शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वेलकम सी.एम.

By admin | Updated: November 2, 2014 01:01 IST

तुम्हाला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना पाहिले आणि आम्हा नागपूरकरांचा ऊर भरून आला़ आपल्या नागपूरचा सुपुत्र महाराष्ट्राचा पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालाय ही गोष्ट आम्हा सर्वांसाठी निश्चितच

प्रति,माननीय श्री. देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्यसप्रेम नमस्कार,तुम्हाला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना पाहिले आणि आम्हा नागपूरकरांचा ऊर भरून आला़ आपल्या नागपूरचा सुपुत्र महाराष्ट्राचा पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालाय ही गोष्ट आम्हा सर्वांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. मुख्यमंत्री म्हणून आज आपले उपराजधानीत प्रथमागमन होत आहे, त्यानिमित्त मन:पूर्वक स्वागत.मुख्यमंत्री महोदय, तुमचे आणि आमचे एक वेगळे ऋणानुबंध आहेत. ‘आपला माणूस’ म्हणून तुमच्यावर आमचा विशेष हक्क आहे आणि म्हणूनच खूप अपेक्षाही आहेत. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा नागपूरला महाराष्ट्रात समाविष्ट करुन घेतानाही आमच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु मागील ५४ वर्षांत या अपेक्षांची कधी पूर्तता झालीच नाही. उलट उपेक्षाच आमच्या पदरी पडली़ विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन एक केवळ उपचाराचा भाग म्हणून पंधरवड्यासाठी इथे घेतले जाते. पण त्यातून फार काही साध्य होत नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील. आपण मुख्यमंत्री झालात, केंद्रात आपल्याच पक्षाचे सरकार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नितीन गडकरी हे लोकविकासाची तळमळ असलेले मंत्री आहेत. त्यामुळे आपण या सर्वांच्या सहकार्याने नागपूरचा सर्वांगीण विकास घडवून आणू शकता. नागपूरचे ‘सिंगापूर’ करण्याच्या गोष्टी यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी केल्या. परंतु त्या घोषणा हवेतच विरल्या. मिहान प्रकल्प आजदेखील अजगरासारखा सुस्त आहे. आमची मुले उच्चशिक्षण घेतल्यानंतर नागपुरात थांबत नाहीत, कारण त्यांना येथे हवा तसा रोजगार नाही. अशा उच्चशिक्षितांना रोजगार मिळेल असे मोठे प्रकल्प नागपुरात आणता येणार नाहीत का? ‘आयटी हब’ होण्यास वाव असतानादेखील नागपूरमध्ये कंपन्यांचे ‘सर्किट’ जोडले गेलेले नाही. गुळगुळीत रस्त्यांचे शहर ही नागपूरची ओळख इतिहासजमा झाली आहे अन् नागरिकांना अनेक ठिकाणी खड्ड्यांतून रस्ता शोधावा लागत असल्याचे चित्र आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारित खड्ड्यांचा विषय येतो. महानगरपालिकेत आपल्याच पक्षाची सत्ता आहे. याअगोदर या मुद्यावर राज्याकडून सहकार्य मिळत नाही, असे उत्तर देण्यात यायचे. परंतु त्या सबबी आता राहिलेल्या नाहीत. आपण मनात आणले तर महानगरपालिकेच्या पाठीशी उभे राहून नागपुरातील सर्व रस्ते एकाच निर्णयात चकाचक करू शकता. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्रकल्प केवळ भिंती उभारून थांबला आहे तर रामझुल्याचा अजूनही वनवास संपलेला नाही. आमच्या भगिनींना घराबाहेर पडल्यावर रस्त्यांवरुन चालताना भीती वाटते. कधी कुठला गुंड येईल अन् गळ्यातील चेन-मंगळसूत्र झटका देऊन पळवेल याची शाश्वती राहिलेली नाही. हत्यांची शंभरी गाठल्या जातेय, तर महिलांवरील अत्याचारदेखील वाढत आहेत. मुख्यमंत्री महोदय, आमच्या अपेक्षा फार नाहीत. आकाशातून चंद्र तारे तोडून आणून द्या असेही आम्ही तुम्हाला सांगत नाही. सुंदर, स्वच्छ, सुरक्षित नागपुरात आम्ही राहतो हा अभिमान अधिक उंचाविण्यासाठी ज्या ज्या गोष्टी मुख्यमंत्री म्हणून आपण करू शकता, त्या आपण कराव्यात. एवढे हक्काने सांगण्याचा आमचा आपल्यावर अधिकार आहे. आपण या अपेक्षांची पूर्तता कराल ही खात्रीच नव्हे तर आम्हाला आत्मविश्वासदेखील आहे.अपेक्षा आणि सदिच्छांसह...आपले नागपूरकर