शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

कसारा परिसरातील विहिरी आटल्या

By admin | Updated: June 30, 2014 01:51 IST

तीव्र पाणीटंचाईमुळे सामान्यांची होरपळ होत असतानाच विहिरीही तळाला गेल्या आहेत. शासनाकडून येणारे टँकरही कमी झाले आहेत.

श्याम धुमाळ - कसारा

कसारा परिसरातील 21 पाडय़ांसह  प्रमुख गावांत तीव्र पाणीटंचाईमुळे सामान्यांची होरपळ होत असतानाच विहिरीही तळाला गेल्या आहेत. शासनाकडून येणारे टँकरही कमी झाले आहेत. मान्सूनपूर्व पावसात केलेल्या पेरण्यांना बहर येऊन केवळ पाण्याअभावी पिके जळून गेली आहेत.
अगोदरच अठराविश्व दारिद्रय़ात काढणा:या कसा:यातील दुर्गम गावपाडय़ांतील आदिवासी बांधवांसह शेतक:यांवर निसर्गानेही कोप केल्याने आज उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. कसारा परिसरातील चिंतामणवाडी, लतिफवाडी, ओहळाची वाडी, नारळवाडी यासह दांड, उग्रांवणो, बिवळवाडी, धोबीपाडा, बेळूक, वाशाळा, मोखावणो, कसारा (खु़) यासह अन्य 21 गावपाडय़ांत 7क् टक्के आदिवासी समाज आहे, तर 3क् टक्के संमिश्र समाज आहे. रोजगाराचे अन्य साधन नसलेल्या या गावांना एकमेव शेतीचा आधार असतो. परंतु यावर्षी पावसानेच दांडी मारल्याने या भागात तीव्र पाणीटंचाईबरोबरच अन्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उपरोक्त गावात असलेल्या विहिरी पूर्णता आटल्याने स्थानिक ग्रामस्थ महिला पाण्यासाठी रात्र जागून काढत आहेत. लहान मुलांसह पाणी शोधण्यासाठी महिला व पुरुष एक- दीड किलोमीटरवर असलेल्या डबक्यांचा शोध घेत पाणी भरीत आहेत. शासनाकडून येणारे टँकरही जूनअखेर बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी टँकर सुरू असले तरी ते तुरळक प्रमाणात आठवडय़ातून एकदा येत आहेत. 
परिणामी पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना पावसाने हुलकावणी दिल्याने मान्सूनपूर्व झालेल्या पावसात शेतक:यांनी पेरणी केलेले भात, वरई, नागली ही पिके  पूर्णत: करपली आहेत, तर जनावरांना पाणी, चारा नसल्याने जनावरांचीही मोठय़ा प्रमाणात उपासमार होत असल्याने यावर्षी मे ते 15 जूनदरम्यान या भागातील 2क् ते 25 जनावरे दगावली आहेत. 
 दरम्यान, शहापूर तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी स्वत: पुढाकार घेऊन वाशाळा परिसरात पाणीटँकर दिवसाआड सुरू केला असल्याने तेथील नागरिकांचा पाणीप्रश्न काही प्रमाणात मिटला असला, तरी गावपाडय़ांत पिण्यासाठीही पाणी  नसल्याने शासकीय यंत्रणा हतबल झाली आहे. (वार्ताहर)
 
मंत्र्यांनी दिलेल्या 
टाक्या रिकाम्या
दरम्यान मागील वर्षी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी चिंतामणवाडी सह अन्य भागात 5 हजार लिटरच्या टाक्या भेट दिल्या होत्या. परंतु तेव्हापासून या टाक्या रिकाम्याच असून ज्या सरकारच्या मनगटा मध्येच पाणी नाही. ते जनसामान्यांना पिण्यास पाणी काय देणार? आम्ही शिवसेनेतर्फे या भागात लवकरच पाणी टँकर व चारा उपलब्ध करून देऊ.
- प्रकाश पाटील
जिल्हा परिषद ठाणो, गटनेते
व स्थानिक जि. प. सदस्य
शहापूरही तहानलेला
शहापूर तालुक्यात पाणी टंचाई आहेच. पण ऐनवेळी पावसानेही दांडी मारल्याने धरणातील या नदीपात्रतील पाणीसाठी कमी झाला आहे. यामुळे पाणी टँकरचे प्रमाणही कमी झाले. प्रशासनाकडून शक्य तितके पाणी टँकर टंचाईग्रस्त भागात पाठविण्याचे काम सुरु आहे.
- अविनाश कोष्टी
तहसीलदार, शहापूर
 
पाऊस लांबल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा
पावसाअभावी शेतक:यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या भागात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतक:यांना मदत मिळावी अशी मागणी जि़प़ चे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी ठाणो जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल भेरे यांनी केली आहे.