शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

हातावरचं पोट, आम्ही काय करायचं?

By admin | Updated: November 10, 2016 02:14 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्यात आल्या आहेत

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्यात आल्या आहेत. बँका आणि एटीएमही बंद ठेवण्यात आल्याने गरीब, गरजूंना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. दत्तवाडी, पर्वती, जय भवानीनगर अशा परिसरातील वस्ती भागातील महिलांनी ‘हातावरचं पोट, एक दिवसाचा खर्च तरी कसा भागवायचा’ असा प्रश्न उपस्थित केला. त्याचवेळी, दोन दिवसांनी बँकांमधून नोटा बदलून मिळणार असल्याची माहिती झोपडपट्टी भागातील बहुतांश लोकांना नसल्याचे या वेळी दिसून आले.दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पूजलेले. वेठबिगारी करून त्यांना रोजचा उदरनिर्वाह करावा लागतो. कधी आठवड्याचा, तर कधी दिवसाचा पगार मिळतो; जसा पगार मिळतो त्याप्रमाणे तेल, तांदूळ, पीठ असे जिन्नस खरेदी केले जातात. नोटा चलनातून रद्द करण्यामागचे कारण, त्याचे फायदे-तोटे याबाबत त्यांना काहीच माहिती नाही. आजचा दिवस कसा निभावून न्यायचा; एवढेच त्यांना माहीत असते. नोटा चलनातून हद्दपार होण्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडून मिळालेली उत्तरे विचार करायला लावणारी आहेत.