शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पश्चिम वाहिन्यांचे पाणी मराठवाडा, खान्देशात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:38 IST

पश्चिम भागातील नद्यांचे गुजरातमार्गे समुद्रात वाया जाणारे पाणी अडवून त्याचा पूर्वभागासाठी उपयोग करून घेण्यासाठी पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळविण्यास

- लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पश्चिम भागातील नद्यांचे गुजरातमार्गे समुद्रात वाया जाणारे पाणी अडवून त्याचा पूर्वभागासाठी उपयोग करून घेण्यासाठी पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळविण्यास केंद्र सरकार सकारात्मक असून, त्यासाठी निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. दोन महिन्यांत त्याबाबत चांगला निर्णय घेणार असल्याची माहिती जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री उमा भारती यांचीही भेट घेणार असून, वेळ पडल्यास पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून मोठी घोषणा होण्याचे सूतोवाचही महाजन यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार जिवा पांडू गावित यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर महाजन म्हणाले, आठवड्यापासून जलसंपदा खात्याची यंत्रणा त्याचा अभ्यास करीत असून, महाराष्ट्राचे हक्काचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे. ते विशेषत: पूर्वभागाला मिळाल्यास गोदावरी व तापी खोऱ्याचा भाग सुजलाम् सुफलाम् होण्यास मदत होणार आहे. पाणी वळविणार मालेगाव, नाशिक, मराठवाडा, जळगाव या भागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटेल, ही बाब राज्य सरकारलाही तत्त्वत: पटली आहे. त्याबाबत मंगळवारी रात्री एक वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेण्यात आली. पश्चिम वाहिन्यांचे पाणी अडविण्याचे निश्चित झाले असून, त्यावर कामही सुरू झाले आहे. अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष साइटवर भेटी दिल्या जात आहेत. - गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री