मेंढय़ांचे रिंगण : तुकोबाराय पालखीचा इंदापूर तालुक्यात प्रवेश
अभिजित कोळपे -
सणसर (जि. पुणो)
झांज पथकांचा निनाद.. शालेय विद्यार्थिनींचे शिस्तबद्ध लेझीम नृत्य.. अन् आर्याबाग चौकातील रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थांनी फुलांच्या वर्षावात धोतराच्या पायघडय़ा घालून जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखीचे केलेले स्वागत, यामुळे काटेवाडीत ‘वैष्णवाघरी सर्व काळ.. सदा झणझणते टाळ’ असे भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.
पालखीचे देहूहून प्रस्थान होऊन शनिवारी दहावा दिवस उजाडला. मात्र, पाऊस अद्याप बरसलाच नाही, त्यामुळे पालखी पंढरपूरला कोरडीच जाणार का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच ठिकठिकाणच्या विसाव्यांदरम्यान वारक:यांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते, तर दुसरीकडे इंदापूर रस्त्यावरील आर्याबाग चौकातील रस्त्यावर चार तास हजारो लिटर पाणी वाया जात होते. पालखी सोहळ्यासाठी शासन आणि काही दानशूर लोक खासगी टॅँकर उपलब्ध करून देत आहेत. मात्र, वाढत्या उन्हामुळे ते अपुरे पडत आहेत. सकाळी पालखी शारदा विद्यालयाच्या प्रांगणातून मार्गस्थ झाली. मोतीबाग, पिंपळी ग्रेप, लिमटेक येथे पहिली विश्रंती घेऊन दुपारच्या विश्रंतीसाठी काटेवाडीत दाखल झाली. त्यानंतर भवानीनगर साखर कारखान्यामार्गे पालखी रात्रीच्या मुक्कामासाठी सणसर येथील मारुती मंदिरात दाखल झाली.
उद्या (रविवार) सकाळी साडेसहाच्या दरम्यान पालखी सणसरहून मार्गस्थ होणार असून, बेलवडीत सकाळी 9 वाजता गोल रिंगण झाल्यानंतर दुपारच्या विश्रंतीसाठी बेलवडीत येणार आहे. पुढे लासुण्रे जंक्शन, लासुण्रेमार्गे अंथुण्रेला पोहोचणार आहे.
शेतक:याची जीवन
‘वारी’ अध्र्यावरच!
बँक, सावकाराचे कजर्, त्यात दुष्काळाचे ओङो घेऊन विठ्ठलाच्या भेटीला निघालेल्या एका शेतक:याने आपली जीवन ‘वारी’ अध्र्यावरच सोडली आहे. धुळे जिल्हय़ाच्या साक्री तालुक्यातील दुसाणो येथील शेतकरी धनराज खंडू महाले (52) असे या शेतक:याचे नाव आहे. त्यांनी नगर तालुक्यातील देहरे येथे एका झाडाला शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी, चार मुली, दोन लहान मुले असा परिवार आहे.
दुमदुमली लोणंदनगरी
टाळ- मृदंगाचा गजर, भजनात रमलेले वारकरी, अखंड हरिनामाचा जप करत लाखो वारकरी शनिवारी लोणंदनगरीत विसावले. विठू नामाच्या जयघोषाने अवघी लोणंदनगरी दुमदुमून गेली आहे.
च्लोणंद (जि़ सातारा) : दुष्काळाने अद्यापही महाराष्ट्राची पाठ सोडली नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आह़े पालखी सोहळ्याबरोबर येणा:या वारक:यांमध्येही निम्म्याने घट झाल्याचे दिसून येत आह़े पंढरपूरची आषाढी वारी किती भरेल हे आता पावसावरच अवलंबून आह़े
च्दरम्यान, माऊलींच्या पालखी सोहळ्यात उद्या चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण होणार आह़े पंढरपूरला येणा:या संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर माऊली या दोन मुख्य पालख्यांसोबत दरवर्षी सुमारे चार लाख वारकरी येतात़ यंदा मात्र ही संख्या अडीच लाखांर्पयत आली आह़े पाऊस नसल्याने पेरणी न झाल्याने बहुसंख्य शेतकरी, वारकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़