शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

१८ महिन्यांत घटवले १०८ किलो वजन

By admin | Updated: April 11, 2016 02:51 IST

बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण ठेवणे अनेकांसाठी आव्हान बनले असताना अनंत मुकेश अंबानी याने मात्र, अथक प्रयत्नाने १८ महिन्यांत १०८ किलो वजन घटवले आहे.

मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण ठेवणे अनेकांसाठी आव्हान बनले असताना अनंत मुकेश अंबानी याने मात्र, अथक प्रयत्नाने १८ महिन्यांत १०८ किलो वजन घटवले आहे. २१व्या वाढदिवशी त्याने स्वत:लाच ‘वेट लॉसचे गिफ्ट’ दिले आहे. प्रख्यात उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांचे चिरंजीव अनंत याला लहानपणी अस्थमाचा त्रास होता. त्या वेळी घेतलेल्या औषधांच्या दुष्परिणांमुळे अनंतचे वजन वाढत गेले. इतके की, अनंतला हालचाल करण्यास त्रास होऊ लागला. २१व्या वाढदिवसापर्यंत वजन घटवायचे, असा निश्चिय अनंतने केला. त्या वेळी डॉक्टरांनी त्याला नैसर्गिकरीत्याच वजन कमी करण्याचा सल्ला दिला. कोणत्याही प्रकारची औषधे न घेता, चालणे, योगा, पाच ते सहा तास व्यायाम आणि खाण्यावर नियंत्रण ठेवणे अशी कठोर दिनचर्या अनंतने स्वीकारली. १८ महिन्यांत अनंतने त्याच्या दिनचर्येत कोणताही बदल केला नाही. तो रोज पाच ते सहा तास व्यायाम करायचा. त्यानंतर योगसाधना झाल्यावर २१ किमी चालायचा. आहारामध्ये साखरेचा शून्य समावेश होता. अल्प प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि त्या जोडीला आवश्यक ते फॅट्स आणि प्रोटीन्स यांचा समावेश करण्यात आला होता.> सकस अन्न आणि शारीरिक कष्ट १आयपीएलच्या हंगामांमध्ये अनंत ठळकपणे लोकांच्या समोर येत राहिला. त्याला शरीराबद्दल न्यूनगंड होताच. शेरेबाजी सुरू झाल्यावर तो तीव्र झाला. फिटनेस टे्रनर आंद्रे यांच्याशी तो याविषयी बोलला. त्याच्या हालचाली आणि आहाराचे नियोजन सुरू झाले.२अनंत मुंबई सोडून जामनगरला गेला. मुंबईत असताना येणारे व्यत्यय त्याला टाळायचे होते.३शरीर, त्याची संरचना, निर्माण होणारी, वापरली जाणारी ऊर्जा, साठून राहणारी चरबी, अन्न, त्यातले घटक हे सारे समजून घेतले.४पूर्वतयारीनंतर रोज मोकळ्या हवेत २१ किलोमीटर चालणे, योगासने, वेट टे्रनिंग, कार्डिओ सुरू झाले. कृत्रिम, झटपट उपायांच्या मोहाला बळी न पडता, त्याने स्थूलपणाविरुद्ध आरंभलेली लढाई टप्प्याटप्प्याने जिंकली. ५०० दिवसांत त्याने तब्बल १०८ किलो वजन घटवले. ५या काळात अनंतने त्याची ‘अंबानी’ लाइफस्टाइल दूरच ठेवल्याचे, त्याला मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ सांगतात. साधे, सकस अन्न आणि शारीरिक कष्ट एवढेच त्याच्या साथीला होते. हे करण्यासाठी वडिलांचे नाव मुकेश अंबानी असणे गरजेचे किंवा पुरेसेही नसते, असे त्यांचे म्हणणे आहे.> अनंतच्या वजन घटवण्याच्या प्रवासात मी नेहमीच त्याच्याबरोबर होते. त्याची इच्छाशक्ती, अथक प्रयत्न आणि चिकाटीचे दर्शन या काळात मला झाले. आम्ही त्याला सतत प्रोत्साहन देत होतोच. अनंतसाठी ही वाट खूपच खडतर होती, पण त्याने हे करून दाखवले. त्याचा हा १८ महिन्यांचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे.- नीता अंबानी, उद्योजक