शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

१८ महिन्यांत घटवले १०८ किलो वजन

By admin | Updated: April 11, 2016 02:51 IST

बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण ठेवणे अनेकांसाठी आव्हान बनले असताना अनंत मुकेश अंबानी याने मात्र, अथक प्रयत्नाने १८ महिन्यांत १०८ किलो वजन घटवले आहे.

मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण ठेवणे अनेकांसाठी आव्हान बनले असताना अनंत मुकेश अंबानी याने मात्र, अथक प्रयत्नाने १८ महिन्यांत १०८ किलो वजन घटवले आहे. २१व्या वाढदिवशी त्याने स्वत:लाच ‘वेट लॉसचे गिफ्ट’ दिले आहे. प्रख्यात उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांचे चिरंजीव अनंत याला लहानपणी अस्थमाचा त्रास होता. त्या वेळी घेतलेल्या औषधांच्या दुष्परिणांमुळे अनंतचे वजन वाढत गेले. इतके की, अनंतला हालचाल करण्यास त्रास होऊ लागला. २१व्या वाढदिवसापर्यंत वजन घटवायचे, असा निश्चिय अनंतने केला. त्या वेळी डॉक्टरांनी त्याला नैसर्गिकरीत्याच वजन कमी करण्याचा सल्ला दिला. कोणत्याही प्रकारची औषधे न घेता, चालणे, योगा, पाच ते सहा तास व्यायाम आणि खाण्यावर नियंत्रण ठेवणे अशी कठोर दिनचर्या अनंतने स्वीकारली. १८ महिन्यांत अनंतने त्याच्या दिनचर्येत कोणताही बदल केला नाही. तो रोज पाच ते सहा तास व्यायाम करायचा. त्यानंतर योगसाधना झाल्यावर २१ किमी चालायचा. आहारामध्ये साखरेचा शून्य समावेश होता. अल्प प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि त्या जोडीला आवश्यक ते फॅट्स आणि प्रोटीन्स यांचा समावेश करण्यात आला होता.> सकस अन्न आणि शारीरिक कष्ट १आयपीएलच्या हंगामांमध्ये अनंत ठळकपणे लोकांच्या समोर येत राहिला. त्याला शरीराबद्दल न्यूनगंड होताच. शेरेबाजी सुरू झाल्यावर तो तीव्र झाला. फिटनेस टे्रनर आंद्रे यांच्याशी तो याविषयी बोलला. त्याच्या हालचाली आणि आहाराचे नियोजन सुरू झाले.२अनंत मुंबई सोडून जामनगरला गेला. मुंबईत असताना येणारे व्यत्यय त्याला टाळायचे होते.३शरीर, त्याची संरचना, निर्माण होणारी, वापरली जाणारी ऊर्जा, साठून राहणारी चरबी, अन्न, त्यातले घटक हे सारे समजून घेतले.४पूर्वतयारीनंतर रोज मोकळ्या हवेत २१ किलोमीटर चालणे, योगासने, वेट टे्रनिंग, कार्डिओ सुरू झाले. कृत्रिम, झटपट उपायांच्या मोहाला बळी न पडता, त्याने स्थूलपणाविरुद्ध आरंभलेली लढाई टप्प्याटप्प्याने जिंकली. ५०० दिवसांत त्याने तब्बल १०८ किलो वजन घटवले. ५या काळात अनंतने त्याची ‘अंबानी’ लाइफस्टाइल दूरच ठेवल्याचे, त्याला मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ सांगतात. साधे, सकस अन्न आणि शारीरिक कष्ट एवढेच त्याच्या साथीला होते. हे करण्यासाठी वडिलांचे नाव मुकेश अंबानी असणे गरजेचे किंवा पुरेसेही नसते, असे त्यांचे म्हणणे आहे.> अनंतच्या वजन घटवण्याच्या प्रवासात मी नेहमीच त्याच्याबरोबर होते. त्याची इच्छाशक्ती, अथक प्रयत्न आणि चिकाटीचे दर्शन या काळात मला झाले. आम्ही त्याला सतत प्रोत्साहन देत होतोच. अनंतसाठी ही वाट खूपच खडतर होती, पण त्याने हे करून दाखवले. त्याचा हा १८ महिन्यांचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे.- नीता अंबानी, उद्योजक