेवायला मिळतंय ते, असा टोमणा पवार यांनी लगावला.अहमदाबादपर्यंत या ट्रेनचे एकूण ११ स्टेशन आहेत. त्यातील केवळ चारच महाराष्ट्राच्या हद्दीत आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचा सर्वाधिक लाभ गुजरातलाच होणार आहे.बुलेट ट्रेन करायचीच होती, तर ती मुंबई-दिल्ली अथवा चंद्रपूर-पुणे-मुंबई अशी केली असती, तर त्याचा राज्यालालाभ झाला असता, असे पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस